शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

'भूविज्ञान'मध्ये आर्थिक घोटाळ्याचा आरोप करणारी याचिका फेटाळली

By राकेश पांडुरंग घानोडे | Updated: May 10, 2024 19:28 IST

हायकोर्टाचा निर्णय : अमृत महोत्सवी समारंभाचे प्रकरण

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातील भूविज्ञान विभागाच्या अमृत महोत्सवी समारंभासाठी मिळालेल्या निधीमध्ये मोठा गैरव्यवहार झाल्याचा आरोप करणारी जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावली. न्यायमूर्तिद्वय नितीन सांबरे व अभय मंत्री यांनी हा निर्णय दिला.

भूविज्ञान विभागाचे माजी विद्यार्थी व गोंडवाना भूवैज्ञानिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. अंजनकुमार चॅटर्जी यांनी ही याचिका दाखल केली होती. २०२१-२२ मध्ये साजरा झालेल्या या समारंभासाठी चॅटर्जी यांनी देणगी दिली होती. भूविज्ञान विभाग प्रमुख डॉ. के. आर. रणदिवे यांनी समारंभाचा निधी नियमानुसार खर्च केला नाही. त्यांनी निधीमध्ये गैरव्यवहार केला. करिता, विशेष समिती स्थापन करून या घोटाळ्याची चौकशी करण्यात यावी, असे चॅटर्जी यांचे म्हणणे होते. परंतु, न्यायालयाला नियमाची पायमल्ली व आर्थिक घोटाळा झाल्याचे ठोस पुरावे रेकॉर्डवर आढळून आले नाही. उलट, चॅटर्जी यांनी रणदिवे यांच्यासोबत असलेल्या वैयक्तिक वादामुळे ही याचिका दाखल केल्याचे दिसून आले. यासंदर्भात चॅटर्जी यांचा वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालयामध्येही दावा प्रलंबित आहे. परिणामी, ही याचिका फेटाळण्यात आली.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठMumbai High Courtमुंबई हायकोर्टnagpurनागपूर