शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
4
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
5
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
6
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
7
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
8
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
9
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
10
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
11
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
12
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
13
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
14
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
15
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
16
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
17
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
18
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
19
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
20
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या विकास कामांचा प्रवाशांना फटका

By नरेश डोंगरे | Updated: March 24, 2024 21:04 IST

कोरोना काळात बंद झालेली दादाधाम एक्सप्रेस, आमला पॅसेंजर बंदच : नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर ऐवजी अदिलाबादहून

नागपूर: प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. या विकासकामांमुळे अनेक रेल्वेगाड्यांची गती मंदावली असून, कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या काही गाड्या अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून हजारो कोटी खर्चाच्या अनेक परियोजना सर्वत्र राबविल्या जात आहे. काही ठिकानी अॅटोमेटिक सिग्नलिंगचे काम सुरू आहे. तर, काही ठिकाणी थर्ड आणि फोर्थ लाईन टाकली जात आहे. अजनी, नागपूर, गोधनी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे करतानाच अनेक पॅसेंजर रेल्वेगाड्या कोविड काळात बंद झाल्या होत्या त्या सुरूच करण्यात आलेल्या नाही.

कोरोना काळात नागपूर-भुसावळ दादाधाम एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. ती सुरूच करण्यात आली नाही. आमला पॅसेंजरचेही तसेच आहे. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर ऐवजी आदिलाबाद येथून चालविली जात आहे.

भारताचा मध्यबिंदू असलेल्या नागपुरातून काही ठिकाणी सुपरफास्ट गाड्या चालविल्या जाव्या, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. विशेष म्हणजे, नागपूरमध्ये रेल्वेच्या दोन महत्वपूर्ण विभागांचे अर्थात मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय मुख्यालय आहे. या दोन्ही कार्यालयाकडून आवश्यक मागण्या बोर्डाकडे पाठविल्या जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर पासून पुण्यासाठी सुपरफास्ट ट्रेन चालविण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, त्याकडे लक्ष दिले गेलेले नाही. सणासुदीत नागपूरातून प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढते. होळी निमित्तानेही विविध रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने विविध मार्गावर होळी स्पेशल ट्रेन सुरू केल्या. मात्र, नागपुरातून बाहेरगावी, परप्रांतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता येथून जाणाऱ्या ट्रेन अपुऱ्या पडत असल्याची चर्चा आहे.

विविध मार्गांवर नव्या गाड्यांची गरजविविध मार्गावर सध्या तिसऱ्या आणि चाैथ्या रेल्वे लाईनची कामे वेगात सुरू आहे. अनेक मार्गावर हे काम पूर्णही झाले आहे. त्यामुळे नव्या मेमू गाड्यांसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी आहे. खास करून वर्षभर प्रवाशांची मोठी वर्दळ राहणाऱ्या नागपूरहून छिंदवाडा, गोंदिया, नागभिड, अमरावतीसाठी नवीन मेमू ट्रेन चालविण्याची गरज आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर