रस्ते, तलाव दुरुस्तीच्या मुद्यावर विरोधक आक्र मक

By Admin | Updated: January 26, 2015 00:57 IST2015-01-26T00:57:36+5:302015-01-26T00:57:36+5:30

अतिवृष्टी व पुरामुळे दीड वर्षापूर्वी नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, सिंचन क्षमता कमी झालेल्या तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करावा, शिक्षकांचे

Opposition odds on roads, pond correction | रस्ते, तलाव दुरुस्तीच्या मुद्यावर विरोधक आक्र मक

रस्ते, तलाव दुरुस्तीच्या मुद्यावर विरोधक आक्र मक

नागपूर : अतिवृष्टी व पुरामुळे दीड वर्षापूर्वी नादुरुस्त झालेल्या रस्त्यांची दुरुस्ती व्हावी, सिंचन क्षमता कमी झालेल्या तलाव व बंधाऱ्यातील गाळ काढण्यासाठी निधी उपलब्ध करावा, शिक्षकांचे समायोजन व प्राथमिक आरोग्य केंद्रांचे बांधकाम तातडीने व्हावे, यासाठी सदस्यांनी आग्रही भूमिका घेतली आहे. विरोधकांनीही जिल्हा परिषदेची २८ जानेवारीची सभा वादळी ठरण्याचे संकेत दिले आहेत.
रस्ते दुरुस्तीसाठी सरकारकडे १६० कोटींची मागणी केली होती. परंतु जेमतेम ३२ कोटी मिळाले. प्राप्त निधीतून प्रस्तावित कामांचे कार्यादेश अद्याप निघालेले नाही. मार्चपूर्वी कामे पूर्ण न झाल्यास हा निधी अखर्चित राहण्याची शक्यता सदस्यांनी वर्तवली आहे. २०११ च्या जनगणनेचा विचार करता ५६ प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३५५ उपकेंद्रांची गरज आहे. त्यानुसार ७ प्राथमिक आरोग्य केंद्र व ३९ उपकेंद्रांचा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात आला आहे. परंतु हा प्रस्ताव प्रलंबित आहे. पदाधिकारी शासन स्तरावर पाठपुरावा करण्यात कमी पडत असल्याने सदस्यांत नाराजी आहे.
राष्ट्रीय पेयजल योजनांची कामे तातडीने पूर्ण करावी. अशी सदस्यांची मागणी आहे. जिल्ह्यातील अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न अद्याप सुटलेला नाही.
खासगी संस्थाचालक अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेण्यास नकार देत आहे. इंदिरा आवास योजनेचे दिलेले उद्दिष्ट पूर्ण करण्यात जिल्हा ग्रामीण यंत्रणेला अपयश आले आहे. आदी मुद्यावर सत्तापक्षासोबतच विरोधी सदस्य आक्रमक भूमिका घेणार आहेत.
विरोधक जाब विचारणार
मागणीनुसार शासनाकडून उपलब्ध निधीतून बांधकाम विभागाने प्रस्तावित कामांचे अद्याप कार्यादेश दिलेले नाही. मार्चपूर्वी हा निधी खर्च होण्याची शक्यता नाही. त्यामुळे निधी अखर्चित राहण्याची शक्यता विरोधीपक्षनेते मनोहर कुंभारे यांनी व्यक्त केली. पाणीटंचाई , राष्ट्रीय पेयजल योजनांची कामे रखडलेली कामे शिक्षकांच्या समायोजनाचा प्रश्न अशा मुद्यावरुन अधिकारी व पदाधिकाऱ्यांना सभेत जाब विचारणार असल्याचे त्यांनी सांगितले.(प्रतिनिधी)
नवीन कामे नाहीत
मागील वर्षात जी कामे हाती घेतली होती. तीच सुरू आहेत. त्यात नवीन कामांची भर पडलेली नाही. कापूस व सोयाबीनला भाव नाही. घरकु लांची कामे थंड बस्त्यात असून पशुसंवर्धन विभागातही सावळागोंधळ सुरू आहे.संकटग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्यात सरकार अपयशी ठरले आहे. सत्ताधारी बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप माजी उपाध्यक्ष चंद्रशेखर चिखले यांनी केला आहे.

Web Title: Opposition odds on roads, pond correction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.