बंगालच्या ‘संत्रा’ टोळीने घातला
By Admin | Updated: May 21, 2014 00:58 IST2014-05-21T00:58:52+5:302014-05-21T00:58:52+5:30
सुवर्ण समृध्दी योजनेच्या नावाखाली अनेकांकडून लाखो रुपये घेऊन पश्चिम बंगालमधील ‘संत्रा टोळीने’ पलायन केले. समीर अभिनी संत्रा (वय ४०), अमोल ऊर्फ अमन नंदलाल संत्रा

बंगालच्या ‘संत्रा’ टोळीने घातला
अनेकांना गंडा सुवर्ण समृध्दीच्या नावाखाली चुना : १० लाख हडपले
नागपूर : सुवर्ण समृध्दी योजनेच्या नावाखाली अनेकांकडून लाखो रुपये घेऊन पश्चिम बंगालमधील ‘संत्रा टोळीने’ पलायन केले. समीर अभिनी संत्रा (वय ४०), अमोल ऊर्फ अमन नंदलाल संत्रा (वय ३०) आणि विमल नंदलाल संत्रा (वय २४, रा. सर्व हावडा, प. बंगाल) अशी या टोळीतील भामट्यांची नावे आहेत. दोन वर्षांपूर्वी संत्राटोळी नागपुरात आली. त्यांनी शांतिनगर (करुणानगर) लकडगंजमधील बाल्या गजभियेच्या घरी रूम भाड्याने घेतली. अवैध सावकारीच्या माध्यमातून परिसरातील नागरिकांसोबत ओळख्या वाढवल्यानंतर मार्च २०१३ मध्ये त्यांनी सोन्याची भिसी सुरू केली. दर महिन्याला पाच हजार रुपये जमा केल्यास १२ महिन्यानंतर तीन तोळ्याचे सोन्याचे दागिने मिळेल, असे त्यांनी सांगितले. या योजनेला त्यांनी ‘सुवर्ण समृध्दी’ असे गोंडस नाव दिले. संजय साजन सफेलकर (वय ३१, रा. बाबा रामसुमेरनगर) आणि अन्य सात लोकांनी या योजनेत १० लाख रुपये जमा केले. ३ मार्च २०१४ ला या योजनेची मुदत संपल्यानंतर नागरिकांनी त्यांना सोन्याच्या दागिन्यांची मागणी केली. आरोपींनी काही दिवस टाळाटाळ केल्यानंतर परिसरातून पळ काढला. आपली फसगत झाल्याचे कळताच पीडितांनी लकडगंज ठाण्यात धाव घेतली. सफेलकरच्या तक्रारीवरून पोलिसांनी संत्रा टोळीविरुद्ध गुन्हे दाखल केले. (प्रतिनिधी)