शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

मेट्रोची प्रवासी संख्या पोहोचली १.१० लाखावर; कामठी मार्ग, सेंट्रल एव्हेन्यू ‘इफेक्ट’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2022 12:02 IST

लोकार्पणानंतर प्रवाशांची मेट्रो रेल्वेत गर्दी

नागपूर : आतापर्यंत सर्वाधिक प्रवासी संख्या ९१ हजार असलेल्या मेट्रो रेल्वेतून लोकार्पणानंतर दुसऱ्या दिवशी जवळपास १.१० लाख नागरिकांनी प्रवास केला. लोकांची मेट्रो रेल्वेतून प्रवासाची आवड वाढल्यामुळे ही संख्या दिवसेंदिवस वाढणार आहे. मेट्रोचा कामठी मार्ग आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्ग सुरू झाल्याचा सकारात्मक परिणाम आहे. रविवारी जवळपास ८० हजार प्रवासी संख्येची नोंद झाली.

रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मेट्रो रेल्वेच्या दोन मार्गाचे लोकार्पण केले. त्यानंतर दुपारी १२ वाजता कामठी रोड आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर प्रवासी सेवा सुरू झाली. ही सेवा सकाळी ६.३० ते रात्री १०.३० वाजेपर्यंत दर १५ मिनिटांनी सुरू आहे.

मेट्रोच्या कामठी आणि सेंट्रल एव्हेन्यू मार्गावर मेट्रो सुरू होण्याची नागरिकांना अनेक दिवसांपासून प्रतीक्षा होती. लोकार्पणानंतर प्रवाशांसाठी हा मार्ग खुला झाला. सोमवारी सकाळीपासून या दोन्ही नवीन मार्गावर प्रवाशांची गर्दी दिसून आली. काही वर्षांआधी पाठ फिरविलेल्या प्रवाशांना आता मेट्रो रेल्वे आवडीची ठरू लागली आहे. वाढती गर्दी लक्षात घेता महामेट्रोने विविध स्टेशनवर अतिरिक्त कर्मचारी तैनात केले होते. सोमवार सकाळीपासून कस्तुरचंद पार्क ते ऑटोमोटिव्ह चौक या कामठी मार्गावर आणि प्रजापतीनगर ते सीताबर्डी इंटरचेंज अर्थात सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील स्टेशनवर प्रवाशांची गर्दी दिसून आली. आता मेट्रो शहराच्या चारही बाजूने सुरू झाल्याने ही आकडेवारी दुप्पट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

दिनांक - प्रवासी संख्या

  • १५ ऑगस्ट - ९१ हजार ३९१
  • ५ ऑक्टोबर - ८३ हजार ८७६
  • १४ नोव्हेंबर - ८२ हजार ९२५
  • २३ सप्टेंबर - ८० हजार ८१४
  • २३ नोव्हेंबर - ७९ हजार ८९५
  • १२ डिसेंबर - १.१० लाख
टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर