एकीकडे शेतकरी समस्यांच्या मुद्यावरून राज्यातील राजकारण तापले असताना राष्ट्रीय स्वयंसेवक संघ परिवारातीलच संघटना असलेल्या भारतीय किसान संघानेदेखील आपल्या मागण्या समोर केल्या आहेत. ...
उन्हाचा त्रास सहन करीत असलेल्या रेल्वे प्रवाशांना अखेर दिलासा मिळाला असून रेल्वे प्रशासनाने मिस्ट कूलिंग सिस्टीम सुरू केली आहे. याबाबत ‘लोकमत’ने मिस्ट कूलिंग सिस्टीम बंद असल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत असल्याचे वृत्त प्रकाशित केले होते. ...
येणीकोणी (ता. नरखेड) येथील तरुण सरपंच मनीष फुके यांच्या संकल्पनेतून अत्यल्प खर्चात गावाला शुद्ध पाणीपुरवठा करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. यासाठी नैसर्गिक स्रोतांचा पुरेपूर उपयोग करण्यात आला. ...
मराठा समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आर्थिक, शैक्षणिक व सामाजिक आरक्षण लागू करावे, अशी मागणी विविध मराठा समाज संघटनांनी बुधवारी महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाकडे केली ...
आधार कार्ड लिंक करण्याच्या बहाण्याने एका व्यक्तीच्या मोबाईलवर डेबिट कार्डचा नंबर मागून परस्पर चार लाख रुपये काढून फसवणूक करण्यात आली. मंगळवारी नंदनवन येथे ही घटना घडली. ...
मराठा आरक्षणाची जनसुनावणी पावसाळ्यापर्यंत पूर्ण केली जाईल, असे महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष सेवानिवृत्त न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड यांनी येथे सांगितले. ...
जगनाडे चौक, संग्राम बारसमोर मंगळवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास एका भरधाव एसटी बसने दुचाकी स्वार युवकास चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी बसला घेरले. त्यामुळे बस चालक बस सोडून पळाला. ...
भारतात पहिली रेल्वेगाडी १६ एप्रिल १८५३ रोजी मुंबई ते ठाणे दरम्यान धावली. ती आठवण जोपासण्यासाठी दरवर्षी १० ते १६ एप्रिल दरम्यान रेल्वे सप्ताह साजरा करण्यात येतो. मध्य रेल्वेच्या इतिहासात पहिल्यांदा या सप्ताहाचे आयोजन नागपुरात करण्यात आले आहे. त्यानिमि ...
राष्ट्रसंत तुकडोजी नागपूर विद्यापीठाच्या जनसंवाद अभ्यासमंडळाचे माजी अध्यक्ष सुनील मिश्रा यांच्या ‘एलएलबी’च्या गुणपत्रिका ‘बोगस’ होत्या का, असा नागपूर विद्यापीठ प्रशासनाला संशय आहे. ...