शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
7
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
8
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
9
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
10
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
11
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
12
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
13
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
14
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
15
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
16
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
17
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
18
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
19
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
20
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले

नागपुरात गुलाबी थंडी झाली रोगट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 19:53 IST

हिवाळा हा ऋतूू आरोग्यास लाभदायक असतो. मात्र ढगाळ वातावरण, पाऊस आणि प्रमाणाबाहेर वाढलेल्या थंडीमुळे तो रोगट ठरत आहे. वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देथंडी, पाऊस व ढगाळ वातावरणाचा शरीरावर परिणामसर्दी, खोकला, ताप, न्यूमोनिया, दमा, संधिवाताचा वाढला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळा हा ऋतूू आरोग्यास लाभदायक असतो. मात्र ढगाळ वातावरण, पाऊस आणि प्रमाणाबाहेर वाढलेल्या थंडीमुळे तो रोगट ठरत आहे. वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: बालकांना सर्दी, खोकला, ताप, दमा, न्यूमोनिया, मोठ्यांमध्ये वाढलेला संधिवाताचा त्रास तर ज्येष्ठांमध्ये कंबरदुखी, मणक्यांचे आजार बळावले आहेत.हिवाळा हा अनेकांसाठी सर्वाधिक प्रतीक्षेत असलेला ऋतू. सुट्या साजऱ्या करण्यापासून ते कौटुंबिक सहलीपर्यंत कितीतरी कारणांनी या ऋतूचा आनंद लुटला जातो. मात्र सध्या प्रमाणाबाहेर घसरलेला पारा, ढगाळ वातावरण त्यात पावसाची पडलेली भर यामुळे विविध आजाराची डोकेदुखी वाढली आहे. डॉक्टरांच्या मते, सध्या लहान मुले सर्दी, खोकल्याने बेजार झाली आहेत.५० ते ६० टक्के रुग्ण सर्दी, खोकला, ताप, न्यूमोनियाचेइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सी.एम. बोकडे म्हणाले, बदललेल्या वातावरणाचा शरीरावर लवकर प्रभाव पडतो. विशेषत: लहान मुले याला लवकर बळी पडतात. परिणामी, रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रोज ५० ते ६० टक्के रुग्ण सर्दी, खोकला, ताप व न्यूमोनियाचे येत आहेत. यातील १० ते १२ टक्के रुग्णांना वॉर्डात भरती करून उपचार द्यावे लागत आहेत. या आजारांना दूर ठेवण्यासाठी थंडीपासून बचाव करावा. कुठल्याही थंड वस्तूचे सेवन करू नये. शिळे अन्न खाऊ नये. नवजात बालकांना उबदार कपड्यात गुंडाळून ठेवावे, वारंवार स्तनपान करावे.संधिवाताचा दाह वाढलेल्या रुग्णांत वाढऑर्थरायटिस डॉ. श्रुती रामटेके म्हणाल्या, थंडी वाढल्यास संधिवात म्हणजे ऑर्थरायटिसचे रुग्ण वाढतात, असे नाही. या दिवसांमध्ये स्नायू जाड होतात, यामुळे संधिवाताचा दाह वाढतो. सध्या असलेल्या हवामानामुळे ‘ह्युमटॉईड ऑर्थरायटिस’ व ‘ऑस्टिओ ऑर्थरायटिस’चा त्रास वाढलेल्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. अशा रुग्णांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नियमित औषधे व नियमित व्यायाम करायला हवा.२० टक्क्याने वाढले श्वसनाचे रुग्णश्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, थंडीत दमा, सीओपीडी व श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांत वाढ होते. परंतु सध्या असलेल्या हवामानामुळे २० टक्क्याने या सर्वच आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: जुना अस्थमा असलेल्यांना त्रास वाढला असून, त्यांना डोज वाढवून घेण्याची वेळ आली आहे. या वातावरणाचा सामान्यांनाही त्रास होत आहे. काहींमध्ये अस्थमाच्या सुरुवातीची लक्षणे दिसून येत आहेत. थंडीपासून बचाव व नियमित औषधे हाच यावर उपाय आहे.

 

टॅग्स :weatherहवामानHealth Tipsहेल्थ टिप्स