शहरं
Join us  
Trending Stories
1
विराट, सिराज, संजू T20 World Cup मधील भारताच्या एकमेव सराव सामन्याला मुकणार
2
होय, मी २००४ सालापासून भाजपशी युती व्हावी असा आग्रह पवारांकडे धरला होता, पण...; पटेलांचा मोठा खुलासा
3
मतदानापूर्वी नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाचा वाहतुकीबाबत महत्त्वपूर्ण निर्णय
4
उत्तर प्रदेशात भाजप किती जागा जिंकणार? राहुल गांधींनी थेट आकडाच सांगितला...
5
RR vs KKR सामन्याचा ग्राऊंड रिपोर्ट! मॅच रद्द झाल्यास असं असेल Playoffs चं वेळापत्रक 
6
'देशात परिवर्तन अटळ! महाराष्ट्रातून भाजप आणि मित्रमंडळीचा सुपडा साफ होणार', नाना पटोलेंचा दावा
7
पद्मश्री पुरस्कारानंतर राजकारणातील प्रतिष्ठित पुरस्कार जिंकण्याचं कंगना याचं स्वप्न; म्हणाल्या...
8
राज्यात महाविकास आघाडीच्या ४० पेक्षा जास्त जागा येतील, बाळासाहेब थोरातांना विश्वास
9
इराणच्या राष्ट्रपतींना घेऊन जाणारं हेलिकॉप्टर क्रॅश, बचाव पथक रवाना
10
'...तर मी तेव्हाच मुख्यमंत्री झालो असतो', छगन भुजबळ यांचा मोठा गौप्यस्फोट
11
सनरायझर्स हैदराबादचा दणदणीत विजय, पण क्वालिफायर १ ची जागा RR vs KKR सामन्यावर अवलंबून
12
"एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्रीपदाला संजय राऊतांचाच विरोध होता", अजित पवार गटाचा पलटवार
13
मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या मतांसाठी संतांचा अपमान..; PM मोदींचा ममता बॅनर्जींवर हल्लाबोल
14
‘मोदींचं गुणगान गाऊन योगींकडून भगव्या वस्त्राचा अपमान, भगवे कपडे घालून संतांसारखे…’ नाना पटोलेंचा सल्ला
15
"भाजपला डिस्टर्ब करू नका, निवडणूक संपताच...", हिमंता यांचा माजी IPS अधिकाऱ्याला इशारा
16
आमदार पी.एन. पाटील यांची प्रकृती बिघडली; खासगी रुग्णालयात दाखल, तातडीने शस्त्रक्रिया सुरु
17
ऑल दी बेस्ट, रोहित अँड... ! Mumbai Indians च्या अपयशानंतर असं का म्हणाल्या नीता अंबानी?
18
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
19
पंजाब किंग्सची जोरदार फटकेबाजी, सनरायझर्स हैदराबादसमोर दोनशेपार लक्ष्य
20
Video:'भारतीय लहेजाची लाज वाटते?'; Cannes च्या रेड कार्पेटवर इंग्रजी बोलण्याने कियारा ट्रोल

- तर विरोधकांना बॉम्बवर बसवून पाठवायचे होते : सतपाल महाराज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 11:18 PM

पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी पाकिस्तानात एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. यात अनेक दहशतवादी मारले गेले. पण विरोधक यातही राजकारण करीत किती दहशतवादी मारले गेले, याचा पुरावा मागत आहेत. या विरोधकांना बॉम्बवर बसवून पाकिस्तानात पाठवायचे होते, तेव्हाच मृतांचा खरा आकडा कळाला असता, अशी टीका उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी केली.

ठळक मुद्देगडकरींच्या प्रचार सभेत टीका

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पुलवामा हल्ल्यानंतर पंतप्रधानांनी पाकिस्तानात एअर स्ट्राईक करून दहशतवाद्यांचे अड्डे नेस्तनाबूत केले. यात अनेक दहशतवादी मारले गेले. पण विरोधक यातही राजकारण करीत किती दहशतवादी मारले गेले, याचा पुरावा मागत आहेत. या विरोधकांना बॉम्बवर बसवून पाकिस्तानात पाठवायचे होते, तेव्हाच मृतांचा खरा आकडा कळाला असता, अशी टीका उत्तराखंडचे पर्यटन मंत्री सतपाल महाराज यांनी केली.भाजपाचे नागपूर लोकसभेचे उमेदवार नितीन गडकरी यांच्या मिनीमातानगर येथील प्रचार सभेत ते बोलत होते. गडकरी यांच्या प्रचारासाठी पूर्व नागपुरात सोमवारी पारडी बाजार व दर्शन कॉलनीमध्ये सभा घेण्यात आल्या. मिनीमातानगरच्या सभेला आ. कृष्णा खोपडे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश जाधव, स्थायी समिती अध्यक्ष प्रदीप पोहाणे, नगरसेविका चेतना टांक, सरिता कावरे, नगरसेवक बाल्या बोरकर, अनिल गेंडरे आदी उपस्थित होते. यावेळी सतपाल महाराज म्हणाले, गडकरी यांनी देशाचे चित्र बदलले आहे. गावापासून शहराला, शहरापासून राज्याला आणि देशाला रस्त्यांनी, जलमार्गाने जोडले आहे. काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारताचा सर्वांगीण विकास करणारा लोकप्रिय मंत्री म्हणून नितीन गडकरी यांची ख्याती आहे. या लोकनेत्यांची प्रतिष्ठा उंचावण्याची संधी तुम्हाला मिळाली आहे. बायो-फ्युएलवर धावणारी वाहने, इलेक्ट्रॉनिक्स कार, बसेस रस्त्यावरून धावत आहेत. जशी लक्ष्मी कमळावर बसून येते तसा विकासही कमळामुळेच होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील भाजपा सरकारने देशाला स्वाभिमान आणि सुरक्षा प्रदान केली आहे. शेतकरी, शेतमजूर, नोकरदार सर्वांसाठीच मोदी सरकारने अतिशय उपयुक्त योजना राबविल्या. पाकिस्तानला धडा शिकवून भारतीय सैन्याचे मनोबल उंचावले. हा देश जगाच्या पाठीवरील कुठल्याही दहशतवादाला आता घाबरणारा नाही हे सिद्ध केले आहे, असेही त्यांनी सांगितले.एक लाख लोकांना पाच लाखात घर : गडकरीगाव, गरीब, मजूर आणि शेतकरी यांचे कल्याण व्हावे, हेच माझे स्वप्न आहे. शहराच्या आधुनिक विकास होत असताना,झोपडपट्ट्यांमध्ये राहणारे, आर्थिकदृष्ट्या कमकुवत असणाऱ्यांना स्वत:चे हक्काचे घर उपलब्ध करून देण्याचे माझे स्वप्न आहे. आतापर्यंत आम्ही १० हजार लोकांना घरकूल उपलब्ध करून दिले आहे. येणाऱ्या काळात एक लाख लोकांना पाच लाखामध्ये त्यांच्या हक्काचे घरकूल उपलब्ध करून देण्याचा माझा मानस असल्याचे यावेळी नितीन गडकरी म्हणाले. यावेळी त्यांनी आपल्या पाच वर्षात केलेल्या विकास कामांचा आढावा घेतला. पुन्हा संधी मिळाल्यास नागपूर हे जगाच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.कलावंतांना जपणाऱ्या नेत्यामागे राहा : प्रभाकर धाकडेनागपुरात सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत कलावंतांना प्रोत्साहन देण्याची गरज होती, ती नितीन गडकरी यांनी खासदार सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून पूर्ण केली. त्यामुळे कलावंतावर प्रेम करणाऱ्या नेत्याच्या मागे आगामी निवडणुकीत उभे राहण्याची गरज असल्याचे प्रतिपादन सूरमणी प्रभाकर धाकडे यांनी केले. नितीन गडकरी यांच्या समर्थनार्थ जवाहर वसतिगृहात सांस्कृतिक आघाडीतर्फे कलावंतांचा मेळावा घेण्यात आला. यावेळी गडकरी म्हणाले, कलावंतांना आपल्या क्षेत्रात कायम संघर्ष करावा लागतो. ज्येष्ठांना आरोग्याच्या समस्या उद्भवतात त्यावेळी आर्थिक मदतीची गरज असते. आगामी काळात कलावंतांना येणाऱ्या समस्यांविषयी काम करणार असून, त्याचसोबत नव्या पिढीतील कलावंतांना प्रोत्साहित करण्यासाठी प्रयत्न करणार. आजवर डॉ. देशपांडे सभागृह तसेच नवनिर्मित सुरेश भट सभागृह कलावंतांसाठी अतिशय अल्पदरात उपलब्ध करून देण्याचे काम केले. येत्या काळात अंबाझरी येथे ३० आसनक्षमता असलेले ओपन एअर थिएटर साकारण्याचा मानसही यावेळी गडकरी यांनी व्यक्त केला. याप्रसंगी भाजपाचे राजेश बागडी, प्रा. संजय भेंडे, जयप्रकाश गुप्ता, ज्येष्ठ कलावंत शक्ती रतन आदी उपस्थित होते. यावेळी नागपूर विद्यापीठाच्या ललित कला विभागाचे निवृत्त विभागप्रमुख विनोद इंदूरकर यांचा सत्कार करण्यात आला. मेळाव्याचे संचालन मोहम्मद कलीम यांनी केले. आभार आसावरी तिडके यांनी मानले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNitin Gadkariनितीन गडकरी