शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

पक्ष फोडणाऱ्यांच्या विरोधाचा निकाल असेल, कोण असली-नकली हे जनता ठरवेल : जयंत पाटील

By कमलेश वानखेडे | Updated: April 12, 2024 15:30 IST

ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या विरोधाचा निकाल असेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला

नागपूर : महाराष्ट्र मध्ये दोन पक्ष फोडले तरी देखील प्रतिसाद मिळत नाही. म्हणून नकली आणि असली हा प्रकार तयार करणे आणि लोकांमध्ये संभ्रम तयार करण्याचे काम सुरू आहे. महाराष्ट्रातील जनता हुशार आहे. ज्यांनी पक्ष फोडला त्यांच्या विरोधाचा निकाल असेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला. वर्धा येथे अमर काळे यांच्या प्रचारात सहभागी होण्यासाठी शुक्रवारी सकाळी जयंत पाटील यांचे नागपुरात आगमन झाले.

यावेळी पत्रकारांशी बोलता ते म्हणाले, एका पक्षाचे दोन तुकडे करायचे आणि आपणच त्यांना नकली म्हणायचे. ज्यांनी फोडाफोड केली त्यांनीच कोण असल्याने कोण नकली हे सांगायचे. त्यापेक्षा जनतेला ठरवू द्या कोण असली आणि कोण नकली आहे ते. शरद पवारांना एनडीएमध्ये नेण्यासाठी सगळ्यांचे प्रयत्न होते. ते तयार असते तर गेलेच असते. पण शरद पवार जाण्यासाठी कधीच तयार नव्हते. त्यांनी ही विचारसरणी स्वीकारायला नकार दिल्याने पक्ष फुटला, असेही त्यांनी स्पष्ट केले. मला समाधान आहे राज ठाकरेची तुलना नरेंद्र मोदीच्या बरोबरीने होत आहे. त्यांच्याबरोबर बसण्याचा स्वीकार भाजपने केला यासाठी स्वागत केले पाहिजे, असा टोलाही त्यांनी लगावला. सुनेत्रा पवार यांच्यासाठी राज ठाकरेंचा पाठिंबा घेण्याची आवश्यकता दिसत आहे. हे राज ठाकरेसाठी चांगले आहे. पण राज ठाकरेंना एकही जागा मिळाली नाही, कदाचित विधानसभेचे आश्वासन असेल, असा चिमटाही त्यांनी काढला.

सुप्रिया सुळे नक्की जिंकतीलमागील दहा वर्षांपासून सुप्रिया सुळे या बारामतीतून निवडून येत आहे. भाषण करायचं असेल म्हणून भाषण अजितदादा बोलत असतील. सुळे यांनी काम केले असेल म्हणूनच त्या निवडून आल्या आहेत. त्या पुन्हा निवडून येतील मला याची खात्री आहे, असंही जयंत पाटील म्हणाले.

टॅग्स :Jayant Patilजयंत पाटील