शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi: नाशिक-सोलापूर-अक्कलकोट कॉरिडोरला मंजुरी मिळताच पंतप्रधान मोदींचं मराठीतून ट्वीट!
2
मुंबईत महायुतीचे १२ उमेदवार अर्ज माघार घेणार?; आठवलेंच्या नाराजीनाट्यानंतर मोठी घडामोड
3
Vladimir Putin: व्लादिमीर पुतिन यांच्या निवासस्थानावर झालेल्या ड्रोन हल्ल्याचे रशियाने दाखवले पुरावे!
4
चेटकीण असल्याच्या संशयावरून दाम्पत्याची निर्घृण हत्या, घराला लावली आग, आसाममधील धक्कादायक घटना  
5
पाकिस्तानचा 'माज' कमी होईना... पहलगाम हल्ल्याच्या मास्टरमाईंडची भारताला धमकी, काय म्हणाला?
6
प्रेमाच्या आणाभाका; अन् रक्ताची होळी ! पत्नीने प्रियकरासोबत मिळून केली पतीची हत्या; रक्ताच्या थेंबांनी उघड झाला कट
7
पत्नी करेल पतीविरुद्ध प्रचार ! पतीच्या बंडखोरीमुळे भाजपच्या माजी महापौर गेल्या माहेरी; तिकीटवाटपाचा वाद थेट घरात
8
’नातेवाईकच माझा २०० रुपयांत सौदा करायचे, घरी ग्राहक यायचे’, पीडित तरुणीने दिली हादरवणारी माहिती  
9
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पहिल्यांदा पाकिस्तानी नेत्याला भेटले भारताचे परराष्ट्र मंत्री, कारण काय?
10
Sanjay Raut: "आज मध्यरात्री १२ वाजता बॉम्बस्फोट होणार!" राऊतांच्या बंगल्याबाहेरील कारवर खळबळजनक मजकूर
11
छ. संभाजीनगरात भाजपनंतर शिंदेसेनेतही 'निष्ठावंतांचा' आक्रोश; मंत्री शिरसाटांच्या घरासमोर ठिय्या!
12
छ. संभाजीनगर भाजपत अराजकता! वाद शांत करण्यास गेलेल्या कार्यकर्त्यास महिलांनी झोडपले
13
केंद्राकडून महाराष्ट्राला गिफ्ट! नववर्षाच्या पूर्वसंध्येला केंद्रीय कॅबिनेट बैठकीत मोठा निर्णय
14
रुग्णालयातून बाहेर येताच माणिकराव कोकाटेंची थेट कोर्टात हजेरी, मंत्रिपद आणि शिक्षेबाबत म्हणाले…
15
Video: बॉडीबिल्डर्सनी आधी सफाई कामगाराची उडवली खिल्ली, मग पठ्ठ्याने जे केलं ते पाहून...
16
Viral Video: ई- रिक्षा शोरूमबाहेर नेली अन् पेट्रोल टाकून पेटवून दिली; तरुणानं असं का केलं?
17
IND vs NZ : रिषभ पंतची डाळ शिजणं 'मुश्किल'च; चार संधी मिळाल्या, पण प्रत्येक वेळी अपयशाचा पाढा
18
Municipal election 2026: "कुछ कह गए, कुछ..."; निष्ठावतांच्या आक्रोशानंतर भाजपा खासदार मेधा कुलकर्णींचा संताप
19
NIA प्रमुख सदानंद दाते आता महाराष्ट्राचे नवे पोलिस महासंचालक, ३ जानेवारीला स्वीकारणार पदभार
20
Video: गळफास घेतलेल्या तरुणाला जीवनदान; पोलिस अधिकाऱ्याने CPR देऊन वाचवले प्राण
Daily Top 2Weekly Top 5

लक्ष्मीदर्शनाशिवाय लोक मतदान करीत नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 00:16 IST

लोकशाही टिकविणे ही जेवढी राजकीय जबाबदारी आहे तेवढीच जनतेचीही आहे. आम्ही केलेली विकास कामे जनतेला दाखवितो, जाहिरनामे सांगतो, तरीही मतदार लक्ष्मीदर्शनाशिवाय मतदान करीत नाही. ज्या क्षेत्रात सर्वात जास्त निधी खर्च केला त्याच क्षेत्रात सर्वाधिक लक्ष्मीदर्शन करावे लागले. त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर उमेदवार निवडूनच येत नाही, असे रोखठोक वक्तव्य आमदार नीतेश राणे यांनी केले.

ठळक मुद्देनीतेश राणे रोखठोक : यशवंत महोत्सवात युवा आमदारांशी संवाद

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लोकशाही टिकविणे ही जेवढी राजकीय जबाबदारी आहे तेवढीच जनतेचीही आहे. आम्ही केलेली विकास कामे जनतेला दाखवितो, जाहिरनामे सांगतो, तरीही मतदार लक्ष्मीदर्शनाशिवाय मतदान करीत नाही. ज्या क्षेत्रात सर्वात जास्त निधी खर्च केला त्याच क्षेत्रात सर्वाधिक लक्ष्मीदर्शन करावे लागले. त्यांची मागणी पूर्ण केली नाही तर उमेदवार निवडूनच येत नाही, असे रोखठोक वक्तव्य आमदार नीतेश राणे यांनी केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या विभागीय केंद्र नागपूरतर्फे आयोजित यशवंत महोत्सवात सोमवारी ‘युवा आमदारांशी युवकांचा संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आमदार डॉ. आशिष देशमुख, आमदार निरंजन डावखरे व आमदार जगदीश महाडिक यांच्यासह अध्यक्षस्थानी कृष्णा इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेसचे कुलगुरू डॉ. वेदप्रकाश मिश्रा, गिरीश गांधी, समीर सराफ, डॉ. प्रदीप विटाळकर, प्रेम लुनावत उपस्थित होते. नीतेश राणे पुढे म्हणाले की, राजकारणाची परिस्थिती बदलली आहे. पूर्वी कार्यकर्ते प्रेमापोटी निष्ठेने कार्य करायचे. मात्र आज निष्ठा फुकट मिळत नाही. हल्ली निष्ठेलाही प्राईस टॅग असते, हे वास्तव मान्य करावे लागेल. जनतेला त्यांच्यानुसार त्यांचा लोकप्रतिनिधी, आमदार, खासदार व सरकार मिळत असते. एखाद्याला त्यांचा नेता किंवा सरकार आवडत नसेल तर त्यास नाकारण्याचे अधिकारही त्यांना आहेत. एका क्षेत्रात काम करणाऱ्यांना त्यांच्या क्षेत्रातील एखाद्यावर टीका करणे सहन होत नाही. मात्र राजकारणात तसे होत नाही, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. देश व लोकप्रतिनिधी घडविणारी जनताच असते. आम्ही प्रामाणिकपणे हे राज्य घडविण्याचा प्रयत्न करू व जनतेनेही त्यांचे कार्य योग्यपणे करावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.डॉ. आशिष देशमुख म्हणाले, हल्लीच्या राजकारणात मूल्य, नीतीमत्ता व समर्पण राहिले नसल्याची टीका सातत्याने होते व राजकीय व्यक्तींना संशयातून पाहिले जाते. त्यामुळे त्यांना पूर्वीसारखा आदर व सन्मान मिळत नसल्याचे सांगत, या घसरणीसाठी राजकारण कारणीभूत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. ही घसरण रोखण्यासाठी स्वार्थ सोडून नीतिमूल्याने कार्य करणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले. युवा आमदारांना तरुणांशी जुळून कार्य करावे लागेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.एका काळात चित्रपटात खलपात्र म्हणून राजकीय व्यक्तींना रंगविण्यात आल्यानेही जनतेमध्ये नकारात्मकता निर्माण झाल्याची भावना जगदीश महाडिक यांनी व्यक्त केली. जातीवाद, प्रांतवाद, भाषावाद न मानणाऱ्या युवकांनी राजकारणात यावे, असे आवाहन त्यांनी केले. निरंजन डावखरे म्हणाले की, आज विधानसभेप्रमाणे परिषदेतही युवा आमदार येत असून ही परिस्थिती चांगली आहे. सोशल मीडियामुळे जग जवळ आले असून युवक वेगवान झाला आहे. मात्र त्यांच्यात सहनशीलता कमी झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. समाज आणि देश युवकांकडे अपेक्षेने बघतो तसे युवा लोकप्रतिनिधीकडेही बघतो. समाजाच्या अपेक्षा पूर्ण करण्याचा प्रयत्न करू, असे मनोगत त्यांनी व्यक्त केले.अध्यक्षीय विचार व्यक्त करताना डॉ. वेदप्रकाश मिश्रा यांनी लोकशाही केवळ निवडणुकीपुरती मर्यादित आणि पाच वर्षे पारतंत्र्यात राहणारी व्यवस्था झाल्याची खंत व्यक्त केली. तरुण आमदारांनी नीतीमूल्याच्या राजकारणातून ही परिस्थिती बदलावी, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक गिरीश गांधी यांनी व संचालन निशिकांत काशीकर यांनी केले. विदर्भ का हवा आणि का नको?हा प्रश्न एका तरुणाने डॉ. देशमुख व नीतेश राणे यांना विचारला. यावर राज्याचे मुख्यमंत्री, अर्थमंत्री व ऊर्जामंत्री विदर्भाचे आहेत, पावसाळी अधिवेशन विदर्भात झाले असताना वेगळा विदर्भ का हवा, असा सवाल राणे यांनी केला. ही जनतेची नसून केवळ मूठभर लोकांची मागणी असल्याची टीका त्यांनी केली. यावर डॉ. देशमुख यांनी छोटी राज्ये प्रगतिशील आहेत, ही भूमिका मांडत, वेगळा विदर्भ ही जनतेची मागणी असल्याचे उत्तर दिले. नाणार प्रकल्पासाठी समुद्राची आवश्यकता असते, असे बोलणाऱ्यांना विधिमंडळाच्या पहिल्या दिवशीचा फोटो दाखवावा, अशी उपरोधिक टीका राणे यांनी केली.

 

टॅग्स :MLAआमदारnagpurनागपूर