शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

नागपुरात गुलाबी थंडी झाली रोगट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2020 19:53 IST

हिवाळा हा ऋतूू आरोग्यास लाभदायक असतो. मात्र ढगाळ वातावरण, पाऊस आणि प्रमाणाबाहेर वाढलेल्या थंडीमुळे तो रोगट ठरत आहे. वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे.

ठळक मुद्देथंडी, पाऊस व ढगाळ वातावरणाचा शरीरावर परिणामसर्दी, खोकला, ताप, न्यूमोनिया, दमा, संधिवाताचा वाढला त्रास

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : हिवाळा हा ऋतूू आरोग्यास लाभदायक असतो. मात्र ढगाळ वातावरण, पाऊस आणि प्रमाणाबाहेर वाढलेल्या थंडीमुळे तो रोगट ठरत आहे. वातावरणातील बदलांमुळे विविध आजारांच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: बालकांना सर्दी, खोकला, ताप, दमा, न्यूमोनिया, मोठ्यांमध्ये वाढलेला संधिवाताचा त्रास तर ज्येष्ठांमध्ये कंबरदुखी, मणक्यांचे आजार बळावले आहेत.हिवाळा हा अनेकांसाठी सर्वाधिक प्रतीक्षेत असलेला ऋतू. सुट्या साजऱ्या करण्यापासून ते कौटुंबिक सहलीपर्यंत कितीतरी कारणांनी या ऋतूचा आनंद लुटला जातो. मात्र सध्या प्रमाणाबाहेर घसरलेला पारा, ढगाळ वातावरण त्यात पावसाची पडलेली भर यामुळे विविध आजाराची डोकेदुखी वाढली आहे. डॉक्टरांच्या मते, सध्या लहान मुले सर्दी, खोकल्याने बेजार झाली आहेत.५० ते ६० टक्के रुग्ण सर्दी, खोकला, ताप, न्यूमोनियाचेइंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे (मेयो) बालरोग विभागाचे प्रमुख डॉ. सी.एम. बोकडे म्हणाले, बदललेल्या वातावरणाचा शरीरावर लवकर प्रभाव पडतो. विशेषत: लहान मुले याला लवकर बळी पडतात. परिणामी, रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) रोज ५० ते ६० टक्के रुग्ण सर्दी, खोकला, ताप व न्यूमोनियाचे येत आहेत. यातील १० ते १२ टक्के रुग्णांना वॉर्डात भरती करून उपचार द्यावे लागत आहेत. या आजारांना दूर ठेवण्यासाठी थंडीपासून बचाव करावा. कुठल्याही थंड वस्तूचे सेवन करू नये. शिळे अन्न खाऊ नये. नवजात बालकांना उबदार कपड्यात गुंडाळून ठेवावे, वारंवार स्तनपान करावे.संधिवाताचा दाह वाढलेल्या रुग्णांत वाढऑर्थरायटिस डॉ. श्रुती रामटेके म्हणाल्या, थंडी वाढल्यास संधिवात म्हणजे ऑर्थरायटिसचे रुग्ण वाढतात, असे नाही. या दिवसांमध्ये स्नायू जाड होतात, यामुळे संधिवाताचा दाह वाढतो. सध्या असलेल्या हवामानामुळे ‘ह्युमटॉईड ऑर्थरायटिस’ व ‘ऑस्टिओ ऑर्थरायटिस’चा त्रास वाढलेल्या रुग्णांची संख्या वाढलेली आहे. अशा रुग्णांनी तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. नियमित औषधे व नियमित व्यायाम करायला हवा.२० टक्क्याने वाढले श्वसनाचे रुग्णश्वसनरोग तज्ज्ञ डॉ. अशोक अरबट म्हणाले, थंडीत दमा, सीओपीडी व श्वसनाच्या आजाराच्या रुग्णांत वाढ होते. परंतु सध्या असलेल्या हवामानामुळे २० टक्क्याने या सर्वच आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. विशेषत: जुना अस्थमा असलेल्यांना त्रास वाढला असून, त्यांना डोज वाढवून घेण्याची वेळ आली आहे. या वातावरणाचा सामान्यांनाही त्रास होत आहे. काहींमध्ये अस्थमाच्या सुरुवातीची लक्षणे दिसून येत आहेत. थंडीपासून बचाव व नियमित औषधे हाच यावर उपाय आहे.

 

टॅग्स :weatherहवामानHealth Tipsहेल्थ टिप्स