शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

रेल्वेच्या विकास कामांचा प्रवाशांना फटका

By नरेश डोंगरे | Updated: March 24, 2024 21:04 IST

कोरोना काळात बंद झालेली दादाधाम एक्सप्रेस, आमला पॅसेंजर बंदच : नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर ऐवजी अदिलाबादहून

नागपूर: प्रवाशांना चांगली सेवा देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मोठ्या प्रमाणात विकास कामे केली जात आहेत. या विकासकामांमुळे अनेक रेल्वेगाड्यांची गती मंदावली असून, कोरोना काळात बंद करण्यात आलेल्या काही गाड्या अद्याप सुरू न झाल्याने प्रवाशांना चांगलाच फटका बसत आहे.

रेल्वे मंत्रालयाकडून हजारो कोटी खर्चाच्या अनेक परियोजना सर्वत्र राबविल्या जात आहे. काही ठिकानी अॅटोमेटिक सिग्नलिंगचे काम सुरू आहे. तर, काही ठिकाणी थर्ड आणि फोर्थ लाईन टाकली जात आहे. अजनी, नागपूर, गोधनी आणि नेताजी सुभाषचंद्र बोस ईतवारी रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासाचे काम सुरू करण्यात आले आहे. हे करतानाच अनेक पॅसेंजर रेल्वेगाड्या कोविड काळात बंद झाल्या होत्या त्या सुरूच करण्यात आलेल्या नाही.

कोरोना काळात नागपूर-भुसावळ दादाधाम एक्सप्रेस बंद करण्यात आली होती. ती सुरूच करण्यात आली नाही. आमला पॅसेंजरचेही तसेच आहे. नागपूर-मुंबई नंदीग्राम एक्सप्रेस नागपूर ऐवजी आदिलाबाद येथून चालविली जात आहे.

भारताचा मध्यबिंदू असलेल्या नागपुरातून काही ठिकाणी सुपरफास्ट गाड्या चालविल्या जाव्या, अशी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. विशेष म्हणजे, नागपूरमध्ये रेल्वेच्या दोन महत्वपूर्ण विभागांचे अर्थात मध्य रेल्वे आणि दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय मुख्यालय आहे. या दोन्ही कार्यालयाकडून आवश्यक मागण्या बोर्डाकडे पाठविल्या जातात. सूत्रांच्या माहितीनुसार, नागपूर पासून पुण्यासाठी सुपरफास्ट ट्रेन चालविण्याची मागणी अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र, त्याकडे लक्ष दिले गेलेले नाही. सणासुदीत नागपूरातून प्रवाशांची प्रचंड गर्दी वाढते. होळी निमित्तानेही विविध रेल्वेगाड्यांमध्ये प्रचंड गर्दी वाढली आहे. रेल्वे प्रशासनाने विविध मार्गावर होळी स्पेशल ट्रेन सुरू केल्या. मात्र, नागपुरातून बाहेरगावी, परप्रांतात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षात घेता येथून जाणाऱ्या ट्रेन अपुऱ्या पडत असल्याची चर्चा आहे.

विविध मार्गांवर नव्या गाड्यांची गरजविविध मार्गावर सध्या तिसऱ्या आणि चाैथ्या रेल्वे लाईनची कामे वेगात सुरू आहे. अनेक मार्गावर हे काम पूर्णही झाले आहे. त्यामुळे नव्या मेमू गाड्यांसाठी प्रस्ताव पाठविण्यात यावा, अशी मागणी आहे. खास करून वर्षभर प्रवाशांची मोठी वर्दळ राहणाऱ्या नागपूरहून छिंदवाडा, गोंदिया, नागभिड, अमरावतीसाठी नवीन मेमू ट्रेन चालविण्याची गरज आहे.

टॅग्स :railwayरेल्वेnagpurनागपूर