शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

ग्राहक मंचचा आदेश : ३.८५ लाख रुपये १६ टक्के व्याजासह परत करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2019 23:30 IST

तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ८५ हजार रुपये १६ टक्के व्याजासह परत करण्यात यावे असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सिरसपेठ येथील गजानन लॅन्ड डेव्हलपर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ६० हजार रुपयाची भरपाई मंजूर केली. ही रक्कमही डेव्हलपर्सने द्यायची आहे.

ठळक मुद्देगजानन लॅन्ड डेव्हलपर्सला चपराक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाचे ३ लाख ८५ हजार रुपये १६ टक्के व्याजासह परत करण्यात यावे असा आदेश जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने सिरसपेठ येथील गजानन लॅन्ड डेव्हलपर्सला दिला. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५० हजार व तक्रारीच्या खर्चापोटी १० हजार अशी एकूण ६० हजार रुपयाची भरपाई मंजूर केली. ही रक्कमही डेव्हलपर्सने द्यायची आहे.मंचचे अध्यक्ष संजय पाटील, सदस्य नितीन घरडे व चंद्रिका बैस यांनी हा निर्णय दिला. ३ लाख ८५ हजार रुपयावर २८ सप्टेंबर २०१५ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत १६ टक्के व्याज लागू करण्यात आले आहे. या निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी डेव्हलपर्सला ३० दिवसाची मुदत देण्यात आली आहे. या निर्णयामुळे डेव्हलपर्सला जोरदार चपराक बसली.खेमराज खापर्डे असे तक्रारकर्त्या ग्राहकाचे नाव असून ते सोमलवाडा येथील रहिवासी आहेत. त्यांनी गजानन लॅन्ड डेव्हलपर्सच्या मौजा खलासना, ता. कुही येथील श्री गजानन नगरी-१ ले-आऊट (खसरा क्र. १६२/२)मधील १९२७.४६ चौरसफुटाचा भूखंड ३ लाख ८७ हजार ४२० रुपयांत खरेदी केला होता. त्यानंतर त्यांनी डेव्हलपर्सला वेळोवेळी एकूण ३ लाख ८५ हजार रुपये दिले. तसेच, भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून देण्याची मागणी केली. परंतु, डेव्हलपर्सने त्यांना दाद दिली नाही. भूखंडाचे कब्जापत्र करून देण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळे खापर्डे यांनी २४ सप्टेंबर २०१६ रोजी डेव्हलपर्सला कायदेशीर नोटीस बजावली. डेव्हलपर्सने त्यालादेखील उत्तर दिले नाही. परिणामी, खापर्डे यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल करून ३ लाख ८५ हजार रुपये २५ मार्च २०१३ पासून १८ टक्के व्याजासह परत मिळण्याची आणि शारीरिक-मानसिक त्रासाकरिता दोन लाख व तक्रारीच्या खर्चापोटी ५० हजार रुपये भरपाई देण्याची मागणी केली होती. मंचने विविध बाबी लक्षात घेता हा निर्णय दिला.निर्णयातील निष्कर्षडेव्हलपर्सने बहुतांश रक्कम स्वीकारूनही भूखंडाचे विक्रीपत्र नोंदवून दिले नाही. ही कृती सेवेतील त्रुटी व अनुचित व्यापार प्रथेचा अवलंब करणारी दिसून येते. त्यामुळे तक्रारकर्ता ग्राहक भूखंडाची रक्कम व्याजासह परत मिळण्यास आणि शारीरिक, मानसिक व आर्थिक त्रासाकरिता योग्य भरपाई मिळण्यास पात्र आहे असा निष्कर्ष मंचने निर्णयात नोंदवला आहे.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे