शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

फुले-आंबेडकर यांची ‘राष्ट्र संकल्पना’ समताधिष्ठित : सुखदेव थोरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 22:25 IST

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रीयता म्हणजे काय, यावर आपले विचार मांडले आहे. त्यांच्यानुसार जेव्हा समाजामध्ये समानता, एकत्र असण्याची भावना, समान विचार, समान चेतना, लोकांमध्ये एकमेकांबद्दल सहवेदना असेल, तरच राष्ट्र अधिक समर्थ बनेल. ही बाबासाहेबांची समताधिष्ठीत राष्ट्र संकल्पना होती, असे प्रतिपादन अनुदान आयोग विद्यापीठाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.

ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती सोहळ्याला सुरुवात

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राष्ट्र म्हणजे काय आणि राष्ट्रीयता म्हणजे काय, यावर आपले विचार मांडले आहे. त्यांच्यानुसार जेव्हा समाजामध्ये समानता, एकत्र असण्याची भावना, समान विचार, समान चेतना, लोकांमध्ये एकमेकांबद्दल सहवेदना असेल, तरच राष्ट्र अधिक समर्थ बनेल. ही बाबासाहेबांची समताधिष्ठीत राष्ट्र संकल्पना होती, असे प्रतिपादन अनुदान आयोग विद्यापीठाचे माजी अध्यक्ष डॉ. सुखदेव थोरात यांनी येथे केले.डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती समिती, नागपूरच्यावतीने दीक्षाभूमी येथे शनिवारपासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त नागरी जयंती सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी फुले-आंबेडकर यांची ‘ राष्ट्र संकल्पना’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. मंचावर प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, प्रा. डॉ. सागर जाधव, प्रा. रमेश पिसे, जैबुप्रिसा शेख व सरोज आगलावे उपस्थित होत्या.डॉ. थोरात म्हणाले, एक भूभाग, एक वंश, एक भाषा, एक संस्कृती ही राष्ट्र बनविण्याकरिता आवश्यक आहेच, परंतु सोबतच राष्ट्रीयत्वाची भावना त्याहूनही आवश्यक आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिप्रेत असलेले समताधिष्ठीत राष्ट्र घडविण्यासाठी प्रयत्न सुरू असलेतरी ते अपुरे पडत आहे. यात प्रत्येकाच्या सहभागाची गरज आहे. मात्र, गेल्या पाच वर्षांत जातीजातीमधील तेढ वाढली आहे. व्यक्ती स्वातंत्र्यावर बाधा आली आहे. विशिष्ट धर्माची वैदिक विचारसरणी लादण्याचा प्रयत्न होत आहे. ही समताधिष्ठित राष्ट्राला मारक ठरणारी आहे, असेही ते म्हणाले.प्रा. डॉ. सागर जाधव म्हणाले, शुद्रातील शुद्र माणसाचा विकास होत नाही तोपर्यंत या देशाला ‘नेशन’ असे म्हणता येणार नाही. महात्मा ज्योतिबा फुले यांनी ही संकल्पना मांडून थांबले नाहीत तर, त्यांनी आपल्या हयातीमध्ये ग्रंथांच्या माध्यमातून, स्त्रियांच्या, अस्पृश्य उद्धारातून, शिक्षणाच्या चळवळीतून यावर काम केले आहे. राष्ट्रामध्ये सर्व जातीधर्माचे लोक एकत्र कसे राहतील अशी भूमिका महात्मा फुले यांनी मांडली आहे. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यानुसार, जोपर्यंत जाती, वेद, पंथ अस्तित्वात राहतील, तोपर्यंत बंधुत्वाची भावना विकसित होणार नाही. यामुळे राष्ट्राचा विकासही होणार नाही, असेही ते म्हणाले. याप्रसंगी प्रा. रमेश पिसे व जैबुप्रिसा शेख यांनीही आपले विचार मांडले. प्रास्ताविक सरोज आगलावे यांनी केले. संचालन डॉ. सरोज डांगे यांनी केले.

टॅग्स :Dr Babasaheb Ambedkar Jayantiडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी