शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
2
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
3
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
4
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
5
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
6
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
7
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
8
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
9
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
10
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...
11
Roshni Walia : "कधीकधी काही लोक...", वडिलांनी सोडली आईची साथ, नातेवाईकांनी दिला शाप, अभिनेत्री भावुक
12
मोहम्मद मुइझ्झूंचा चीनला धक्का; भारतासोबत मुक्त व्यापार करार करण्याची व्यक्त केली इच्छा...
13
श्रावण विनायक चतुर्थी: दूर्वागणपती व्रत का करतात? वाचा, बाप्पाला प्रिय अमृतासमान दुर्वा कथा
14
यापेक्षा चांगली संधी मिळणार नाही; ही कंपनी आपल्या कारवर देतेय १ लाख रुपयांची सूट
15
कुठे गेला 'श्वास'मधला चिमुकला 'परश्या'? २९ वर्षीय तरुणाने आता धरली वेगळीच वाट
16
IND vs ENG: गिल-राहुलची फलंदाजी अन् स्टोक्सची तंदुरूस्ती... 'या' ५ गोष्टी ठरवतील चौथ्या कसोटीचा निकाल
17
चातुर्मासातील पहिली श्रावण विनायक चतुर्थी: गणपती होईल प्रसन्न, कसे कराल व्रतपूजन? शुभच घडेल
18
पहिला श्रावणी सोमवार: ‘असे’ करा शिवपूजन, कोणती शिवामूठ वाहावी? पाहा, महत्त्व अन् मान्यता
19
Corona Virus : संकटं संपता संपेना! कोरोना महामारीचा मेंदूवर भयंकर परिणाम, संसर्ग झाला नसला तरी...
20
प्राडाच्या वादानंतर कोल्हापुरी चप्पलांना QR कोड! संघटनेने का घेतला असा निर्णय? जाणून घ्या कोल्हापुरीचा इतिहास!

३० लाखांवर प्रवासी ट्रेनने पोहचले कुंभमेळ्यात; रविवारी ३३० गाड्या, तर सोमवारी दुपारपर्यंत १९१ गाड्यांची व्यवस्था

By नरेश डोंगरे | Updated: February 11, 2025 00:51 IST

नागपूर - दानापूर- नागपूर कुंभमेळा दरम्यान ४ विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण १२ फेऱ्या (जाण्या-येण्याच्या) झाल्या असून, सुमारे ३० हजार प्रवाशांनी नागपुरातून कुंभमेळ्यासाठी प्रवास केल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

नागपूर : प्रयागराजला सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात सहभागी होणाऱ्या भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. प्रत्येक रेल्वेगाडी प्रवाशांनी खच्चून भरून धावत आहेत. रविवारी दिवसभरात प्रयागराज येथून ३३० रेल्वेगाड्या सोडण्यात आल्या होत्या. त्यातून १२ लाख, ५० हजार प्रवाशांनी प्रवास केला. तर, सोमवारी दुपारी ३ वाजतापर्यंत १९१ गाड्यांमधून ८ लाख, १८ हजार प्रवाशांनी प्रवास केल्याची माहिती मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक विानयक गर्ग तसेच दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे विभागीय व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांनी आज पत्रकारांना दिली.प्रयागराजमध्ये भाविक प्रचंड संख्येत जमा झाल्यामुळे तेथे ट्रॅफिक जामची स्थिती निर्माण झाल्याचे सचित्र वृत्त चोहोबाजूने येत आहे. वाहतुक व्यवस्था कोलमडल्याचेही बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर, मध्य आणि दपूम रेल्वेच्या व्यवस्थापकांनी तडकाफडकी स्वतंत्ररित्या पत्रकार परिषद घेऊन रेल्वे प्रवासी आणि स्थिती विशद केली. प्रयागराजमध्ये एकूण ८ रेल्वे स्थानक असून, प्रवाशांच्या सोयीसाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले.

नागपुरातून ३० हजार प्रवासीनागपूर - दानापूर- नागपूर कुंभमेळा दरम्यान ४ विशेष गाड्या सोडण्यात आल्या आहेत. आतापर्यंत एकूण १२ फेऱ्या (जाण्या-येण्याच्या) झाल्या असून, सुमारे ३० हजार प्रवाशांनी नागपुरातून कुंभमेळ्यासाठी प्रवास केल्याचा अंदाज अधिकाऱ्यांनी वर्तविला आहे.

तिकीट तपासणीची विशेष मोहीमप्रयागराजला जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर फुकटे प्रवासी प्रवास करीत आहे. त्यांच्यामुळे तिकीट काढून प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. ते लक्षात घेता मंगळवारपासून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाच्या वतीने कुंभमेळा स्पेशल ट्रेनमध्ये विशेष तिकीट तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे.प्रवाशांना आवाहन - २६ फेब्रुवारीपर्यंत नागपूरहून आणखी काही रेल्वे गाड्या चालविण्याचा विचार आहे. कुंभमेळाकरिता प्रवास करीत असलेल्या प्रवाशांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही, याची आम्ही काळजी घेत आहोत. मात्र, सर्व प्रवाशांनी तिकीट काढूनच प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे अधिकाऱ्यांनी केले आहे. 

टॅग्स :Kumbh Melaकुंभ मेळाIndian Railwayभारतीय रेल्वेrailwayरेल्वे