शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

राजकीय आणि न्यायव्यवस्थेवर प्रस्थापितांची दहशत : रेखा ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:37 IST

प्रस्थापित जातीविरोधात छेडछाड केली तर कायदा हातात घेऊन धडा शिकवू, असा संदेश देणारी ही मनुवादी व्यवस्था आहे. यावरून राजकीय व न्यायव्यवस्थेवर आजही प्रस्थापितांची दहशत असून पोलीस यंत्रणा व प्रशासकीय व्यवस्था त्यांच्यानुसारच काम करीत असल्याचे मनोगत प्रसिद्ध विचारवंत रेखा ठाकूर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देएससीएस व्याख्यानमालेला सुरुवात

लोेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली. एका मुलीला न्याय मिळाला याचा आनंद आहेच. साक्षीदार नसूनही वर्चस्व असलेल्या जातीच्या मूकमोर्चामुळे या घटनेत न्याय मिळाला. दुसरीकडे अनेक साक्षीदार असूनही खर्डा येथील नितीन आगेच्या आरोपींना सबळ पुराव्याअभावी सोडून देण्यात आले. या न्यायात समता नाही. प्रस्थापित जातीविरोधात छेडछाड केली तर कायदा हातात घेऊन धडा शिकवू, असा संदेश देणारी ही मनुवादी व्यवस्था आहे. यावरून राजकीय व न्यायव्यवस्थेवर आजही प्रस्थापितांची दहशत असून पोलीस यंत्रणा व प्रशासकीय व्यवस्था त्यांच्यानुसारच काम करीत असल्याचे मनोगत प्रसिद्ध विचारवंत रेखा ठाकूर यांनी व्यक्त केले.संत चोखामेळा समाज (एस.सी.एस.) मुलींची शिक्षण संस्थाच्यावतीने आयोजित एस.सी.एस. व्याख्यानमालेला शनिवारी रेखा ठाकूर याच्या व्याख्यानाने सुरुवात झाली. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित मेश्राम हे होते. याप्रसंगी प्रसिद्ध विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, संस्थेचे सचिव पवन गजभिये, सदस्या वत्सलाबाई मेश्राम, दिगंबर हिरेखण, संदीप डोंगरे, कार्यक ारी मुख्याध्यापिका शारदा गेडाम, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अंजली मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.‘महात्मा जोतिराव फुले ते कोपर्डी व्हाया खर्डा’ या विषयावर रेखा ठाकूर यांनी विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगळता महात्मा फुले यांचा वारसा कुणीही प्रामाणिकपणे चालविला नाही. महात्मा फुले व सावित्रीबार्इंनी बहुजनांच्या अधोगतीचे कारण असलेल्या मनुवादी व्यवस्थेविरोधात सत्यशोधक चळवळ उभी केली. त्यांच्यानंतर ब्रिटिशांच्या राजवटीत ब्राह्मण समाजसुधारकांनी काळाची पावले ओळखून आणि केवळ प्रशासनात वर्चस्व प्राप्त करण्यासाठी मुलांना व स्त्रियांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. हा महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रवाह असला तरी यात बहुजन समाज व त्यातील स्त्रियांना स्थान दिले नाही. यानंतर ब्राह्मणेत्तर समाजसुधारकांनी महात्मा फुल्यांचा वारसा स्वीकारला खरा, मात्र त्यात सत्यशोधक विचारांची समतावादी भूमिका नव्हती. कारण पारंपरिक वर्चस्वाच्या भावनेतून वर्णव्यवस्थेची उतरंड तोडायची नव्हती. पुढे या चळवळीने सत्ताकारणाचे ध्येय स्वीकारत चळवळ संपविली. दलित व बहुजन समाजाला सोईस्करपणे परिघाबाहेर ठेवून स्वातंत्र्यानंतर ५० वर्षे सत्ता उपभोगली. ही सत्ता केवळ घराणेशाहीपुरती मर्यादित राहिली व सामान्य मराठा समाज भरडला गेला. कोपर्डीच्या घटनेतून सामान्य समाजाचा असंतोष उफाळला. मात्र दुर्दैवाने यामागेही समता व बंधुत्वाची प्रेरणा नव्हती तर हा असंतोष आरक्षण व अ‍ॅट्रासिटी विरोधातच गेला.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर