शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

विरोधाच्या नावावर पानतावणेंचा छळ झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:10 IST

डॉ. गंगाधर पानतावणे यांचा लहान भाऊ सदानंद हा संंघाचा स्वयंसेवक होता यात पानतावणेंचा काय दोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: रिपब्लिकन पक्ष हा एका जातीचा असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या अपेक्षेला अनुसरून पानतावणेंनी कार्य केले तर ते संघाचे समर्थक कसे ठरतात, असा सवाल उपस्थित करून समाजातील काही तथाकथित विचारवंतांनी विरोधाच्या नावावर पानतावणेंचा अक्षरश: छळ केला, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देरणजित मेश्राम : डॉ. गंगाधर पानतावणे यांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. गंगाधर पानतावणे यांचा लहान भाऊ सदानंद हा संंघाचा स्वयंसेवक होता यात पानतावणेंचा काय दोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: रिपब्लिकन पक्ष हा एका जातीचा असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या अपेक्षेला अनुसरून पानतावणेंनी कार्य केले तर ते संघाचे समर्थक कसे ठरतात, असा सवाल उपस्थित करून समाजातील काही तथाकथित विचारवंतांनी विरोधाच्या नावावर पानतावणेंचा अक्षरश: छळ केला, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांनी व्यक्त केली. विदर्भ साहित्य संघ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या माळ्यावरील सभागृहात बुधवारी आयोजित डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या आदरांजली सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी तर प्रमुख वक्ते म्हणून दलित साहित्याचे अभ्यासक ताराचंद्र खांडेकर व भाऊ लोखंडे उपस्थित होते. मेश्राम पुढे म्हणाले, पानतावणेंच्या विरोधकांनी केवळ व्यक्ती म्हणून पानतावणेंनाच नाही तर त्यांच्या अक्षर कर्तृत्वाला संपवण्याचा प्रयत्न केला. पण, पानतावणेंची अंगभूत सहनशीलता कमालीची होती. चौफेर होणारा विरोध पचवून त्यांनी माणूसमुक्तीचा वसा घेतलेल्या आंबेडकरी तत्त्वज्ञानाला समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य नेटाने केले. ताराचंद्र खांडेकर म्हणाले, पानतावणे आणि माझा परिचय तेव्हाच्या मॉरिस कॉलेजमध्ये झाला. ते मला दोन वर्ष सिनिअर होते. परंतु आमच्यात छान मैत्री होती. केवळ मैत्रीने नाही तर आंबेडकरांच्या विचारांनी आम्हाला परस्परांशी जोडले होते. पानतावणेंचे वैचारिक कार्य संक्रमणाच्या काळात सुरू झाले. भूतकाळाचे चटके दलित समाज विसरला नव्हता आणि तिकडे बाबासाहेबांनी एक नवा विचार तरुण दलित पिढीपुढे ठेवला होता. पानतावणेंनी हा विचार स्वीकारला आणि अवघे आयुष्य त्याला समर्पित करून टाकले. यावेळी भाऊ लोखंडे यांनीही पानतावणेंसोबतच्या चळवळीतील आठवणींचा पट उलगडला. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात पानतावणेंनी स्वत:च्या अस्मितेची ओळख करून देणारा आरसा आपल्या विचारातून समाजासमोर ठेवल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. इंद्रजित ओरके यांनी केले.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघnagpurनागपूर