शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’साठी तो धावला ३३३ किलोमीटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 20:56 IST

समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा उद्देश घेऊन ‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’ या संदेशाला गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी एक युवक हाती तिरंगा ध्वज घेऊन तब्बल ३३३ किलोमीटर धावला.

ठळक मुद्देअतुल चौकसेची कामगिरी : ८० वर शाळांना दिली भेट, विद्यार्थ्यांशी साधला संवाद

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी शिक्षण आवश्यक आहे. शाळेत मिळणाऱ्या शिक्षणावरच देशाचे भवितव्य अवलंबून असल्याने शालेय शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. हा उद्देश घेऊन ‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’ या संदेशाला गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी एक युवक हाती तिरंगा ध्वज घेऊन तब्बल ३३३ किलोमीटर धावला. 

यादरम्यान त्याने ७० पेक्षा जास्त गावे व ८० वर शाळांना भेटी देत शिक्षक, पालक व विद्यार्थ्यांशी संवाद साधला.अतुलकुमार चौकसे त्या तरुण धावपटूचे नाव. समाजासाठी आपले काही देणे लागते, या आयुष्यात देशासाठी काही महत्त्वपूर्ण कामगिरी करावी, या विचाराने अतुल झपाटलेला आहे. नुकतेच त्याने दक्षिण आफिक्रेच्या सहारा वाळवंटात, ५० अंशावर तापमानात, सलग सात दिवस २५० किलोमीटरची सर्वात कठीण मॅरेथॉनमध्येभारताचे प्रतिनिधित्व केले. कच्छच्या वाळवंटातही त्याने १६१ किलोमीटर तर १८ हजार फूट उंच असलेल्या हिमालयाचा दऱ्याखोऱ्यात ११४ किलोमीटरचे अंतर त्याने धावत कापले. आपल्या या धावण्याचा समाजोपयोगही व्हावा, या उद्देशाने ‘पढेंगा इंडिया, बढेंगा इंडिया’ हा संदेश गावखेड्यापर्यंत पोहोचविण्यासाठी त्याने पुढाकार घेतला. नागपूर ते पचमढी हे ३३३ किलोमीटर अंतराचे लक्ष्य ठेवले. यात त्याचा भाऊ आशिषकुमार चौकसे मदतीसाठी आला. १४ जुलै रोजी नागपूरच्या रामगिरीवरून अतुलने धावण्यास सुरुवात केली. यावेळी त्याच्यासोबतच विविध सामाजिक संस्था व क्रीडा संस्थेचे प्रतिनिधी नागपूरच्या सीमारेषपर्यंत धावले. अतुलने सहा दिवसांत ३३३ किलोमीटर अंतर कापले. यादरम्यान तीन जिल्हे, १५ तहसील, ७० पेक्षा जास्त गावे व ८० वर शाळांना भेटी दिल्या. तेथील प्राचार्य, मुख्याध्यापक, पालक, विद्यार्थ्यांना भेटून एकही मुलगा-मुलगी शिक्षणापासूच वंचित राहणार नाही, अर्धवट शिक्षण सोडून जाणाऱ्यांसाठी उपाययोजना करण्यासंदर्भातही त्याने संवाद साधला. २२ जुलै रोजी अतुल पचमढी येथे पोहचला. यावेळी डेप्युटी कमांडिंग ऑफिसर कर्नल विजय तोमर यांनी त्याचे स्वागत केले. २१ जुलै रोजी पचमढी येथे आयोजित २१ किलोमीटर मॅरेथॉन स्पर्धेतही तो सहभागी झाला.‘लोकमत’शी बोलताना अतुल म्हणाला, कुटुंबातील दारिद्र्य, वस्तीतील गुन्हेगारी प्रवृत्ती, अज्ञान, अत्यंत निकृष्ट व प्रतिकूल वातावरण आणि योग्य मार्गदर्शनाचा अभाव या सर्वांचा परिणाम मुलांच्या शिक्षणावर होतो. परिणामत: या भागात राहणारी मुले शिक्षणापासून वंचित राहत असल्याचे आढळून आले. भाविष्यात इंटरनॅशनल चॅलेंजेस्मध्ये भारताचे प्रतिनिधित्व करण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली.

टॅग्स :MarathonमॅरेथॉनIndiaभारतEducationशिक्षण