शहरं
Join us  
Trending Stories
1
Iran Terrorist Attack : Video - इराणवर मोठा दहशतवादी हल्ला; ८ जणांचा मृत्यू, १३ जखमी
2
धक्कादायक! राजस्थानमधील झालावाड शाळेतील दुर्घटनेनंतर आणखी एक निष्काळजीपणा, विद्यार्थ्याचे टायर पेटवून अंत्यसंस्कार
3
IND vs ENG: जसप्रीत बुमराह पुन्हा दुखापतग्रस्त? चौथ्या कसोटीदरम्यान गोलंदाजी प्रशिक्षकाचा खुलासा
4
NSE, SBI आणि IDBI साठी NSDL चा आयपीओ बनला मल्टीबॅगर मनी मशीन; ३९९९०% पर्यंत रिटर्न  
5
वर्षभर मसल पॉवर रसेलची बॅट सोबत बाळगली; तो निवृत्त झाल्यावर ती टीम डेविडच्या हाती तळपली
6
"मला दु:ख आहे की मी अशा सरकारला पाठिंबा देतोय जे..."; चिराग पासवान यांची संतप्त प्रतिक्रिया
7
१७ वर्ष जुनी कंपनी आणतेय IPO, SEBI कडे केला अर्ज; BSE आणि NSE मध्ये लिस्टिंगची शक्यता
8
Period Pain : ‘तिच्या’ आयुष्यातील ‘ते’ चार दिवस; कोवळ्या कळ्यांना पाळीचा अर्थ समजावताना कुठे कमी पडतोय आपण?
9
चीन नंबर १ आणि भारत दुसऱ्या क्रमांकावर, ही कोणती यादी ज्यात अमेरिका-इंडो​नेशिया आणि तुर्कीही राहिले मागे
10
भारत-यूके मुक्त व्यापार कराराने लक्झरी कारच्या किंमती दणक्यात कमी होणार; या वाहनांना मोठा फायदा मिळणार; तुमचा विश्वास बसणार नाही!
11
५ वर्षांत १० पट वाढला TATA Sons चा नफा; समूहाच्या 'या' कंपनीनं केली सर्वाधिक कमाई, तुमच्याकडे स्टॉक आहे का?
12
"...तर राहुल गांधी दुसरे आंबेडकर सिद्ध होतील", ओबीसी समाजाला आवाहन करत काँग्रेसच्या मोठ्या नेत्याचं विधान
13
आयटी पार्क पुण्यातून बाहेर चालले..! अजित पवारांनी हिंजवडीच्या सरपंचांनाही सुनावले खडेबोल
14
माता न तू वैरिणी! बिर्याणीवाल्याच्या प्रेमात वेडी झाली टिकटॉक स्टार, पोटच्या लेकरांना संपवलं अन्...
15
ऑनलाईन मागवलं विष, दह्यामध्ये टाकून पतीला दोनदा पाजलं; पत्नीचा कारनामा पोलिसांनी केला उघड
16
"लोकांना हाच समज आहे की माझं लग्नच झालं होतं..", भाग्यश्री मोटे मोडलेल्या नात्यावर स्पष्टच बोलली
17
२६ जुलै हा दिवस मुंबईकर कधीच विसरू शकत नाही! २० वर्षापूर्वी काय घडलं होतं त्या दिवशी?
18
Shravan 2025: शिवमंदिरात भाविक तीनदा टाळ्या का वाजवतात? काय आहे मान्यता? वाचा!
19
Thailand- Cambodia Conflict :'सीमेवर प्रवास टाळा', थायलंड- कंबोडिया संघर्षादरम्यान भारताच्या पर्यटकांसाठी दूतावासाने सूचना दिल्या
20
विवाहित वर्गमैत्रिणीला भेटला; पत्नीला घटस्फोट देत तिच्यासोबत लिव्ह इनमध्ये राहिला, मग जे घडलं...

पहलगाम हल्ला: सरकारमध्ये कुठेही विसंवाद नाही, श्रेयवादही नाही- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By आनंद डेकाटे | Updated: April 25, 2025 19:23 IST

हे या विषयावर राजकारण करण्याचे दिवस नाहीत, देशाला मजबूत करण्याचे दिवस, असेही बावनकुळे म्हणाले

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: पहलगामच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील ३ ते ४ हजार पर्यटक तिथे असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात परत आणले जात आहे. यासंदर्भात सरकारमध्ये कुठेही विसंवाद नाही किंवा श्रेयवादही नाही. या विषयावर राजकारण करण्याचे दिवस नाही तर देशाला मजबूत करण्याचे दिवस असल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी सकाळी नागपुरात प्रसार माध्यमाशी बोलत होते. पहलगामच्या घटनेनंतर सरकारमध्ये विसंवाद असून श्रेयवाद सुरू असल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, "पहलगामच्या घटनेनंतर त्याठिकाणी असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्याठिकाणी जाऊन पर्यटकांची भेट घेणे यात काही राजकारण नाही. किवा गिरीश महाजन यांना पाठवणे यातही काही राजकारण नाही. ते तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे त्यामुळे त्यांना पाठवले आहे. सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही."

"यामध्ये काही राजकारण नाही किवा कुठलाही श्रेयवाद नाही. देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान फार मोठे आहे. या घटनेमध्ये संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बाबत सर्व पक्षांना आवाहन केले आहे. यामध्ये जे काही लोक राजकारण करत असेल त्यांचं राजकारण त्यांना लख लख लाभो", असेही ते म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेGirish Mahajanगिरीश महाजन