शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : नाद करायचा नाय! अभिषेक-गिलची विक्रमी भागीदारी; पाकसमोर पुन्हा टीम इंडियाची 'दादागिरी'
2
IND vs PAK : ... अन् अभिषेक शर्मा पाकिस्तानी गोलंदाजाला भिडला! पंचांनी सोडवलं भांडण (VIDEO)
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
5
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
6
'पॅलेस्टाईनला मान्यता देऊन दहशतवादासाठी भेट दिलीत'; ब्रिटनच्या निर्णयावर भडकले नेतन्याहू
7
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
8
टोळीयुद्धाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांची मोठी कारवाई; एका दिवसात ४३ गुंडांना पाठवले तुरुंगात
9
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
10
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
11
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
12
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
13
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
14
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
15
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
16
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
17
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
18
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
19
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
20
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?

विरोधकांनी किमान समान कार्यक्रम ठरवावा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2018 00:47 IST

सर्व विरोधी पक्ष भाजपा विरोधात एकत्र आले तर चित्र बदलू शकते हे पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे. राज्यात बसपासह प्रकाश आंबेडकर यांची भारिप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस यासह समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा सकारात्मक विचार आम्ही आधीच मांडला आहे. याला सहकारी पक्षांकडून प्रतिसाद आला तर पुढे जाता येईल. आता सर्व विरोधी पक्षांची एकत्र बसण्याची प्रक्रिया सुरु व्हावी. त्यासाठी एक किमान समान कार्यक्रम ठरवावा, असे मत व्यक्त करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.

ठळक मुद्देअशोक चव्हाण : विरोधकांची एकत्र बसण्याची प्रक्रिया सुरू व्हावी

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : सर्व विरोधी पक्ष भाजपा विरोधात एकत्र आले तर चित्र बदलू शकते हे पोटनिवडणुकीच्या निकालाने दाखवून दिले आहे. राज्यात बसपासह प्रकाश आंबेडकर यांची भारिप, शेकाप, राष्ट्रवादी काँग्रेस यासह समविचारी पक्षांना सोबत घेण्याचा सकारात्मक विचार आम्ही आधीच मांडला आहे. याला सहकारी पक्षांकडून प्रतिसाद आला तर पुढे जाता येईल. आता सर्व विरोधी पक्षांची एकत्र बसण्याची प्रक्रिया सुरु व्हावी. त्यासाठी एक किमान समान कार्यक्रम ठरवावा, असे मत व्यक्त करीत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी पुन्हा एकदा विरोधकांना एकत्र येण्याचे आवाहन केले.अ.भा काँग्रेस समितीचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी नागभीड तालुक्यातील नांदेड या गावी जाऊन धानाच्या एचएमटी वाणाचे संशोधक दादाजी खोब्रागडे यांना श्रद्धांजली अर्पण करून त्यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्यासोबत प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण होते. नागपुरात परतल्यावर चव्हाण पत्रकारांशी बोलताना म्हणाले, विरोधकांच्या मत विभाजनाचा भाजपाला थेट फायदा होतो. पालघरच्या निवडणुकीत तसेच झाले. भाजपाला फक्त ३० टक्के मते मिळाली. उर्वरित ७० टक्के मते विरोधी पक्षाला मिळाली. येथे विरोधक एकत्र आले असते तर पालघरचेही चित्र वेगळे असते. भाजपा विरोधी लढा उभारण्याची काँग्रेसची इच्छा आहे. तसे पाऊलही पुढे टाकले आहे. आता इतरांनी त्याला प्रतिसाद देण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.भाजपा चार वर्षे सत्तेत मग्न राहिली. त्यामुळे त्यांचा जनतेशी संपर्कच तुटला. त्यामुळेच आता त्यांनी समर्थनासाठी संपर्क अभियान सुरू केले आहे. भाजपा नेते सेलिब्रेटींना भेटत आहेत तर आमचे नेते राहुल गांधी हे सामान्य माणसाला, दादाजी खोब्रागडे यांच्यासारख्या संशोधकाच्या कुटुंबाला भेट देत आहेत. आमच्यासाठी सामान्य माणूस हाच सेलिब्रेटी आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौरा प्रदेश काँग्रेसतर्फे राज्यातील बहुतांश जिल्ह्यात शिबिरे घेण्यात आली आहेत. पक्षाचे संघटनात्मक काम जोरात सुरू आहे. पावसाळ्याचे दिवस संपले की सप्टेंबरपासून महाराष्ट्र दौरा सुरू केला जाईल व भाजपा विरोधात आवाज बुलंद केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.लोकसभेत यश मिळणार गेल्यावेळी आघाडी सरकार विरोधात वातावरण तयार झाले होते. त्यात मोदींच्या भपकेबाज भाषणांची भर पडली. जनता खोट्या आमिषाला बळी पडली. आता जनता जागी झाली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीचे चित्र एकदम बदललेले दिसेल, असा दावा त्यांनी केला.मतपत्रिकेने निवडणुका घ्या ईव्हीएमच्या वापरावर सुरुवातीपासून शंका घेतली जात आहे. व्हीव्हीपॅट लावल्यानंतरही संभ्रम कायम आहे. उन्हामुळे ईव्हीएम बंद पडल्याचे कारण देण्यात आले. २०१४ ची लोकसभा निवडणूक उन्हाळ्यातच झाली होती. तेव्हा मशीन बंद पडल्या नाहीत. काँग्रेसने ईव्हीएम विरोधात ठराव घेतला आहे. शरद पवारांसह इतर पक्षांनीही जाहीर विरोध दर्शविला आहे. मशीनमुळे निर्माण झालेला संभ्रम दूर करून पारदर्शकता आणण्यासाठी मतपत्रिकेने निवडणुका घ्याव्या, अशी मागणी चव्हाण यांनी केली.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाणcongressकाँग्रेस