शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
Asia Cup 2025 Points Table : हे २ संघ 'आउट'; Super Four च्या शर्यतीत टीम इंडियाचा पहिला नंबर
3
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
4
SL vs HK : ६ कॅच सोडूनही हाँगकाँगनं मॅचमध्ये आणलेलं ट्विस्ट; Free Hit सह जयसूर्या झाला टेन्शन फ्री
5
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
6
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
7
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
8
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
9
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
10
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
11
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
12
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
13
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
14
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
15
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
16
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
17
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
18
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
19
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
20
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान

नागपुरात २० डिसेंबरपासून महाराष्ट्र खाद्य महोत्सवाचे आयोजन; राज्यभरातील पदार्थांचे ४० स्टॉल्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 15, 2017 21:44 IST

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ व लोकमाता सुमतीताई सुकळीकर स्मृती प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने २० ते २५ डिसेंबरपर्यंत सिव्हिल लाईन्स येथील दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या परिसरात महाराष्ट्र खाद्य महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.

ठळक मुद्देना. मदन येरावार यांची माहिती एक लाखावर नागरिक लाभ घेण्याची अपेक्षा

आॅनलाईन लोकमतनागपूर : महोत्सवात राज्यभरातील प्रसिद्ध व्यंजनांचे ४० स्टॉल्स राहणार असून एक लाखावर नागरिक महोत्सवाचा लाभ घेतील अशी आयोजकांना अपेक्षा आहे. गेल्यावर्षी सुमारे ६० हजार नागरिकांनी महोत्सवातील स्वादिष्ट व्यंजनांचा आस्वाद घेतला होता.पर्यटन राज्यमंत्री मदन येरावार यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत महोत्सवाची माहिती दिली. २० डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन करण्यात येईल. याप्रसंगी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे व पर्यटन मंत्री जयकुमार रावल प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. महाराष्ट्रातील खाद्य पदार्थ जगभरात प्रसिद्ध आहेत. त्या पदार्थांची लोकप्रियता आणखी वाढावी हा या महोत्सवाचा उद्देश आहे. महोत्सवामध्ये कोकणातील माशांचे विविध प्रकार, मालवणमधील कोंबडी वडे, मटण करी, खान्देशातील भरली वांगी, शेव भाजी, विदर्भातील सावजी, वडा पाव, पोहे इत्यादी पदार्थांचे स्टॉल्स राहणार आहेत असे येरावार यांनी सांगितले.महोत्सवाचे औचित्य साधून अमरावती-यवतमाळ-वणी खाण पर्यटन सहलीची सुरुवात करण्यात येणार आहे. तसेच, बोदलकसा या पर्यटनस्थळाची ओळख करून देण्यात येणार आहे. या ठिकाणी भव्य धरण व अन्य आकर्षक स्थळे आहेत. हे ठिकाण नागपूरपासून १३५ किलोमीटर अंतरावर आहे. महोत्सवादरम्यान मराठी गायिका सावनी रवींद्र यांचा कार्यक्रम, एलएडी महाविद्यालयाचा फॅशन शो, लावणी नृत्य, रॉक शो, लोकनृत्य इत्यादी कार्यक्रमही सादर केले जाणार आहेत याकडे येरावार यांनी लक्ष वेधले.पत्रकार परिषदेत पर्यटन व सांस्कृतिक विभागाचे प्रधान सचिव नितीन गद्रे, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विजय वाघमारे, महाव्यवस्थापक स्वाती काळे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. उदय बोधनकर, सचिव ज्योत्स्ना पंडित आदी उपस्थित होते.राज्यात टुरिझम कॅरिडॉरपर्यटनाला चालना देण्यासाठी राज्यात टुरिझम कॅरिडॉर तयार करण्यात येणार असून त्याचे काम लवकरच सुरू होईल अशी माहिती येरावार यांनी दिली. पर्यटनस्थळी दर्जेदार पायाभूत सुविधा निर्माण करण्यात येतील व राज्यातील पर्यटनस्थळांचे जगभर ब्रॅन्डिंग करण्यात येईल असेही त्यांनी यावेळी सांगितले. 

 

टॅग्स :foodअन्न