शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेच्या विकास कामांचा प्रवाशांना फटका

By नरेश डोंगरे | Updated: March 24, 2024 21:04 IST

कोरोना काळात बंद झालेली दादाधाम एक्सप्रेस, आमला पॅसेंजर बंदच : नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर ऐवजी अदिलाबादहून

नागपूर: प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. या विकासकामांमुळे अनेक रेल्वेगाड्यांची गती मंदावली असून, कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या काही गाड्या अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून हजारो कोटी खर्चाच्या अनेक परियोजना सर्वत्र राबविल्या जात आहे. काही ठिकानी अॅटोमेटिक सिग्नलिंगचे काम सुरू आहे. तर, काही ठिकाणी थर्ड आणि फोर्थ लाईन टाकली जात आहे. अजनी, नागपूर, गोधनी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे करतानाच अनेक पॅसेंजर रेल्वेगाड्या कोविड काळात बंद झाल्या होत्या त्या सुरूच करण्यात आलेल्या नाही.

कोरोना काळात नागपूर-भुसावळ दादाधाम एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. ती सुरूच करण्यात आली नाही. आमला पॅसेंजरचेही तसेच आहे. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर ऐवजी आदिलाबाद येथून चालविली जात आहे.

भारताचा मध्यबिंदू असलेल्या नागपुरातून काही ठिकाणी सुपरफास्ट गाड्या चालविल्या जाव्या, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. विशेष म्हणजे, नागपूरमध्ये रेल्वेच्या दोन महत्वपूर्ण विभागांचे अर्थात मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय मुख्यालय आहे. या दोन्ही कार्यालयाकडून आवश्यक मागण्या बोर्डाकडे पाठविल्या जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर पासून पुण्यासाठी सुपरफास्ट ट्रेन चालविण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, त्याकडे लक्ष दिले गेलेले नाही. सणासुदीत नागपूरातून प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढते. होळी निमित्तानेही विविध रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने विविध मार्गावर होळी स्पेशल ट्रेन सुरू केल्या. मात्र, नागपुरातून बाहेरगावी, परप्रांतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता येथून जाणाऱ्या ट्रेन अपुऱ्या पडत असल्याची चर्चा आहे.

विविध मार्गांवर नव्या गाड्यांची गरजविविध मार्गावर सध्या तिसऱ्या आणि चाैथ्या रेल्वे लाईनची कामे वेगात सुरू आहे. अनेक मार्गावर हे काम पूर्णही झाले आहे. त्यामुळे नव्या मेमू गाड्यांसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी आहे. खास करून वर्षभर प्रवाशांची मोठी वर्दळ राहणाऱ्या नागपूरहून छिंदवाडा, गोंदिया, नागभिड, अमरावतीसाठी नवीन मेमू ट्रेन चालविण्याची गरज आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर