शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

पहलगाम हल्ला: सरकारमध्ये कुठेही विसंवाद नाही, श्रेयवादही नाही- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

By आनंद डेकाटे | Updated: April 25, 2025 19:23 IST

हे या विषयावर राजकारण करण्याचे दिवस नाहीत, देशाला मजबूत करण्याचे दिवस, असेही बावनकुळे म्हणाले

आनंद डेकाटे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: पहलगामच्या घटनेनंतर महाराष्ट्रातील ३ ते ४ हजार पर्यटक तिथे असल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात परत आणले जात आहे. यासंदर्भात सरकारमध्ये कुठेही विसंवाद नाही किंवा श्रेयवादही नाही. या विषयावर राजकारण करण्याचे दिवस नाही तर देशाला मजबूत करण्याचे दिवस असल्याचे मत राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केले.

महसूल मंत्री व नागपूर आणि अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे शुक्रवारी सकाळी नागपुरात प्रसार माध्यमाशी बोलत होते. पहलगामच्या घटनेनंतर सरकारमध्ये विसंवाद असून श्रेयवाद सुरू असल्याची टीका केली जात आहे. यासंदर्भात बावनकुळे यांना विचारले असता ते म्हणाले, "पहलगामच्या घटनेनंतर त्याठिकाणी असलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना परत आणण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन श्रीनगरला गेले आहेत. एकनाथ शिंदे यांनी त्याठिकाणी जाऊन पर्यटकांची भेट घेणे यात काही राजकारण नाही. किवा गिरीश महाजन यांना पाठवणे यातही काही राजकारण नाही. ते तर आपत्ती व्यवस्थापन मंत्री आहे त्यामुळे त्यांना पाठवले आहे. सरकारमध्ये कुठलाही विसंवाद नाही."

"यामध्ये काही राजकारण नाही किवा कुठलाही श्रेयवाद नाही. देशाचे फार मोठे नुकसान झाले आहे. हे नुकसान फार मोठे आहे. या घटनेमध्ये संपूर्ण देश सरकारच्या पाठीशी उभा राहिला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या बाबत सर्व पक्षांना आवाहन केले आहे. यामध्ये जे काही लोक राजकारण करत असेल त्यांचं राजकारण त्यांना लख लख लाभो", असेही ते म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळेEknath Shindeएकनाथ शिंदेGirish Mahajanगिरीश महाजन