शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
3
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
4
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
6
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
7
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
8
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
9
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
10
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
11
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
12
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
13
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
14
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
15
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
16
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
17
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
18
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
19
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
20
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
Daily Top 2Weekly Top 5

चार वर्षात धावत्या रेल्वेने घेतला सातशेवर जणांची बळी; चार वर्षांची धक्कादायक आकडेवारी

By नरेश डोंगरे | Updated: May 6, 2023 18:48 IST

Nagpur News अपघात, आत्महत्या तसेच विविध कारणामुळे नागपूर जिल्ह्यात धावत्या रेल्वेने गेल्या चार वर्षात सातशेवर जणांचा बळी घेतला. यातील सर्वाधिक मृत्यूची संख्या २०२२ मधील आहे.

नागपूर : अपघात, आत्महत्या तसेच विविध कारणामुळे नागपूर जिल्ह्यात धावत्या रेल्वेने गेल्या चार वर्षात सातशेवर जणांचा बळी घेतला. यातील सर्वाधिक मृत्यूची संख्या २०२२ मधील आहे.

गेल्या वर्षी रेल्वेची धडक बसल्यामुळे, रेल्वे खाली झोकून दिल्यामुळे, कुणाला रेल्वे समोर ढकलून दिल्यामुळे तर कुणाचा तोल जाऊन पडल्यामुळे एकूण २९८ जणांचा बळी गेला. अशाच प्रकारे वेगवेगळ्या कारणामुळे रेल्वेने ठार झालेल्यांची माहिती आरटीआय कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी मिळवण्याचा प्रयत्न केला. त्यातून सन २०२० ते २०२३ पर्यंत चार वर्षाची माहिती पुढे आली. त्यातून उघड झालेला मृत्यूचा आकडा धक्कादायक आहे.

सन २०२० मध्ये विविध कारणामुळे रेल्वेने ठार झालेल्यांची संख्या १५५ आहे. २०२१ मध्ये १९० जणांचा मृत्यू झाला. तर २०२२ मध्ये हा आकडा २९८ वर पोहोचला. २०२३ मार्च अखेर पर्यंत नागपूर विभागात तब्बल ६५ व्यक्तींचा रेल्वेमुळे मृत्यू झाल्याची अधिकृत नोंद आहे. गेल्या चार वर्षातील ही आकडेवारी बघता रेल्वेने ठार होणाऱ्यांची संख्या दरवर्षी मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे दिसून येते. 

रेल्वे लाईन ओलांडताना सर्वाधिक मृत्यूरेल्वे पोलीस ठाण्यात नोंदविलेल्या रेल्वेशी संबंधित प्रकरणात सर्वाधिक मृत्यू रेल्वे रुळ ओलांडताना झाल्याचे नमूद आहे. रुळ ओलांडताना मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १५७ आहे. त्यातील २०२० आणि २०२१ ला प्रत्येकी ४६ असे एकूण ९२ मृत्यू झाले. २०२२ मध्ये ५३ जणांचे तर ३१ मार्च २०२३ पर्यंत १२ जणांच्या मृत्यूचा समावेश आहे.

११० जणांची आत्महत्या

रेल्वेसमोर स्वत:ला झोकून देऊन चार वर्षांत ११० जणांनी आत्महत्या केली. त्यात २०२० मध्ये २७, २०२१ मध्ये २९, २०२२ मध्ये ४४ तर ३१ मार्च २०२३ पर्यंत १० जणांनी आत्महत्या केल्याचे रेल्वेच्या पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. 

मुंबई-पुण्यासारखी स्टंटबाजी नाहीमुंबई, पुण्याकडे रेल्वेतून स्टंटबाजी करताना अपघात घडतो आणि अनेक जण त्यात प्राण गमावतात. नागपूर जिल्ह्यात गेल्या चार वर्षांत अशा प्रकारची एकही घटना घडलेली नाही. नागपूर जिल्ह्यात रेल्वेतून कुणी स्टंटबाजी करताना अपघात झाल्याची नोंद नाही. 

टॅग्स :Indian Railwayभारतीय रेल्वेAccidentअपघात