शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

मेडिकल कॉलेज इस्पितळात पक्षाघाताच्या रुग्णांत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2018 21:56 IST

वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण अलीकडे ४० ते ५० वयोगटांमध्येही दिसून येत आहे. हा आजार अपंगत्व व मृत्यूचे चवथे मोठे कारण आहे. सध्या थंडीवाढताच मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. रोज सकाळच्यावेळेत दोन-तीन रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देसकाळच्या वेळेत रुग्ण वाढले

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : वयाच्या साधारणपणे ६० नंतर दिसणाऱ्या पक्षाघाताचे प्रमाण अलीकडे ४० ते ५० वयोगटांमध्येही दिसून येत आहे. हा आजार अपंगत्व व मृत्यूचे चवथे मोठे कारण आहे. सध्या थंडीवाढताच मेडिकलमध्ये या आजाराच्या रुग्णांत वाढ झाली आहे. रोज सकाळच्यावेळेत दोन-तीन रुग्ण येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे.शरीराच्या कोणत्याही अवयवाचे अचानक नियंत्रण जाणे याला पक्षाघात, ‘पॅरालिसीस’, लकवा किंवा ‘स्ट्रोक’ असे म्हणतात. मेंदूतील किंवा मज्जातंतूमधील पेशींनी अचानक काम करणे बंद केल्यामुळे ‘पॅरालिसीस’ होतो. त्यामुळे शरीराच्या काही विशिष्ट अवयवांवर नियंत्रण ठेवता येत नाही. स्वत:च्या इच्छेप्रमाणे हात किंवा पाय हलवता येत नाही. या आजाराबद्दल बहुसंख्य लोकांना अजूनही पुरेशी माहिती नाही. त्यामुळे अनेकांना योग्य वेळेत उपचार मिळत नाहीत. परिणामी, जन्मभर अपंगत्व किंवा रुग्ण मृत्यूलाही सामोर जातो. तोंड वाकडे होणे, पायांमध्ये कमजोरी येणे, तोल जाणे, चालताना त्रास होणे, बोलण्यात फरक पडणे, अंधुक दिसणे ही पक्षाघाताची लक्षणे आहेत. ही लक्षणे दिसताच तत्काळ उपचार घेतल्यास मृत्यू व अपंगत्व टाळता येते. आनुवंशिकता, उच्चरक्तदाब, कोलेस्ट्रॉल, हृदय विकार, हृदयाचे अनियमित ठोके, हृदयविकाराचा सौम्य झटका किंवा हृदयघात, मधुमेह, लठ्ठपणा, झोपेदरम्यान अनियमित श्वासोच्छवास, ३५ वर्षाखालील धूम्रपान करणाऱ्या महिलांद्वारे गर्भनिरोधक गोळ्यांचे अतिसेवन, कामाचा ताण व कामाचे अनियमित स्वरूप, स्पर्धात्मक वातावरण, पुरेशा झोपेचा अभाव, पॅकेटमधील खाद्य पदार्थांचा वाढता वापर आदी कारणांमुळे पक्षाघात होतो. सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (मेडिकल) पक्षाघाताचे रुग्ण वाढल्याचे औषधवैद्यकशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. वाय. व्ही. बन्सोड यांचे म्हणणे आहे. त्यांच्यामते, नोव्हेंबर ते जानेवारी या महिन्यांत थंडी पडते. आपले रक्त काही प्रमाणात जाड होते. याला इतरही घटक कारणीभूत ठरतात. परिणामी, पक्षाघात येतो. सध्या मेडिकलमध्ये रोज दोन-तीन रुग्ण उपचारासाठी येत आहेत. यात सकाळच्यावेळेत येणाऱ्या रुग्णांची संख्या मोठी आहे, असेही ते म्हणाले.गोल्डन अवरमध्ये उपचार आवश्यकपक्षाघाताची लक्षणे दिसताच उपचार मिळाल्यास या आजराचे घातक परिणाम कमी करता येतात. यामुळे रुग्णाला ‘गोल्डन अव्हर’मध्ये उपचार मिळणे आवश्यक आहे. परंतु चोर पावलांनी येणारा हा आजार रात्री झोपत आल्यास सकाळी रुग्णालयात पोहचेपर्यंत बराच उशीर होतो. परिणामी, सतर्क असणे आवश्यक आहे.डॉ. वाय. व्ही. बन्सोडविभाग प्रमुख, औषधवैद्यक शास्त्र विभाग, मेडिकल

टॅग्स :Government Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयHealthआरोग्य