शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबाराचा आवाज आला अन् जावेदने त्यांना माघारी फिरवले; नागपूरचे कुटुंब मृत्यूच्या दारातून परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:51 IST

काश्मीरच्या टॅक्सी ड्रायव्हरमुळे वाचले कावळे कुटुंबीय

Pahalgam Terror Attack News: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, नागपूरच्या एका कुटुंबासोबतच असाच काहीसा प्रकार घडला. सोनमर्ग, गुलमर्ग, टुलीप गार्डन फिरून झाले. त्यानंतर ते कुटुंबीय पहलगामला टॅक्सीने निघाले. पहलगामला पोहचल्यानंतर त्यांनी अक्रोड, केशर विकत घेतले आणि पुढे निघाले, लगेच असा गोळीबाराचा आवाज आला. ज्या ठिकाणी दहशतवादी गोळीबार करत होते, त्या ठिकाणाहून ते केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर होते. 

टॅक्सी ड्रायव्हर जावेदला धोका लक्षात आला. त्याने पुढे न जाण्याचा सल्ला देत गाडी माघारी फिरवली आणि ते श्रीनगरला सुखरूप परतले. काश्मीरचा टॅक्सी ड्रायव्हर जावेदमुळे दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नागपुरातील व्यंकटेशनगर येथे राहणारे कावळे कुटुंबीय काश्मीर फिरायला गेले होते. डॉ. राजेंद्र कावळे यांच्यासोबत मुलगा, मुली, आवई, नातवंड, असा परिवार होता. १९ एप्रिलला ते विमानाने दिल्लीला गेले आणि तेथून विमानानेच श्रीनगरला गेले. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग फिरून झाले. त्यानंतर मंगळवारी ते पहलगामसाठी निघाले. श्रीनगर आणि परिसर फिरण्यासाठी त्यांनी एक टॅक्सी बुक केली होती. जावेद हा त्या टॅक्सीचा ड्रायव्हर होता. तीन दिवसांत तो कावळे कुटुंबीयांसोबत मिसळला होता.

कावळे कुटुंबीयांनी अगोदरच पहलगाम येथील काश्मीर पॅलेस रिसोर्ट बुक करून ठेवले होते. त्यामुळे सर्व दूर हा नियोजितच होता. पहलगामला ते पोहोचले. तेथूनच त्यांनी अक्रोड, केशर आदी खरेदी सुद्धा केले आणि नियोजित ठिकाणी ते निघाले, मात्र रस्त्यातच त्यांना गोळीबार होत असल्याचा आवाज आला. टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या जावेदला पुढचा धोका लक्षात आला. त्याने ॐ कावळे कुटुंबाला पुढे न जाण्याचा सल्ला देत श्रीनगरला परत जाण्यास सांगितले, परंतु रिसोर्ट बुक असल्याने कावळे कुटुंब विचार करीत होते. त्यांना नेमके काय होत आहे, याची कल्पना आली नव्हती. खूप विचार केल्यानंतर त्यांनी जावेदचे म्हणणे ऐकले आणि परत जाण्याचा निर्णय घेतला, तसेच सीआरपीएफच्या गाड्या पोहोचल्या. ते सर्व दृश्य पाहून युद्ध सुरू झाले की काय? असे कावळे कुटुंबाला वाटू लागले. सारेच दहशतीत आले. काही वेळानंतरच त्यांना खरा प्रकार समजला. आज जावेदमुळेच आपण सुखरूप असल्याची भावना डॉ. राजेंद्र कावळे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. कावळे कुटुंबीय २४ तास्खेला रेल्वेने नागपूरला परत येत आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाnagpurनागपूर