शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

...तर संपूर्ण नागपूर रेल्वे स्थानक खाक झालं असतं

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 06, 2018 3:00 PM

नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री ३.२० वाजताच्या दरम्यान पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला अचानक आग लागली. वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले, अन्यथा अख्खे नागपूर रेल्वेस्थानक जळून खाक होण्याची शक्यता होती.

ठळक मुद्देपेट्रोलने भरलेल्या वॅगनला आगमोठी दुर्घटना टळलीअग्नीशमन विभागाने मिळविले आगीवर नियंत्रण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर शनिवारी रात्री ३.२० वाजताच्या दरम्यान पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला अचानक आग लागली. वेळीच या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन विभागाला यश आले, अन्यथा अख्खे नागपूर रेल्वेस्थानक जळून खाक होण्याची शक्यता होती. सुरुवातीच्या रेल्वेस्थानकावर बेजबाबदारपणा झाल्यामुळे या वॅगनचे झाकण उघडे राहिल्यामुळे ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. या प्रकरणी चौकशी समिती गठीत करण्यात आली असून समितीचा अहवाल आल्यानंतरच आगीचे खरे कारण कळू शकणार आहे.रेल्वे सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीकानेरवरून ५० वॅगनची एक मालगाडी पेट्रोल घेऊन विजयवाडाकडे जात होती. ही गाडी शनिवारी रात्री ३.२० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक १ आणि २ मधील लुपलाईनवर आली. मालगाडीच्या इंजिनपासून दहाव्या क्रमांकाच्या वॅगनला (वॅगन क्रमांक-डब्ल्यूआर ४७०८१२१४०७०) ला अचानक आग लागली. वॅगनच्या वरील झाकणातून आगीचे लोळ निघताना दिसत होते. याबाबत उपस्टेशन व्यवस्थापक कार्यालयाला माहिती मिळाली. घटनेची माहिती मिळताच नागपूर विभागातील अधिकाऱ्यांनी त्वरीत अग्निशमन विभागाला पाचारण केले. सिव्हील लाईन्स आणि गंजीपेठ येथील अग्शिशमन विभागाच्या गाड्या त्वरीत रेल्वेस्थानकावर पोहोचल्या. अग्निशमन विभागाच्या कर्मचाºयांनी फोमच्या (केमिकल) साह्याने आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरु केले. अखेर ४.४५ वाजता आगीवर नियंत्रण मिळविण्यात त्यांना यश आले. त्यानंतर ही मालगाडी अजनी यार्डात नेऊन उभी करण्यात आली. तेथे बारकाईने मालगाडीची तपासणी करण्यात आली. दुपारपर्यंत रेल्वेचे अधिकारी मालगाडीबाबत माहिती घेताना दिसले.२००९ मध्ये घडली होती घटनानागपूर रेल्वेस्थानकावर पेट्रोलने भरलेल्या मालगाडीला आग लागण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी ६ मार्च २००९ ला पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनला आग लागली होती. त्या वेळी आरपीएफचा जवान प्रमोद दैने, तुषार विघ्ने यांच्यासह जवानांनी कर्तव्यदक्षता दाखविली होती. ओएचई तारेतील विद्युत प्रवाह बंद करून उद्घोषणा प्रणालीच्या माध्यमातून प्लॅटफार्म क्रमांक १ आणि २ वरील प्रवाशांना दुसरीकडे हलविण्यात आले होते. रेल्वेगाड्यांचे आवागमनही अजनी आणि गोधणी रेल्वेस्थानकावर थांबविण्यात आले होते. त्यावेळीही एक मोठी दुर्घटना टळली होती.निष्काळजीपणा झाल्याची शंकारेल्वे तज्ज्ञांच्या मते पेट्रोलच्या वॅगनमध्ये दोन झाकणे असतात. यात आतील आणि बाहेरील झाकणांचा समावेश आहे. प्राथमिकदृष्ट्या हे मानण्यात येत आहे की बिकानेरमध्ये पेट्रोलने भरलेल्या मालगाडीच्या वॅगनचे वरील झाकण योग्यरित्या बंद केले नव्हते. त्यामुळे प्रवासात झाकणाचे सील तुटले आणि ते उघडले. यामुळे ओएचई तार आणि वॅगनच्या दरम्यान संपर्क आला आणि शॉट सर्किटमुळे आग लागली असावी. परंतु चौकशीनंतरच आगीचे खरे कारण समजू शकणार आहे.दोन दिवसात येणार चौकशीचा अहवाल‘बिकानेरवरून विजयवाडाला जात असलेल्या मालगाडीच्या एका वॅगनला रात्री आग लागली होती. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातर्फे या घटनेची प्राथमिक तपासणी करण्यात येत आहे. चौकशीचा अहवाल आगामी दोन दिवसात बिकानेर आणि विजयवाडाच्या रेल्वे प्रशासनाला देण्यात येईल त्यानंतर घटनेची चौकशी करण्यात येईल.’-कुश किशोर मिश्र, सिनिअर डीसीएम, मध्य रेल्वे नागपूर विभाग 

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरfireआग