शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

वर्षभरानंतरही कर्जमाफीचा घोळ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2018 23:51 IST

सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करून एक वर्ष पूर्ण झाले. परंतु अद्यापही शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. आॅक्टोबर महिन्यात सरकारने जाहिराती देऊन ९० टक्के शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा केल्याचा दावा केला होता. परंतु प्रत्यक्षात तसे झालेच नाही. सरकारला कर्ज माफी करायची नसल्याने त्यांनी यात घोळ निर्माण केला आहे, असा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.

ठळक मुद्देअनिल देशमुख यांचा आरोप : ९० टक्के सातबारा कोरा झाल्याचा दावा फोल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सरकारतर्फे शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी जाहीर करून एक वर्ष पूर्ण झाले. परंतु अद्यापही शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. आॅक्टोबर महिन्यात सरकारने जाहिराती देऊन ९० टक्के शेतकऱ्यांच्या सातबारा कोरा केल्याचा दावा केला होता. परंतु प्रत्यक्षात तसे झालेच नाही. सरकारला कर्ज माफी करायची नसल्याने त्यांनी यात घोळ निर्माण केला आहे, असा आरोप माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे.देशमुख म्हणाले, तीन वर्षापासून आर्थिक टंचाईत असलेल्या शेतकऱ्यांना सरकारकडून एकाही रुपयाची मदत मिळालेली नाही. पेरणीच्या हंगामात शेतकरी खते व बियाणे कसे घ्यावे या चिंतेत आहे. असे असतानाही बँका शेतकऱ्यांना उर्वरित रक्कम व्याजासह भरण्यासाठी तगादा लावत आहेत. ही रक्कम भरण्यासाठी बँकांनी शेतकऱ्यांना ३० जून पर्यंतची मुदत दिली होती. पेरणीसाठी पैसे गोळा करावे की बँकांचे थकीत कर्ज भरावे असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर आहे. जून २०१७ मध्ये कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर ३१ आॅक्टोबरला राज्य सरकारने जाहिराती देत ३४ हजार २२ कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली असून याचा लाभ ७० लाख शेतकऱ्यांना होईल व ९० टक्के शेतकºयांचा सातबारा कोरा होईल, असा दावा केला होता. परंतु, अद्यापही फारच कमी १० टक्के शेतकऱ्यांचाही सातबारा कोरा झालेला नाही. फसव्या जाहिराती देऊन शेतकऱ्यांची दिशाभूल करण्याचा प्रकार सरकारने केला आहे, असा आरोपही देशमुख यांनी केला आहे.

टॅग्स :Anil Deshmukhअनिल देशमुखFarmerशेतकरी