शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
2
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
3
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
4
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
5
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
6
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
7
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
8
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
9
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
10
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
11
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
12
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!
13
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
14
IND vs ENG : गिलनं दिला 'ब्लू प्रिंट'चा दाखला; 'लगान' वसूल करण्यासाठी रोहित-विराटचाही घेतलाय सल्ला
15
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
16
जाईन गे माये तया पंढरपुरा, भेटेन माहेर आपुलिया! अलंकापुरीतून माऊलींच्या पालखीचे वैभवी प्रस्थान
17
साताऱ्यातील पर्यटनस्थळांवर १९ ऑगस्टपर्यंत निर्बंध; धबधब्यांसह कास पठार, महाबळेश्वरमधील स्थळे अन् धरणांचाही समावेश
18
मीरा- भाईंदर ते गायमुख उन्नत, भुयारी मार्गासाठी एल अँड टी कंपनीकडून अंदाजपत्रक नाहीच 
19
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
20
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

राजकीय आणि न्यायव्यवस्थेवर प्रस्थापितांची दहशत : रेखा ठाकूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 14, 2018 00:37 IST

प्रस्थापित जातीविरोधात छेडछाड केली तर कायदा हातात घेऊन धडा शिकवू, असा संदेश देणारी ही मनुवादी व्यवस्था आहे. यावरून राजकीय व न्यायव्यवस्थेवर आजही प्रस्थापितांची दहशत असून पोलीस यंत्रणा व प्रशासकीय व्यवस्था त्यांच्यानुसारच काम करीत असल्याचे मनोगत प्रसिद्ध विचारवंत रेखा ठाकूर यांनी व्यक्त केले.

ठळक मुद्देएससीएस व्याख्यानमालेला सुरुवात

लोेकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोपर्डीच्या घटनेतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्यात आली. एका मुलीला न्याय मिळाला याचा आनंद आहेच. साक्षीदार नसूनही वर्चस्व असलेल्या जातीच्या मूकमोर्चामुळे या घटनेत न्याय मिळाला. दुसरीकडे अनेक साक्षीदार असूनही खर्डा येथील नितीन आगेच्या आरोपींना सबळ पुराव्याअभावी सोडून देण्यात आले. या न्यायात समता नाही. प्रस्थापित जातीविरोधात छेडछाड केली तर कायदा हातात घेऊन धडा शिकवू, असा संदेश देणारी ही मनुवादी व्यवस्था आहे. यावरून राजकीय व न्यायव्यवस्थेवर आजही प्रस्थापितांची दहशत असून पोलीस यंत्रणा व प्रशासकीय व्यवस्था त्यांच्यानुसारच काम करीत असल्याचे मनोगत प्रसिद्ध विचारवंत रेखा ठाकूर यांनी व्यक्त केले.संत चोखामेळा समाज (एस.सी.एस.) मुलींची शिक्षण संस्थाच्यावतीने आयोजित एस.सी.एस. व्याख्यानमालेला शनिवारी रेखा ठाकूर याच्या व्याख्यानाने सुरुवात झाली. व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष प्रा. रणजित मेश्राम हे होते. याप्रसंगी प्रसिद्ध विचारवंत डॉ. भाऊ लोखंडे, संस्थेचे सचिव पवन गजभिये, सदस्या वत्सलाबाई मेश्राम, दिगंबर हिरेखण, संदीप डोंगरे, कार्यक ारी मुख्याध्यापिका शारदा गेडाम, प्राथमिकच्या मुख्याध्यापिका अंजली मेश्राम आदी मान्यवर उपस्थित होते.‘महात्मा जोतिराव फुले ते कोपर्डी व्हाया खर्डा’ या विषयावर रेखा ठाकूर यांनी विचार मांडले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर वगळता महात्मा फुले यांचा वारसा कुणीही प्रामाणिकपणे चालविला नाही. महात्मा फुले व सावित्रीबार्इंनी बहुजनांच्या अधोगतीचे कारण असलेल्या मनुवादी व्यवस्थेविरोधात सत्यशोधक चळवळ उभी केली. त्यांच्यानंतर ब्रिटिशांच्या राजवटीत ब्राह्मण समाजसुधारकांनी काळाची पावले ओळखून आणि केवळ प्रशासनात वर्चस्व प्राप्त करण्यासाठी मुलांना व स्त्रियांना शिक्षणासाठी प्रवृत्त केले. हा महात्मा फुलेंच्या विचारांचा प्रवाह असला तरी यात बहुजन समाज व त्यातील स्त्रियांना स्थान दिले नाही. यानंतर ब्राह्मणेत्तर समाजसुधारकांनी महात्मा फुल्यांचा वारसा स्वीकारला खरा, मात्र त्यात सत्यशोधक विचारांची समतावादी भूमिका नव्हती. कारण पारंपरिक वर्चस्वाच्या भावनेतून वर्णव्यवस्थेची उतरंड तोडायची नव्हती. पुढे या चळवळीने सत्ताकारणाचे ध्येय स्वीकारत चळवळ संपविली. दलित व बहुजन समाजाला सोईस्करपणे परिघाबाहेर ठेवून स्वातंत्र्यानंतर ५० वर्षे सत्ता उपभोगली. ही सत्ता केवळ घराणेशाहीपुरती मर्यादित राहिली व सामान्य मराठा समाज भरडला गेला. कोपर्डीच्या घटनेतून सामान्य समाजाचा असंतोष उफाळला. मात्र दुर्दैवाने यामागेही समता व बंधुत्वाची प्रेरणा नव्हती तर हा असंतोष आरक्षण व अ‍ॅट्रासिटी विरोधातच गेला.

टॅग्स :Schoolशाळाnagpurनागपूर