सेवानिवृत्त शिक्षकांची देयके रखडली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2021 04:09 IST2021-03-07T04:09:28+5:302021-03-07T04:09:28+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क कुही/वाडी : जिल्हा परिषदेच्या १३ पंचायत समितीमधील शेकडाे प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांना ...

सेवानिवृत्त शिक्षकांची देयके रखडली
लाेकमत न्यूज नेटवर्क
कुही/वाडी : जिल्हा परिषदेच्या १३ पंचायत समितीमधील शेकडाे प्राथमिक शिक्षक व केंद्रप्रमुख, शिक्षण विस्तार अधिकारी यांना सेवानिवृत्तीनंतर मिळणाऱ्या आर्थिक लाभाची देयके गेल्या दीड वर्षांपासून रखडली आहेत. प्रत्येकाचे २५ ते ३० लाख रुपये असे काेट्यवधी रुपये जिल्हा परिषदेकडे थकीत असल्याची तक्रार सेवानिवृत्तांनी केली आहे.
सेवानिवृत्त झालेल्या व कार्यरत जि.प. शिक्षक, केंद्रप्रमुख व विस्तार अधिकाऱ्यांची बदली, दाैरा प्रवासभत्त्याची देयकेसुद्धा पाच ते सात वर्षांपासून प्रलंबित आहेत. कामठी पंचायत समितीमधील शिक्षिका नलिनी आसाेले या २०१७ ला सेवानिवृत्त झाल्या. परंतु त्यांचा सहाव्या वेतन आयाेगाच्या थकबाकीचा पाचवा हप्ता अजूनही त्यांच्या बँक खात्यात जमा झाला नाही. याबाबत त्यांनी पंचायत समिती कामठीकडे तक्रार करूनही काहीही प्रतिसाद मिळत नसल्याची बाब त्यांनी सांगितली.
अनेक शिक्षकांच्या सेवापुस्तकात गट विमा याेजनेच्या वेळाेवेळी नाेंदीच घेण्यात येत नसल्यामुळे अनेकांना गट विम्याची रक्कमसुद्धा मिळत नसल्याच्या तक्रारी आहेत. पंचायत समित्यांमध्ये सेवापुस्तकातील नाेंदी अद्ययावत करण्यात येत नसल्यामुळे जि.प. मुख्य लेखा व वित्त विभागात त्रुटी काढत असल्याने पेन्शन प्रकरणे लवकर पूर्ण केली जात नाही.
या समस्यांबाबत महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक सेना जिल्हा शाखेतर्फे अनेकदा जि.प. प्रशासनाकडे मांडण्यात येऊनही दिलासा मिळत नाही. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकाऱ्यांनी तातडीने सदर आर्थिक समस्या दूर करून सर्व शिक्षकांचे सेवापुस्तक ऑनलाईन करून प्रलंबित प्रवासभत्ता देयके, सेवा-उपदान रक्कम, अंशराशीकरण मूल्य रक्कम, वैद्यकीय प्रतिपूर्ती देयक, भविष्य निर्वाह निधी अग्रीम आदी विहित मुदतीत मिळण्यासाठी ऑनलाईन सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी महाराष्ट्र नवनिर्माण शिक्षक, शिक्षकेतर सेनेचे महेश जोशी, शरद भांडारकर, संजय चामट, मनोज घोडके, नितीन किटे, नंदकिशोर उजवणे, अशोक डहाके, दीपचंद पेनकांडे, चंद्रकांत मासूरकर, अरविंद आसरे, प्रवीण मेश्राम, मोरेश्वर तडसे, तुकाराम ठोंबरे, हरिश्चंद्र दहाघाणे, श्रीराम वाघे, रूपचंद फोपसे, सुनील नासरे, संजय केने, अलका पालवे, भावना काळाने आदींनी केली आहे.