शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

संत्रा, मोसंबी उत्पादकांची दरवर्षी २२५ कोटी रुपयांनी लूट

By सुनील चरपे | Updated: July 28, 2025 15:09 IST

१० टक्के काट व ७ टक्के कमिशन : नागपूरच्या कळमना बाजार समितीतील प्रकार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कळमना (नागपूर) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये संत्रा व मोसंबीच्या खरेदीवर व्यापारी शेतकऱ्यांकडून प्रतिटन एक क्विंटल म्हणजेच १० टक्के काट आणि सात टक्के कमिशन घेतात. हा प्रकार मागील २५ वर्षापासून सुरू आहे. या बाजार समितीत व्यापारी दरवर्षी सरासरी ३ लाख ५० हजार टन संत्रा व २ लाख ७५ हजार टन मोसंबी शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. १० टक्के काट विचारात घेता शेतकऱ्यांची १५० कोटी रुपये व सात टक्के कमिशनपोटी १०५ कोटी रुपयांची लूट सुरू आहे.

व्यापारी कळमना मार्केटमधील शेतकऱ्यांकडून ११ क्विंटल संत्रा व मोसंबी खरेदी करतात आणि १० क्विंटल (एक टन) चे पैसे देतात. सोबतच एकूण रकमेवर सात ते आठ टक्के कमिशन घेतात. हा प्रकार मागील २५ वर्षापासून सुरू आहे. पूर्वी पाच टक्के म्हणजे १० क्विंटलवर ५० किलो काट घेतला जायचा. सोबतच कमिशनदेखील कमी होते. सन २०१५ पासून एक क्विंटल काट व सात ते आठ टक्के कमिशन घेणे सुरू झाले. जेव्हापासून वजनाने संत्रा, मोसंबी खरेदी करणे सुरू झाले, तेव्हापासून हा प्रकार सुरू झाला, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. या संपूर्ण व्यवहाराची एसआयटीमार्फत स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे.

पणन संचालकांकडे तक्रारकाट व कमिशनबाबत डिसेंबर २०२४ मध्ये कळमना बाजार समितीच्या सभागृहात पणन संचालक रसाळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात संत्रा व मोसंबी उत्पादकांच्या १०० प्रतिनिधींनी आ. डॉ. आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत रसाळ यांच्याकडे तक्रार करत हा प्रकार बंद करून कारवाईची मागणी केली. मात्र, काहीच कारवाई करण्यात आली नाही. 

लुटीचा हिशेब

  • संत्रा व मोसंबीचे सरासरी दर २५ हजार रुपये प्रतिटन आणि १० टक्के काट म्हणजेच प्रत्येकी ३० हजार टन संत्रा व मोसंबी विचारात घेतल्यास ही रक्कम प्रत्येकी ७५ कोटी रुपयांप्रमाणे १५० कोटी रुपये होतात.
  • संत्रा व मोसंबीच्या एकूण रकमेवरील सात ते आठ टक्के कमिशन विचारात घेतले तर ही रक्कम १०५ कोटी रुपयांवर जाते. दोन्ही मिळून ही लूट २२५ कोटी रुपयांवर पोहोचते. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही.

शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावीशेतकरी एकमुस्त संत्रा, मोसंबी विकायला आणतात. त्यात लहान, मध्यम व मोठ्या आकाराची फळे असतात. व्यापारी लहान व मध्यम आकाराच्या फळांवर लक्ष केंद्रित करून दर ठरवतात व नुकसान टाळण्यासाठी काट घेतात. शेतकऱ्यांनी स्वतःच बागेची विरळणी करून मोठ्या आकाराची फळे बाजारात विकावी. झाडांवरील छोटी व मध्यम फळे मोठी झाल्यानंतर ती बाजारात आणावी.

संत्र्याची खरेदीसन २०२३-२४ ३,४५,२६० टनसन २०२४-२५ ३,६७,२५२ टन

मोसंबीची खरेदीसन २०२३-२४ ३,०१,२९४ टनसन २०२४-२५ १,९६,६९४ टन

टॅग्स :nagpurनागपूर