शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

वारंवार रद्द होणाऱ्या आणि उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी त्रस्त

By नरेश डोंगरे | Updated: August 22, 2024 18:28 IST

Nagpur : अनेक दिवसांपासून विकासकामांचे दाखले देऊन विविध मार्गावरच्या गाड्या रद्द

नरेश डोंगरे - नागपूर        

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वारंवार रद्द होणाऱ्या आणि उशिरा धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवासी अक्षरश: वैतागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही त्रासदायक मालिका कधी थांबणार, असा प्रश्न त्रस्त झालेले रेल्वे प्रवासी विचारत आहेत.

देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरून देशाच्या सर्वच भागात रेल्वेगाड्या जातात आणि येतात. येथून ठिकठिकाणी जाणाऱ्या आणि येथे उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. रेल्वेने प्रवास करणारी मंडळी अनेक दिवसांपूर्वीच आपले प्रवासाचे नियोजन करून ठेवतात. कधी, कोणत्या गाडीने जायचे, कधी परत यायचे, हे खूप दिवसांपूर्वीच ठरवून तशा प्रकारे रिझर्वेशन केले जाते. असे असताना ऐनवेळी नियोजन केलेली गाडीच रद्द होत असेल किंवा उशिरा येत असेल तर प्रवासाचे नियोजन गडबडते. गाडी रद्द झाल्यास दुसऱ्या गाडीने जातो म्हटले तर पुन्हा रिझर्वेशनची अर्थात कन्फर्म तिकिटाची समस्या निर्माण होते. गेल्या अनेक दिवसांपासून विकासकामांचे दाखले देऊन विविध मार्गावरच्या गाड्या रद्द करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचप्रमाणे काही गाड्या विलंबाने नागपुरात पोहचत आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचे नियोजन रोजच्या रोज बिघडत आहे. रेल्वे प्रशासन रद्द करण्यात आलेल्या किंवा उशिरा पोहचणाऱ्या गाड्यांच्या संबंधाने दिलगिरी व्यक्त करून मोकळे होत आहेत. मात्र, महत्वाच्या कामासाठी, बैठकीसाठी, व्यवहाराच्या संबंधाने बोलणी करण्यासाठी अनेक दिवसांपूर्वीच नियोजन करून ठेवणाऱ्या प्रवाशांना मात्र त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील शेकडो रुग्ण रोज उपचारासाठी नागपुरात पोहचतात. व्यापारीही खरेदीच्या आणि देवाण-घेवाणीच्या निमित्ताने नागपुरात येतात. मात्र, गाडी रद्द होत असल्याने किंवा विलंबाने धावत असल्याने त्यांना एकाच दिवसात नागपुरात येऊन आणि येथून काम आटोपून परत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना येथे मुक्काम करण्यासाठी वेगळा खर्च करावा लागतो. वेळही जाते आणि त्रासही होतो. सारखे-सारखे गाड्या रद्द होण्याची आणि वेळेवर गाडी न पोहचण्याची मालिका सुरूच असल्याने ती कधी थांबणार, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.

कर्मचाऱ्यांनाही लेटलतिफीचा फटकानागपूरहून नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या तसेच गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आदी ठिकाणाहून नोकरीच्या निमित्ताने नागपूरात येणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कार्यालयीन वेळ लक्षात ठेवून ही मंडळी रेल्वेने अपडाऊन करण्यासाठी घरून आणि कार्यालयातून बाहेर पडतात. मात्र, उपरोक्त प्रकारामुळे त्यांचेही अनेकदा नियोजन बिघडते. कार्यालयात पोहचण्यास त्यांना उशिर होतो, त्यामुळे कार्यालयीन कामावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे रेल्वेच्या लेटलतिफीचा फटका त्यांनाही सहन करावा लागत आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर