शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

संत्र्याला हेक्टरी ५० हजार भरपाई मिळावी ; अकोल्यातील शेतकऱ्यांची हायकोर्टात याचिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2025 18:38 IST

Nagpur : विमाधारक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, याकरिता अकोला जिल्ह्यातील अकोट येथील प्रमोद तराळे, विष्णू मांगले, पवन धारट व गणेश मालते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : विमाधारक संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये नुकसान भरपाई मिळावी, याकरिता अकोला जिल्ह्यातील अकोट येथील प्रमोद तराळे, विष्णू मांगले, पवन धारट व गणेश मालते यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे. संबंधित शेतकऱ्यांना सध्या केवळ हेक्टरी १५ हजार रुपये अदा करण्यात आले आहेत.

राज्याच्या कृषी विभागाने प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत १२ जून २०२४ रोजी जारी केलेल्या निर्णयानुसार अनेक शेतकऱ्यांनी २०२४-२५ या वर्षातील मृग बहार हंगामासाठी संत्रा पिकाचा विमा काढला होता. या योजनेच्या अंमलबजावणीकरिता युनिव्हर्सल सोम्पो जनरल इंशुरन्स कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. दरम्यान, १५ जून ते १५ जुलै २०२४ पर्यंत अकोट तालुक्यातील उमरा सर्कलमध्ये १२२.५ मिमी पाऊस पडला. त्यामुळे संत्रा पिकाचे प्रचंड नुकसान झाले. 

त्यानंतर शेतकऱ्यांना भरपाई देण्यासाठी कृषी विभागाने ६ कोटी ५९ लाख ५७ हजार, राज्य सरकारने ४ कोटी ९२ लाख ४६ हजार तर, केंद्र सरकारने २ कोटी २२ लाख ७३ हजार रुपये विमा कंपनीला अदा केले. परंतु, विमा कंपनीने पात्र शेतकऱ्यांना केवळ १५ हजार रुपये हेक्टरप्रमाणे भरपाई दिली आहे. विमा योजनेनुसार ५० हजार रुपये हेक्टरप्रमाणे भरपाई देणे बंधनकारक आहे. परिणामी, शेतकरी उर्वरित हेक्टरी ३५ हजार रुपये भरपाईची प्रतीक्षा करीत आहे. शेतकऱ्यांनी यासंदर्भात १६ ऑक्टोबर रोजी कृषी सचिवांना निवेदन सादर केले. पण त्यावर अद्याप निर्णय घेण्यात आला नाही.

११ फेब्रुवारीपर्यंत सरकारला मागितले उत्तर

या प्रकरणावर न्यायमूर्तिद्वय अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्यासमक्ष सुनावणी झाली. त्यानंतर न्यायालयाने कृषी विभागाचे सचिव, विमा कंपनी व इतर प्रतिवादींना नोटीस बजावून येत्या ११ फेब्रुवारीपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले. याचिकाकर्त्यांतर्फे अॅड. विपुल भिसे तर, सरकारतर्फे अॅड. नितीन राव यांनी बाजू मांडली. 

English
हिंदी सारांश
Web Title : Akola Farmers Seek ₹50,000/Hectare Compensation for Orange Crop Loss

Web Summary : Akola farmers filed a petition in High Court seeking ₹50,000 per hectare compensation for orange crop loss due to excessive rain. Despite crop insurance, they received only ₹15,000. Court has directed government and insurance company to respond by February 11.
टॅग्स :nagpurनागपूरHigh Courtउच्च न्यायालयFarmerशेतकरी