शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, निवडणूक आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली
2
IND vs SA : गौतम गंभीरचा राजीनामा द्यायला नकार! म्हणाला, "मी जिंकवलेल्या मालिका आठवा..!!"
3
झेपत असेल तरच बघा...! एकाने झेप्टोच्या डिलिव्हरी बॉयवर हात उचलला, तो पुरी पलटनच घेऊन आला...
4
हर्बालाइफचा नवा 'लिफ्ट ऑफ' – शून्य साखर असलेलं, ऊर्जा देणारं इफर्व्हेसंट ड्रिंक, तुमचा दिवस बनवा अधिक जोमदार 
5
भारतात टेस्ला कारच्या किमतीत २० लाख रुपयांची घट होण्याची शक्यता; मस्क कंपनीची उडाली घाबरगुंडी...
6
अल-कायदाचा कमांडर; पाकिस्तानमध्ये लपलाय हाफिज सईदपेक्षा मोठा दहशतवादी, अमेरिकेच्या टार्गेटवर!
7
FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...
8
चेतेश्वर पुजाराच्या मेव्हण्याने संपवलं जीवन, जिच्याशी ठरलेलं लग्न तिनेच केलेले 'तसले' आरोप
9
इम्रान खान यांची तुरुंगात हत्या? अफगाणी मीडियाचा मोठा दावा, पाकिस्तानात खळबळ...
10
जय श्रीराम! सर्वांत श्रीमंत मंदिरांच्या यादीत राम मंदिर, किती कोटींची झाली कमाई? आकडे पाहाच
11
१२ महिन्यांमध्ये २९,००० अंकांच्या पार जाणार निफ्टी? रिकव्हरीच्या ट्रॅकवर जातोय का इंडेक्स?
12
टीम इंडियावर 'वाईट'वॉशची नामुष्की, सर्वात मोठा पराभव; द. आफ्रिकेचा २५ वर्षांनंतर मालिका विजयाचा पराक्रम
13
बायकोची हत्या केल्याच्या आरोपाखाली पती चार महिने तुरुंगात अन् पत्नी दिल्लीत प्रियकरासोबत आनंदात!
14
लष्करात सैनिकांची कमतरता! आता दरवर्षी १ लाख अग्निवीरांची भरती केली होणार
15
Kamla Pasand Owner Net Worth: कमला पसंदचे मालक कोण आणि किती आहे नेटवर्थ? एकेकाळी रस्त्याच्या कडेला विकायचे पान मसाला
16
ICC ODI Rankings : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेआधी हिटमॅन रोहित शर्मा पुन्हा 'नंबर वन'
17
५ लाखांपर्यंतचे उपचार फ्री! आता घरबसल्या बनवा 'आयुष्मान कार्ड'! 'या' कागदपत्रांची आवश्यकता
18
SIR मुळे पश्चिम बंगालमधील 23 बीएलओंचा मृत्यू? सर्वोच्च न्यायालयाचे निवडणूक आयोगाला 'हे' निर्देश
19
लग्न पुढे ढकललं... पोस्ट डिलीट... उलटसुलट चर्चा...; अशातच स्मृती मंधानाचा आणखी एक मोठा निर्णय, जाणून घ्या
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी, खरेदीपूर्वी पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
Daily Top 2Weekly Top 5

वारंवार रद्द होणाऱ्या आणि उशिरा धावणाऱ्या गाड्यांमुळे प्रवासी त्रस्त

By नरेश डोंगरे | Updated: August 22, 2024 18:28 IST

Nagpur : अनेक दिवसांपासून विकासकामांचे दाखले देऊन विविध मार्गावरच्या गाड्या रद्द

नरेश डोंगरे - नागपूर        

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : वारंवार रद्द होणाऱ्या आणि उशिरा धावणाऱ्या रेल्वे गाड्यांमुळे प्रवासी अक्षरश: वैतागले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेली ही त्रासदायक मालिका कधी थांबणार, असा प्रश्न त्रस्त झालेले रेल्वे प्रवासी विचारत आहेत.

देशाचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या नागपूर रेल्वे स्थानकावरून देशाच्या सर्वच भागात रेल्वेगाड्या जातात आणि येतात. येथून ठिकठिकाणी जाणाऱ्या आणि येथे उतरणाऱ्या प्रवाशांची संख्या हजारोंच्या घरात आहे. रेल्वेने प्रवास करणारी मंडळी अनेक दिवसांपूर्वीच आपले प्रवासाचे नियोजन करून ठेवतात. कधी, कोणत्या गाडीने जायचे, कधी परत यायचे, हे खूप दिवसांपूर्वीच ठरवून तशा प्रकारे रिझर्वेशन केले जाते. असे असताना ऐनवेळी नियोजन केलेली गाडीच रद्द होत असेल किंवा उशिरा येत असेल तर प्रवासाचे नियोजन गडबडते. गाडी रद्द झाल्यास दुसऱ्या गाडीने जातो म्हटले तर पुन्हा रिझर्वेशनची अर्थात कन्फर्म तिकिटाची समस्या निर्माण होते. गेल्या अनेक दिवसांपासून विकासकामांचे दाखले देऊन विविध मार्गावरच्या गाड्या रद्द करण्याचे प्रकार सुरू आहेत. त्याचप्रमाणे काही गाड्या विलंबाने नागपुरात पोहचत आहेत. त्यामुळे हजारो प्रवाशांचे नियोजन रोजच्या रोज बिघडत आहे. रेल्वे प्रशासन रद्द करण्यात आलेल्या किंवा उशिरा पोहचणाऱ्या गाड्यांच्या संबंधाने दिलगिरी व्यक्त करून मोकळे होत आहेत. मात्र, महत्वाच्या कामासाठी, बैठकीसाठी, व्यवहाराच्या संबंधाने बोलणी करण्यासाठी अनेक दिवसांपूर्वीच नियोजन करून ठेवणाऱ्या प्रवाशांना मात्र त्याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे.

मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील शेकडो रुग्ण रोज उपचारासाठी नागपुरात पोहचतात. व्यापारीही खरेदीच्या आणि देवाण-घेवाणीच्या निमित्ताने नागपुरात येतात. मात्र, गाडी रद्द होत असल्याने किंवा विलंबाने धावत असल्याने त्यांना एकाच दिवसात नागपुरात येऊन आणि येथून काम आटोपून परत जाणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यांना येथे मुक्काम करण्यासाठी वेगळा खर्च करावा लागतो. वेळही जाते आणि त्रासही होतो. सारखे-सारखे गाड्या रद्द होण्याची आणि वेळेवर गाडी न पोहचण्याची मालिका सुरूच असल्याने ती कधी थांबणार, असा प्रश्न त्यांच्याकडून उपस्थित होत आहे.

कर्मचाऱ्यांनाही लेटलतिफीचा फटकानागपूरहून नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी जाणाऱ्या तसेच गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, वर्धा, अमरावती आदी ठिकाणाहून नोकरीच्या निमित्ताने नागपूरात येणाऱ्या शासकीय अधिकारी, कर्मचाऱ्यांची संख्याही मोठी आहे. कार्यालयीन वेळ लक्षात ठेवून ही मंडळी रेल्वेने अपडाऊन करण्यासाठी घरून आणि कार्यालयातून बाहेर पडतात. मात्र, उपरोक्त प्रकारामुळे त्यांचेही अनेकदा नियोजन बिघडते. कार्यालयात पोहचण्यास त्यांना उशिर होतो, त्यामुळे कार्यालयीन कामावर त्याचा परिणाम होतो. त्यामुळे रेल्वेच्या लेटलतिफीचा फटका त्यांनाही सहन करावा लागत आहे.

 

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर