शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीत सारे काही आलबेल? मंत्र्यांच्या नाराजीनंतर शिंदेनी दरे नाही, दिल्ली गाठली; अमित शहांकडे तक्रार...
2
"राजा रघुवंशी प्रमाणे...!" ऑपरेशन सिंदूर'मध्ये पाकिस्तानला धडा शिकवणाऱ्या जवानाला वाटते भीती, 'सोनमसारखं' करण्याची धमकी देतेय पत्नी!
3
माळेगावात तणाव! शरद पवार राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन तावरे यांच्यावर जीवघेणा हल्ला 
4
₹१०००००००००००००० स्वाहा...! 6 आठवड्यांत क्रिप्टो मार्केट क्रॅश, बिटकॉइन 27% घसरला; गुंतवणूकदारांवर डोकं झोडून घ्यायची वेळ
5
'घातपाताच्या सूत्रधाराला वाचवणाऱ्या सरकारचे संरक्षण नको!' मनोज जरांगेंचा मोठा निर्णय
6
क्रिकेट चाहत्यांना धक्का! विश्वचषकात भारत-पाकिस्तान सामना होणार नाही, आयसीसीने ग्रुप स्टेजसाठी घेतला मोठा निर्णय...
7
KTM च्या बाईकना आग लागण्याचा धोका; Duke मॉडेल माघारी बोलविल्या...
8
एक 'ट्रिप'... एक 'ट्रिक'... अन् उभा राहिला १.५ कोटींचा उद्योग; कोल्हापूरच्या अद्वैतचा नादच खुळा
9
Travel : भारतापासून हजारो मैल दूर वसलाय 'मिनी इंडिया'; दिसायला सुंदर, फिरायला बेस्ट अन् इतिहासही आहे रंजक!
10
"मी अनेक वेळा रात्रीचे जेवण करत नाही, विचार करते...!"; करण जौहरसोबत अगदी मोकळेपणानं बोलली सानिया मिर्झा
11
नवी Honda City पाहिलीत का? कधी येणार; डिझाईन आणि प्लॅटफॉर्मची माहिती लीक झाली...
12
"तुमचा अहंकार ड्रेसिंग रुममध्ये ठेवा!" गावसकरांनी गंभीर-आगरकरांनाही सुनावलं
13
"जेव्हापासून बिहारचे निकाल लागलेत, माझी झोपच उडालीये", प्रशांत किशोरांना कोणत्या गोष्टीची सल?
14
अनमोल बिश्नोईला ११ दिवसांची कोठडी; ३५ हून अधिक हत्यांशी त्याचा थेट संबंध असल्याचा 'NIA'चा दावा
15
अल फलाह विद्यापीठाचे संस्थापक जवाद सिद्दीकींना ४१५ कोटींच्या फसवणुकी प्रकरणी ईडी कोठडी; १३ दिवसांची रिमांड
16
"जेव्हा मुस्लीम अल्लाहवर विश्वास ठेवतो, तेव्हा शत्रूवर फेकलेली मातीही मिसाइल बनते, पुन्हा युद्द झाले तर..."; मुनीर यांची 'कोल्हेकुई' 
17
'हो, आम्ही काश्मीरपासून लाल किल्ल्यापर्यंत हल्ले केले... ', सीमापार दहशतवादाबद्दल पाक नेत्याची धक्कादायक कबुली
18
Delhi Blast : "आता कुटुंबाचं पोट कसं भरणार?"; दिल्ली स्फोटातील जखमींची मन हेलावून टाकणारी गोष्ट
19
अफगाणिस्तानचे उद्योगमंत्री भारत दौऱ्यावर; 'या' महत्वाच्या विषयांवर होणार चर्चा...
20
जुन्या वाहन मालकांना जबर धक्का...! वाहनांचे आयुष्य १५ वरून १० वर्षे झाले, फिटनेसचे शुल्क १० पटींनी वाढविले...
Daily Top 2Weekly Top 5

गोळीबाराचा आवाज आला अन् जावेदने त्यांना माघारी फिरवले; नागपूरचे कुटुंब मृत्यूच्या दारातून परतले

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:51 IST

काश्मीरच्या टॅक्सी ड्रायव्हरमुळे वाचले कावळे कुटुंबीय

Pahalgam Terror Attack News: काळ आला होता, पण वेळ आली नव्हती, नागपूरच्या एका कुटुंबासोबतच असाच काहीसा प्रकार घडला. सोनमर्ग, गुलमर्ग, टुलीप गार्डन फिरून झाले. त्यानंतर ते कुटुंबीय पहलगामला टॅक्सीने निघाले. पहलगामला पोहचल्यानंतर त्यांनी अक्रोड, केशर विकत घेतले आणि पुढे निघाले, लगेच असा गोळीबाराचा आवाज आला. ज्या ठिकाणी दहशतवादी गोळीबार करत होते, त्या ठिकाणाहून ते केवळ पाच मिनिटांच्या अंतरावर होते. 

टॅक्सी ड्रायव्हर जावेदला धोका लक्षात आला. त्याने पुढे न जाण्याचा सल्ला देत गाडी माघारी फिरवली आणि ते श्रीनगरला सुखरूप परतले. काश्मीरचा टॅक्सी ड्रायव्हर जावेदमुळे दहशतवादी हल्ल्यातून थोडक्यात बचावलेले नागपुरातील व्यंकटेशनगर येथे राहणारे कावळे कुटुंबीय काश्मीर फिरायला गेले होते. डॉ. राजेंद्र कावळे यांच्यासोबत मुलगा, मुली, आवई, नातवंड, असा परिवार होता. १९ एप्रिलला ते विमानाने दिल्लीला गेले आणि तेथून विमानानेच श्रीनगरला गेले. श्रीनगर, गुलमर्ग, सोनमर्ग फिरून झाले. त्यानंतर मंगळवारी ते पहलगामसाठी निघाले. श्रीनगर आणि परिसर फिरण्यासाठी त्यांनी एक टॅक्सी बुक केली होती. जावेद हा त्या टॅक्सीचा ड्रायव्हर होता. तीन दिवसांत तो कावळे कुटुंबीयांसोबत मिसळला होता.

कावळे कुटुंबीयांनी अगोदरच पहलगाम येथील काश्मीर पॅलेस रिसोर्ट बुक करून ठेवले होते. त्यामुळे सर्व दूर हा नियोजितच होता. पहलगामला ते पोहोचले. तेथूनच त्यांनी अक्रोड, केशर आदी खरेदी सुद्धा केले आणि नियोजित ठिकाणी ते निघाले, मात्र रस्त्यातच त्यांना गोळीबार होत असल्याचा आवाज आला. टॅक्सी ड्रायव्हर असलेल्या जावेदला पुढचा धोका लक्षात आला. त्याने ॐ कावळे कुटुंबाला पुढे न जाण्याचा सल्ला देत श्रीनगरला परत जाण्यास सांगितले, परंतु रिसोर्ट बुक असल्याने कावळे कुटुंब विचार करीत होते. त्यांना नेमके काय होत आहे, याची कल्पना आली नव्हती. खूप विचार केल्यानंतर त्यांनी जावेदचे म्हणणे ऐकले आणि परत जाण्याचा निर्णय घेतला, तसेच सीआरपीएफच्या गाड्या पोहोचल्या. ते सर्व दृश्य पाहून युद्ध सुरू झाले की काय? असे कावळे कुटुंबाला वाटू लागले. सारेच दहशतीत आले. काही वेळानंतरच त्यांना खरा प्रकार समजला. आज जावेदमुळेच आपण सुखरूप असल्याची भावना डॉ. राजेंद्र कावळे यांनी 'लोकमत'शी बोलताना व्यक्त केली. कावळे कुटुंबीय २४ तास्खेला रेल्वेने नागपूरला परत येत आहेत.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाnagpurनागपूर