शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

पक्षाची फोडाफोडी हा भाजपचा व्यभिचारच : जयंत पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2019 23:00 IST

भाजपाने सर्रास अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा चालविला आहे. पक्ष फोडण्याचे हे काम म्हणजे राजकीय व्यभिचार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी नागपुरातील सभेत केली.

ठळक मुद्देफडणवीसांनी स्वपक्षात कुणी नेताच ठेवला नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : स्वत:च्या पक्षातील निष्ठावंतांना सतरंज्या उचलायला लावून बाहेरून आणलेल्यांना तिकीट देण्याचे काम भाजपा करीत आहे. भाजपाने सर्रास अन्य पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घेण्याचा सपाटा चालविला आहे. पक्ष फोडण्याचे हे काम म्हणजे राजकीय व्यभिचार आहे, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बुधवारी नागपुरातील सभेत केली.पक्षाच्या वतीने काढण्यात आलेल्या शिवस्वराज्य यात्रेचा तिसरा टप्पा सुरू असून, ही यात्रा विदर्भात फिरत आहे. दक्षिण नागपूर विधानसभा मतदार संघामध्ये महाकाळकर सभागृहात सायंकाळी जाहीर सभा झाली. त्यावेळी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार डॉ. अमोल कोल्हे, राष्ट्रीय अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्ष शब्बीर अहमद विद्रोही, माजी आमदार दीनानाथ पडोळे, मनपा गटनेते दुनेश्वर पेठे, कार्याध्यक्ष जावेद हबीब, प्रवक्ता राजकुमार नागुलवार, उपाध्यक्ष ज्वाला धोटे, महेंद्र भांगे आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना जयंत पाटील म्हणाले, मोदींसारखेच मुख्यमंत्री फडणवीसांचे काम सुरू आहे. त्यांनी पक्षात कुणीच नेता शिल्लक ठेवला नाही; तसाच फडणवीसांनीही महाराष्ट्रात कित्ता गिरविणे सुरू केले आहे. नितीन गडकरींकडे पूर्वी अनेक खाती होती. आता फक्त एकच खाते राहिले आहे.पाटील म्हणाले, आम्ही ज्यांना पक्षात ताकद दिली त्यांनाच भाजपा उचलत आहे. त्यांना जनतेचा प्रतिसाद आहे, असे ते सांगतात. तर दुसऱ्यांच्या पक्षातील नेते कशाला उचलता, स्वत:च्याच पक्षातील लोकांना तिकिटा का देत नाही?नागपुरातील मेट्रोच्या कामावर त्यांनी टीका केली. मेट्रोला लावलेला पैसा सर्वसामान्यांसाठी खर्च केला असता तर गरिबांची दैना दूर झाली असती. १० ते १५ किलोमीटरच्या प्रवासासाठी मेट्रोचा प्रकल्प आणून हे सरकार नेमका काय विकास साधणार आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केल४२ आमदार, मुख्यमंत्री, वित्तमंत्री तरीही विदर्भाच्या विकासाचे काय? : अमोल कोल्हेखा. डॉ. अमोल कोल्हे यांनी आपल्या भाषणातून अनेक प्रश्न उपस्थित केले. ते म्हणाले, भाजपाने वेगळ्या विदर्भ राज्य निर्मितीचे आमिष दाखविल्याने जनतेने ४२ आमदार निवडून दिले. विदर्भाचे पारडे जड झाल्याने मुख्यमंत्री, वित्तमंत्री पदासह डझनभर मंत्री विदर्भात दिले. मात्र विदर्भाच्या विकासाचे काय झाले, राज्य निर्मितीचे काय झाले? मिहानमध्ये पाच वर्षांत ५०० जणांना तरी नोकऱ्या मिळाल्या का? पाच वर्षांत १६ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. पाच वर्षात राज्यावरील कर्ज पटीने वाढले. पोलीस भरतीमध्ये ओबीसी, एससी प्रवर्गासाठी जागा नाहीत. मुख्यमंत्र्यांचे नागपूर शहर क्राईम कॅपिटल होण्याच्या मार्गावर आहे. या सरकारने अपेक्षाभंग केला. महाराष्ट्रातील तरुणांच्या जीवाशी खेळण्याचे काम या सरकारने केल्याचा आरोप त्यांनी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसJayant Patilजयंत पाटील