शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
3
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
4
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 
5
भारतीय संघात निवड होताच वैभव सूर्यवंशीचा रणजी सामन्यात धमाका! पण विक्रमी शतक थोडक्यात हुकलं
6
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
7
लठ्ठ लोकांसाठी आनंदाची बातमी! हृदयरोगाचा धोका कमी, समोर आला हैराण करणारा स्टडी रिपोर्ट
8
अरे बापरे! डोक सटकलं आणि गेम झोनच्या कर्मचाऱ्याचे नाक युवकाने हातोड्याने फोडले
9
११ कोटींची लॉटरी जिंकणारा 'तो' व्यक्ती अखेर सापडला! रस्त्यावर विकत होता कांदे-बटाटे अन्...
10
Smartphones: २४ जीबी रॅम, ७५०० mAh बॅटरी आणि सुपरफास्ट चार्जिंग; जबरदस्त फोन लॉन्च!
11
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
12
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
13
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
14
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
15
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
16
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
17
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
18
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
19
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
20
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  

वर्षभरानंतरही कर्जमाफीचा घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:51 IST

सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करून एक वर्ष पूर्ण झाले. परंतु अद्यापही शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. आॅक्टोबर महिन्यात सरकारने जाहिराती देऊन ९० टक्के शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा केल्याचा दावा केला होता. परंतु प्रत्यक्षात तसे झालेच नाही. सरकारला कर्ज माफी करायची नसल्याने त्यांनी यात घोळ निर्माण केला आहे, असा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

ठळक मुद्देअनिल देशमुख यांचा आरोप : ९० टक्के सातबारा कोरा झाल्याचा दावा फोल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करून एक वर्ष पूर्ण झाले. परंतु अद्यापही शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. आॅक्टोबर महिन्यात सरकारने जाहिराती देऊन ९० टक्के शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा केल्याचा दावा केला होता. परंतु प्रत्यक्षात तसे झालेच नाही. सरकारला कर्ज माफी करायची नसल्याने त्यांनी यात घोळ निर्माण केला आहे, असा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.देशमुख म्हणाले, तीन वर्षापासून आर्थिक टंचाईत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून एकाही रुपयाची मदत मिळालेली नाही. पेरणीच्या हंगामात शेतकरी खते व बियाणे कसे घ्यावे या चिंतेत आहे. असे असतानाही बँका शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम व्याजासह भरण्यासाठी तगादा लावत आहेत. ही रक्कम भरण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना ३० जून पर्यंतची मुदत दिली होती. पेरणीसाठी पैसे गोळा करावे की बँकांचे थकीत कर्ज भरावे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. जून २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ३१ आॅक्टोबरला राज्य सरकारने जाहिराती देत ३४ हजार २२ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून याचा लाभ ७० लाख शेतकऱ्यांना होईल व ९० टक्के शेतकºयांचा सातबारा कोरा होईल, असा दावा केला होता. परंतु, अद्यापही फारच कमी १० टक्के शेतकऱ्यांचाही सातबारा कोरा झालेला नाही. फसव्या जाहिराती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार सरकारने केला आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखFarmerशेतकरी