शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

गोळीबाराचा आवाज आला अन् जावेदने त्यांना माघारी फिरवले; नागपूरचे कुटुंब मृत्यूच्या दारातून परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:51 IST

काश्मीरच्या टॅक्सी ड्रायव्हरमुळे वाचले कावळे कुटुंबीय

Pahalgam Terror Attack News: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, नागपूरच्या एका कुटुंबासोबतच असाच काहीसा प्रकार घडला. सोनमर्ग, गुलमर्ग, टुलीप गार्डन फिरून झाले. त्यानंतर ते कुटुंबीय पहलगामला टॅक्सीने निघाले. पहलगामला पोहचल्यानंतर त्यांनी अक्रोड, केशर विकत घेतले आणि पुढे निघाले, लगेच असा गोळीबाराचा आवाज आला. ज्या ठिकाणी दहशतवादी गोळीबार करत होते, त्या ठिकाणाहून ते केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर होते. 

टॅक्सी ड्रायव्हर जावेदला धोका लक्षात आला. त्याने पुढे न जाण्याचा सल्ला देत गाडी माघारी फिरवली आणि ते श्रीनगरला सुखरूप परतले. काश्मीरचा टॅक्सी ड्रायव्हर जावेदमुळे दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नागपुरातील व्यंकटेशनगर येथे राहणारे कावळे कुटुंबीय काश्मीर फिरायला गेले होते. डॉ. राजेंद्र कावळे यांच्यासोबत मुलगा, मुली, आवई, नातवंड, असा परिवार होता. १९ एप्रिलला ते विमानाने दिल्लीला गेले आणि तेथून विमानानेच श्रीनगरला गेले. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग फिरून झाले. त्यानंतर मंगळवारी ते पहलगामसाठी निघाले. श्रीनगर आणि परिसर फिरण्यासाठी त्यांनी एक टॅक्सी बुक केली होती. जावेद हा त्या टॅक्सीचा ड्रायव्हर होता. तीन दिवसांत तो कावळे कुटुंबीयांसोबत मिसळला होता.

कावळे कुटुंबीयांनी अगोदरच पहलगाम येथील काश्मीर पॅलेस रिसोर्ट बुक करून ठेवले होते. त्यामुळे सर्व दूर हा नियोजितच होता. पहलगामला ते पोहोचले. तेथूनच त्यांनी अक्रोड, केशर आदी खरेदी सुद्धा केले आणि नियोजित ठिकाणी ते निघाले, मात्र रस्त्यातच त्यांना गोळीबार होत असल्याचा आवाज आला. टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या जावेदला पुढचा धोका लक्षात आला. त्याने ॐ कावळे कुटुंबाला पुढे न जाण्याचा सल्ला देत श्रीनगरला परत जाण्यास सांगितले, परंतु रिसोर्ट बुक असल्याने कावळे कुटुंब विचार करीत होते. त्यांना नेमके काय होत आहे, याची कल्पना आली नव्हती. खूप विचार केल्यानंतर त्यांनी जावेदचे म्हणणे ऐकले आणि परत जाण्याचा निर्णय घेतला, तसेच सीआरपीएफच्या गाड्या पोहोचल्या. ते सर्व दृश्य पाहून युद्ध सुरू झाले की काय? असे कावळे कुटुंबाला वाटू लागले. सारेच दहशतीत आले. काही वेळानंतरच त्यांना खरा प्रकार समजला. आज जावेदमुळेच आपण सुखरूप असल्याची भावना डॉ. राजेंद्र कावळे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. कावळे कुटुंबीय २४ तास्खेला रेल्वेने नागपूरला परत येत आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाnagpurनागपूर