शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

विरोधाच्या नावावर पानतावणेंचा छळ झाला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2018 23:10 IST

डॉ. गंगाधर पानतावणे यांचा लहान भाऊ सदानंद हा संंघाचा स्वयंसेवक होता यात पानतावणेंचा काय दोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: रिपब्लिकन पक्ष हा एका जातीचा असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या अपेक्षेला अनुसरून पानतावणेंनी कार्य केले तर ते संघाचे समर्थक कसे ठरतात, असा सवाल उपस्थित करून समाजातील काही तथाकथित विचारवंतांनी विरोधाच्या नावावर पानतावणेंचा अक्षरश: छळ केला, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देरणजित मेश्राम : डॉ. गंगाधर पानतावणे यांना आदरांजली

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : डॉ. गंगाधर पानतावणे यांचा लहान भाऊ सदानंद हा संंघाचा स्वयंसेवक होता यात पानतावणेंचा काय दोष, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी स्वत: रिपब्लिकन पक्ष हा एका जातीचा असू नये अशी अपेक्षा व्यक्त केली होती. या अपेक्षेला अनुसरून पानतावणेंनी कार्य केले तर ते संघाचे समर्थक कसे ठरतात, असा सवाल उपस्थित करून समाजातील काही तथाकथित विचारवंतांनी विरोधाच्या नावावर पानतावणेंचा अक्षरश: छळ केला, अशी खंत ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम यांनी व्यक्त केली. विदर्भ साहित्य संघ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्यावतीने विदर्भ साहित्य संघाच्या चौथ्या माळ्यावरील सभागृहात बुधवारी आयोजित डॉ. गंगाधर पानतावणे यांच्या आदरांजली सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी महामंडळाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी तर प्रमुख वक्ते म्हणून दलित साहित्याचे अभ्यासक ताराचंद्र खांडेकर व भाऊ लोखंडे उपस्थित होते. मेश्राम पुढे म्हणाले, पानतावणेंच्या विरोधकांनी केवळ व्यक्ती म्हणून पानतावणेंनाच नाही तर त्यांच्या अक्षर कर्तृत्वाला संपवण्याचा प्रयत्न केला. पण, पानतावणेंची अंगभूत सहनशीलता कमालीची होती. चौफेर होणारा विरोध पचवून त्यांनी माणूसमुक्तीचा वसा घेतलेल्या आंबेडकरी तत्त्वज्ञानाला समाजाच्या सर्व स्तरापर्यंत पोहोचविण्याचे कार्य नेटाने केले. ताराचंद्र खांडेकर म्हणाले, पानतावणे आणि माझा परिचय तेव्हाच्या मॉरिस कॉलेजमध्ये झाला. ते मला दोन वर्ष सिनिअर होते. परंतु आमच्यात छान मैत्री होती. केवळ मैत्रीने नाही तर आंबेडकरांच्या विचारांनी आम्हाला परस्परांशी जोडले होते. पानतावणेंचे वैचारिक कार्य संक्रमणाच्या काळात सुरू झाले. भूतकाळाचे चटके दलित समाज विसरला नव्हता आणि तिकडे बाबासाहेबांनी एक नवा विचार तरुण दलित पिढीपुढे ठेवला होता. पानतावणेंनी हा विचार स्वीकारला आणि अवघे आयुष्य त्याला समर्पित करून टाकले. यावेळी भाऊ लोखंडे यांनीही पानतावणेंसोबतच्या चळवळीतील आठवणींचा पट उलगडला. डॉ. श्रीपाद भालचंद्र जोशी यांनी अध्यक्षीय भाषणात पानतावणेंनी स्वत:च्या अस्मितेची ओळख करून देणारा आरसा आपल्या विचारातून समाजासमोर ठेवल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे संचालन डॉ. इंद्रजित ओरके यांनी केले.

टॅग्स :Vidarbha Sahitya Sanghविदर्भ साहित्य संघnagpurनागपूर