शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

दिल्लीच्या पेपरफुटीचे नागपूरच्या विद्यार्थ्यांना टेन्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 31, 2018 20:56 IST

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याने सीबीएसई पुन्हा फेरपरीक्षा घेणार आहे. दुबार पेपर द्यावा लागणार असल्याने विद्यार्थी टेन्शनमध्ये आले आहेत. पालकांनीही बोर्डाच्या या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या मते, पेपर दिल्लीत फुटला आहे, त्याचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील ...

ठळक मुद्देगुणांवर परिणाम होण्याची भीती : प्राचार्य म्हणतात, रिलॅक्सेशन मिळायला हवे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीचा गणित आणि अर्थशास्त्राचा पेपर फुटल्याने सीबीएसई पुन्हा फेरपरीक्षा घेणार आहे. दुबार पेपर द्यावा लागणार असल्याने विद्यार्थी टेन्शनमध्ये आले आहेत. पालकांनीही बोर्डाच्या या निष्काळजीपणावर नाराजी व्यक्त केली आहे. शिक्षकांच्या मते, पेपर दिल्लीत फुटला आहे, त्याचा महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांशी काहीही संबंध नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना फेरपरीक्षेतून रिलॅक्सेशन द्यायला हवे.दहावी आणि बारावीचे वर्ष विद्यार्थ्यांच्या भविष्याच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे असते. त्या दृष्टिकोनातून विद्यार्थी, पालक आणि शिक्षक अतिशय सजग असतात. स्पर्धेच्या युगात आपली गुणवत्ता टिकविण्यासाठी विद्यार्थीही प्रचंड मेहनत घेतात. रात्रंदिवस एक करून अभ्यास करतात. अशात झालेला पेपर पुन्हा द्यायचा असेल तर विद्यार्थ्यांवर मानसिक दडपण येते. सध्या सीबीएसई बोर्डाचे विद्यार्थी अशाच दडपणात अडकले आहेत. सीबीएसई बोर्डाच्या सुरू असलेल्या दहावीच्या परीक्षेत गणिताचा पेपर व बारावीच्या परीक्षेत अर्थशास्त्राचा पेपर फुटला आहे. बोर्डाने हे दोन्ही पेपर पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला आहे. बोर्डाने बारावीच्या अर्थशास्त्राच्या पेपरची तारीख २५ एप्रिल घोषित केली आहे तर दहावीच्या पेपरच्या बाबतीत बोर्डाने दिल्ली, हरियाणा हे दोन राज्य वगळता इतर राज्यांतील विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन दिले आहे. त्यामुळे नागपुरातील दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा श्वास सोडला आहे. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांना अर्थशास्त्राचा पेपर द्यायचाच आहे. त्यामुळे बारावीचे विद्यार्थी चांगलेच दडपणात आहेत.मुलांची मानसिकता राहत नाहीमुळात सीबीएसईचे विद्यार्थी अगदी प्रामाणिकपणे अभ्यास करतात. कॉपी करणे, परीक्षेपूर्वी पेपर मिळविणे या भानगडीत ते पडतच नाही. अशात बोर्डाच्या चुकीमुळे त्यांच्या प्रामाणिक प्रयत्नांना फटका बसत असेल तर ते मानसिक दडपणात जातात. एकदा पेपर दिल्यानंतर पुन्हा त्याच पेपरची तयारी करणे त्यांच्यासाठी अतिशय अवघड जाते. त्याचा परिणाम त्यांच्या गुणांवरही होऊ शकतो.राजाभाऊ टांकसाळे, प्राचार्य, सेंट पॉल स्कूल मुले नाराज झालीविद्यार्थी पेपर दिल्यानंतर अतिशय आनंदी होते. त्यांना जेव्हा कळले की पेपर फुटल्याने फेरपरीक्षा घेण्यात येईल तेव्हा ते नाराज झाले होते. सीबीएसई बोर्डाने एक चांगले केले की दहावीच्या विद्यार्थ्यांना त्यातून रिलॅक्स केले. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यावीच लागणार आहे. मुळात पेपर हा दिल्ली येथे फुटला आहे. त्याचा परिणाम इतर राज्यांत किंचीतही झाला नसेल. पण शिक्षा मात्र सर्वच विद्यार्थ्यांना मिळते आहे. बोर्डाने जसा दहावीच्या बाबतीत निर्णय घेतला तसेच निर्णय बारावीच्या विद्यार्थ्यांबाबतही घ्यायला हवा, अशी अपेक्षा आहे.कविता नागराजन, प्राचार्य, स्कूल आॅफ स्कॉलर आता अभ्यासाचा मूड नाहीएकदा पेपर झाल्यावर पुन्हा त्याच पेपरचा अभ्यास करणे अतिशय अवघड जाते. दिल्लीच्या चुकीचा फटका आम्हाला बसतोय. पण पर्याय नाही. पेपर तर द्यावाच लागेल. पण आता अभ्यासाचा मूड राहिलेला नाही.रजत फडणीस, विद्यार्थीसीबीएसईचे विद्यार्थी पोहचले गडकरींकडेमहाराष्ट्रात कुठेही पेपर फूट झालेली नाही. तरीही आम्हाला त्याचा फटका का, असा सवाल सीबीएसईच्या बारावीच्या विद्यार्थ्यांनी केंद्रीय मंत्र्यांकडेच केला आहे. शहरातील ५० ते ६० बारावीच्या विद्यार्थ्यांनी शनिवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या कार्यालयात भेट दिली. गडकरी दौऱ्यावर असल्यामुळे त्यांना रविवारी बोलाविण्यात आले आहे. रविवारी १५० ते २०० विद्यार्थी व पालक गडकरींची भेट घेणार आहे. या विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की, सीबीएसई बोर्डाचा दहावीचाही पेपर फुटला होता. परंतु बोर्डाने महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना रिलॅक्सेशन दिले. तसेच रिलॅक्सेशन बारावीच्या विद्यार्थ्यांनाही देण्यात यावे. वर्षभर अभ्यास करून पेपर दिला आहे. झालेल्या पेपरचा पुन्हा अभ्यास करणे अडचणीचे जाणार आहे. त्यामुळे पेपर रद्द करावा.

टॅग्स :Studentविद्यार्थीagitationआंदोलन