शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
2
फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
3
भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
4
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
5
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
6
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
7
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
8
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
9
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
10
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
11
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
12
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
13
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा
14
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
15
स्वतःच्या पायावर धोंडा, अमेरिकेच्या व्हिसा धोरणावरून भयकंप; पुढे काय अन् निर्णयामागे काय? जाणून घ्या
16
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
17
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
18
कामाचा जास्त ताण घेता? हेल्थ कोण सांभाळणार? आतापासूनच घ्या 'या' गोष्टींची काळजी
19
सामान्य माणसाला न्याय हे बळकट लोकशाहीचे प्रतिक - सरन्यायाधीश भूषण गवई
20
जगप्रसिद्ध ऑर्थोपेडिक सर्जन राणावत यांचे निधन; ९०व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

किमान १० हजार रुपये मानधन द्या : आशा कर्मचाऱ्यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2019 23:47 IST

आशा कर्मचाऱ्यांना किमान १० हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना किमान १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न(सीटू)तर्फे सोमवारी संविधान चौकात थाली बजाओ आंदोलन करीत लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात आशा कर्मचारी व गटप्रवर्तक हातात ताट व चम्मच घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताट (थाळी) वाजवून त्यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

ठळक मुद्दे‘थाली बजाओ’आंदोलनाने वेधले लक्ष

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आशा कर्मचाऱ्यांना किमान १० हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना किमान १५ हजार रुपये मानधन देण्यात यावे, अशी मागणी आशा कर्मचाऱ्यांनी केली आहे. या मागणीसाठी सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स संलग्न(सीटू)तर्फे सोमवारी संविधान चौकात थाली बजाओ आंदोलन करीत लक्ष वेधण्यात आले. या आंदोलनात आशा कर्मचारी व गटप्रवर्तक हातात ताट व चम्मच घेऊन मोठ्या संख्येने उपस्थित होते. ताट (थाळी) वाजवून त्यांनी शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.आंदोलनाबद्दल संस्थेचे नागपूर जिल्हा कमेटी अध्यक्ष राजेंद्र साठे यांनी सांगितले की, आशा कर्मचाऱ्यांना किमान १० हजार रुपये मानधन व गटप्रवर्तकांना किमान १५ हजार मानधन देण्यात यायला हवे तसेच कर्मचाऱ्यांना शासनाने मानधन तत्त्वावर न ठेवता वेतन तत्त्वावर कामात सामावून घ्यायला हवे, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. अशाच प्रकारचे आंदोलन संपूर्ण राज्यात होत असून, याबाबतचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार आहे. मध्यंतरी तत्कालीन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची कृती समितीच्या कार्यकर्त्यांनी भेट घेतली तेव्हा त्यांनी याबाबत लवकर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. परंतु,अद्यापही आश्वासन पूर्ण करण्यात आले नाही. आंध्र प्रदेश सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने निर्णय ताबडतोब घ्यावा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. याप्रसंगी संघटनेच्या महासचिव प्रीती मेश्राम, रंजना पौनीकर, मंदा गंधारे, रूपलता कांबळे, पौर्णिमा पाटील, लक्ष्मी कोटेजवार, वंदना बहादुरे, कल्पना हटवार, मीता भांडारकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :WomenमहिलाEmployeeकर्मचारीagitationआंदोलन