शहरं
Join us  
Trending Stories
1
कबुतरखान्यांबद्दल 'सर्वोच्च' निर्णय आला, आता सरकार काय करणार? CM फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
2
PM Modi and Zelenskyy phone Call : युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी PM मोदींशी चर्चा केली; लवकरच भारत दौऱ्यावर येऊ शकतात
3
Donald Trump's Tariffs : मोठी तयारी! कर लादणाऱ्या अमेरिकेला धक्का बसणार! भारत या शस्त्राचा वापर करणार
4
ट्रेनिंगमध्ये जुळले सूत, स्वीटीसोबत लग्नानंतरही शरीरसंबंध; आता आयुष्यातूनच उठला, पोलीस उपनिरीक्षक महिलेला अटक
5
नाशिकमध्ये शिंदेसेनेच्या बैठकीत अहिल्यानगरचे दोन गट भिडले; शरद पवार गटाचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा दावा
6
Bank Job: बँकेत नोकरी करण्याचे स्वप्न पूर्ण होणार; आयओबीमध्ये भरती, महाराष्ट्रासाठी 'इतक्या' जागा राखीव
7
टी-२० आशिया कपमध्ये सर्वात मोठी खेळी करणारे टॉप-५ फलंदाज!
8
Dadar Kabutarkhana Ban : मोठी बातमी! कबुतरखान्यांवरील बंदीबाबत सुप्रीम कोर्टाने दिला महत्वाचा निर्णय
9
Ramdas Athawale : Video - "राहुल गांधी निवडणूक आयोगाला घाबरतात, म्हणूनच ते..."; रामदास आठवलेंचा हल्लाबोल
10
अरेरेरे! तीन वर्षांच्या लेकीलाच बापाने खाऊ खातले विषारी बिस्किट; पत्नीचा पतीवर गंभीर आरोप
11
सोन्याचं नक्षीकाम, एकधारी पातं, मुल्हेरी मूठ... महाराष्ट्राने लिलावात जिंकली 'फिरंग' तलवार (PHOTOS)
12
Rahul Gandhi's Allegations Against Election Commission : 'मी सही करणार नाही, हा निवडणूक आयोगाचा डेटा..', राहुल गांधींचे प्रत्युत्तर, म्हणाले- निवडणूक आयोग दिशाभूल करतेय
13
'आम्ही अशा धमक्यांपुढे झुकणार नाही', असीम मुनीरच्या धमकीवर भारताचे सडेतोड उत्तर
14
ट्रेनच्या फूटबोर्डवर बसताच गर्दुल्ल्याचा हल्ला; तोल जाऊन खाली पडलेल्या प्रवाशाने पाय गमावला, आरोपीला अटक
15
ChatGPT चा सल्ला घेणं बेतलं जीवावर, मिठाऐवजी खाल्लं 'विष', नेमकं काय आहे हे प्रकरण?
16
शेकडो वाहनांचा ताफा, फुलांचा वर्षाव, इंग्लंड दौरा गाजवणाऱ्या आकाश दीपचं घरी जंगी स्वागत
17
लंडन: शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची ऐतिहासिक तलवार महाराष्ट्र सरकारच्या ताब्यात
18
याला म्हणतात शेअर...! 39 दिवसांपासून सातत्याने लागतंय अप्पर सर्किट, ₹63 वर आलाय भाव; करतोय मालामाल
19
भाजपच्या उपमुख्यमंत्र्यांकडेच दोन मतदान ओळखपत्र; निवडणूक आयोगाची नोटीस, बिहारमध्ये काय घडलं?
20
"माझं घर वाचवा...", कवी सौमित्र यांची मुख्यमंत्र्यांना कळकळीची विनंती, बिल्डरकडून फसवणुकीचा आरोप

दिल्लीच्या पेपरफुटीचे नागपूरच्या विद्यार्थ्यांना टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 20:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याने सीबीएसई पुन्हा फेरपरीक्षा घेणार आहे. दुबार पेपर द्यावा लागणार असल्याने विद्यार्थी टेन्शनमध्ये आले आहेत. पालकांनीही बोर्डाच्या या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या मते, पेपर दिल्लीत फुटला आहे, त्याचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील ...

ठळक मुद्देगुणांवर परिणाम होण्याची भीती : प्राचार्य म्हणतात, रिलॅक्सेशन मिळायला हवे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याने सीबीएसई पुन्हा फेरपरीक्षा घेणार आहे. दुबार पेपर द्यावा लागणार असल्याने विद्यार्थी टेन्शनमध्ये आले आहेत. पालकांनीही बोर्डाच्या या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या मते, पेपर दिल्लीत फुटला आहे, त्याचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेतून रिलॅक्सेशन द्यायला हवे.दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असते. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अतिशय सजग असतात. स्पर्धेच्या युगात आपली गुणवत्ता टिकविण्यासाठी विद्यार्थीही प्रचंड मेहनत घेतात. रात्रंदिवस एक करून अभ्यास करतात. अशात झालेला पेपर पुन्हा द्यायचा असेल तर विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण येते. सध्या सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी अशाच दडपणात अडकले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत गणिताचा पेपर व बारावीच्या परीक्षेत अर्थशास्त्राचा पेपर फुटला आहे. बोर्डाने हे दोन्ही पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख २५ एप्रिल घोषित केली आहे तर दहावीच्या पेपरच्या बाबतीत बोर्डाने दिल्ली, हरियाणा हे दोन राज्य वगळता इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन दिले आहे. त्यामुळे नागपुरातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचा पेपर द्यायचाच आहे. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी चांगलेच दडपणात आहेत.मुलांची मानसिकता राहत नाहीमुळात सीबीएसईचे विद्यार्थी अगदी प्रामाणिकपणे अभ्यास करतात. कॉपी करणे, परीक्षेपूर्वी पेपर मिळविणे या भानगडीत ते पडतच नाही. अशात बोर्डाच्या चुकीमुळे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना फटका बसत असेल तर ते मानसिक दडपणात जातात. एकदा पेपर दिल्यानंतर पुन्हा त्याच पेपरची तयारी करणे त्यांच्यासाठी अतिशय अवघड जाते. त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवरही होऊ शकतो.राजाभाऊ टांकसाळे, प्राचार्य, सेंट पॉल स्कूल मुले नाराज झालीविद्यार्थी पेपर दिल्यानंतर अतिशय आनंदी होते. त्यांना जेव्हा कळले की पेपर फुटल्याने फेरपरीक्षा घेण्यात येईल तेव्हा ते नाराज झाले होते. सीबीएसई बोर्डाने एक चांगले केले की दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यातून रिलॅक्स केले. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावीच लागणार आहे. मुळात पेपर हा दिल्ली येथे फुटला आहे. त्याचा परिणाम इतर राज्यांत किंचीतही झाला नसेल. पण शिक्षा मात्र सर्वच विद्यार्थ्यांना मिळते आहे. बोर्डाने जसा दहावीच्या बाबतीत निर्णय घेतला तसेच निर्णय बारावीच्या विद्यार्थ्यांबाबतही घ्यायला हवा, अशी अपेक्षा आहे.कविता नागराजन, प्राचार्य, स्कूल आॅफ स्कॉलर आता अभ्यासाचा मूड नाहीएकदा पेपर झाल्यावर पुन्हा त्याच पेपरचा अभ्यास करणे अतिशय अवघड जाते. दिल्लीच्या चुकीचा फटका आम्हाला बसतोय. पण पर्याय नाही. पेपर तर द्यावाच लागेल. पण आता अभ्यासाचा मूड राहिलेला नाही.रजत फडणीस, विद्यार्थीसीबीएसईचे विद्यार्थी पोहचले गडकरींकडेमहाराष्ट्रात कुठेही पेपर फूट झालेली नाही. तरीही आम्हाला त्याचा फटका का, असा सवाल सीबीएसईच्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडेच केला आहे. शहरातील ५० ते ६० बारावीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात भेट दिली. गडकरी दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना रविवारी बोलाविण्यात आले आहे. रविवारी १५० ते २०० विद्यार्थी व पालक गडकरींची भेट घेणार आहे. या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सीबीएसई बोर्डाचा दहावीचाही पेपर फुटला होता. परंतु बोर्डाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन दिले. तसेच रिलॅक्सेशन बारावीच्या विद्यार्थ्यांनाही देण्यात यावे. वर्षभर अभ्यास करून पेपर दिला आहे. झालेल्या पेपरचा पुन्हा अभ्यास करणे अडचणीचे जाणार आहे. त्यामुळे पेपर रद्द करावा.

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन