शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीच्या पेपरफुटीचे नागपूरच्या विद्यार्थ्यांना टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 20:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याने सीबीएसई पुन्हा फेरपरीक्षा घेणार आहे. दुबार पेपर द्यावा लागणार असल्याने विद्यार्थी टेन्शनमध्ये आले आहेत. पालकांनीही बोर्डाच्या या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या मते, पेपर दिल्लीत फुटला आहे, त्याचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील ...

ठळक मुद्देगुणांवर परिणाम होण्याची भीती : प्राचार्य म्हणतात, रिलॅक्सेशन मिळायला हवे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याने सीबीएसई पुन्हा फेरपरीक्षा घेणार आहे. दुबार पेपर द्यावा लागणार असल्याने विद्यार्थी टेन्शनमध्ये आले आहेत. पालकांनीही बोर्डाच्या या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या मते, पेपर दिल्लीत फुटला आहे, त्याचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेतून रिलॅक्सेशन द्यायला हवे.दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असते. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अतिशय सजग असतात. स्पर्धेच्या युगात आपली गुणवत्ता टिकविण्यासाठी विद्यार्थीही प्रचंड मेहनत घेतात. रात्रंदिवस एक करून अभ्यास करतात. अशात झालेला पेपर पुन्हा द्यायचा असेल तर विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण येते. सध्या सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी अशाच दडपणात अडकले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत गणिताचा पेपर व बारावीच्या परीक्षेत अर्थशास्त्राचा पेपर फुटला आहे. बोर्डाने हे दोन्ही पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख २५ एप्रिल घोषित केली आहे तर दहावीच्या पेपरच्या बाबतीत बोर्डाने दिल्ली, हरियाणा हे दोन राज्य वगळता इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन दिले आहे. त्यामुळे नागपुरातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचा पेपर द्यायचाच आहे. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी चांगलेच दडपणात आहेत.मुलांची मानसिकता राहत नाहीमुळात सीबीएसईचे विद्यार्थी अगदी प्रामाणिकपणे अभ्यास करतात. कॉपी करणे, परीक्षेपूर्वी पेपर मिळविणे या भानगडीत ते पडतच नाही. अशात बोर्डाच्या चुकीमुळे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना फटका बसत असेल तर ते मानसिक दडपणात जातात. एकदा पेपर दिल्यानंतर पुन्हा त्याच पेपरची तयारी करणे त्यांच्यासाठी अतिशय अवघड जाते. त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवरही होऊ शकतो.राजाभाऊ टांकसाळे, प्राचार्य, सेंट पॉल स्कूल मुले नाराज झालीविद्यार्थी पेपर दिल्यानंतर अतिशय आनंदी होते. त्यांना जेव्हा कळले की पेपर फुटल्याने फेरपरीक्षा घेण्यात येईल तेव्हा ते नाराज झाले होते. सीबीएसई बोर्डाने एक चांगले केले की दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यातून रिलॅक्स केले. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावीच लागणार आहे. मुळात पेपर हा दिल्ली येथे फुटला आहे. त्याचा परिणाम इतर राज्यांत किंचीतही झाला नसेल. पण शिक्षा मात्र सर्वच विद्यार्थ्यांना मिळते आहे. बोर्डाने जसा दहावीच्या बाबतीत निर्णय घेतला तसेच निर्णय बारावीच्या विद्यार्थ्यांबाबतही घ्यायला हवा, अशी अपेक्षा आहे.कविता नागराजन, प्राचार्य, स्कूल आॅफ स्कॉलर आता अभ्यासाचा मूड नाहीएकदा पेपर झाल्यावर पुन्हा त्याच पेपरचा अभ्यास करणे अतिशय अवघड जाते. दिल्लीच्या चुकीचा फटका आम्हाला बसतोय. पण पर्याय नाही. पेपर तर द्यावाच लागेल. पण आता अभ्यासाचा मूड राहिलेला नाही.रजत फडणीस, विद्यार्थीसीबीएसईचे विद्यार्थी पोहचले गडकरींकडेमहाराष्ट्रात कुठेही पेपर फूट झालेली नाही. तरीही आम्हाला त्याचा फटका का, असा सवाल सीबीएसईच्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडेच केला आहे. शहरातील ५० ते ६० बारावीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात भेट दिली. गडकरी दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना रविवारी बोलाविण्यात आले आहे. रविवारी १५० ते २०० विद्यार्थी व पालक गडकरींची भेट घेणार आहे. या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सीबीएसई बोर्डाचा दहावीचाही पेपर फुटला होता. परंतु बोर्डाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन दिले. तसेच रिलॅक्सेशन बारावीच्या विद्यार्थ्यांनाही देण्यात यावे. वर्षभर अभ्यास करून पेपर दिला आहे. झालेल्या पेपरचा पुन्हा अभ्यास करणे अडचणीचे जाणार आहे. त्यामुळे पेपर रद्द करावा.

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन