शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
RSS स्वयंसेवक ते BJP प्रदेशाध्यक्ष; ‘अशी’ आहे रवींद्र चव्हाण यांची राजकीय कारकीर्द
3
“शक्तिपीठ रद्द करण्याची सरकारला सुबुद्धी मिळो, पांडुरंगाला साकडे घालणार”: राजू शेट्टी
4
पत्नी म्हणाली 'रात्रीच्या वेळी तरी मोबाईल बाजूला ठेवा'; पतीला आला राग! पुढे त्याने जे केलं, ते ऐकून होईल संताप 
5
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
6
बुमराह भाई इज डेफिनेटली....! गिलनं हिंट दिली की, इंग्लंडला 'गुमराह' करण्याचा डाव खेळलाय?
7
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
8
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
9
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
10
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
11
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
12
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
13
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
14
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
15
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
16
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
17
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
18
Shefali Jariwala : "हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
19
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
20
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...

‘ऑपरेशन सिंदूर’चे संघाकडून स्वागत, सैन्याने देशाचा अभिमान वाढविला

By योगेश पांडे | Updated: May 9, 2025 15:34 IST

नागरिकांना आवाहन : सैन्याला सहकार्य करावे, राष्ट्रीय एकता कायम राखावी

योगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : भारतीय सैन्याने पाकिस्तानविरोधात राबविलेल्या ‘ऑपरेशन सिंदूर’चेराष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून स्वागत करण्यात आले आहे. या कारवाईमुळे पहलगाम येथील हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबियांसह देशाला न्याय मिळाला आहे. तसेच या ‘ऑपरेशन’मुळे देशाचा स्वाभिमान व मनोबल वाढले आहे या शब्दांत सरसंघचालक डॉ.मोहन भागवत व सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांनी भावना व्यक्त केली आहे.

पाक पुरस्कृत दहशतवाद्यांवर आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्या यंत्रणेवर निर्णायक कारवाई केल्याबद्दल आम्ही केंद्र सरकारच्या नेतृत्वाचे आणि आमच्या सशस्त्र दलांचे अभिनंदन करतो. हिंदू पर्यटकांच्या क्रूर हत्याकांडात पीडित कुटुंबांना आणि संपूर्ण देशाला न्याय देण्यासाठी केलेल्या या कारवाईमुळे संपूर्ण देशाचा स्वाभिमान आणि मनोबल वाढले आहे. देशाच्या सुरक्षेसाठी पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांवर, त्यांच्या पायाभूत सुविधांवर आणि समर्थन यंत्रणेवर लष्करी कारवाई करणे आवश्यक आणि अपरिहार्य आहे यावर आम्ही पूर्णपणे सहमत आहोत. राष्ट्रीय संकटाच्या या काळात, संपूर्ण देश सरकार आणि सशस्त्र दलांच्या पाठीशी भावनेने आणि कृतीने उभा आहे. भारताच्या सीमेवरील धार्मिक स्थळांवर आणि नागरी वस्तीवर पाकिस्तानी सैन्याने केलेल्या हल्ल्यांचा आम्ही निषेध करतो आणि या क्रूर, अमानवी हल्ल्यांमध्ये बळी पडलेल्यांच्या कुटुंबियांना मनापासून संवेदना व्यक्त करतो, असे सरसंघचालक व सरकार्यवाह यांनी प्रतिपादन केले.

सामाजिक सौहार्द बिघडविण्याचे प्रयत्नया आव्हानात्मक काळात नागरिकांनी सरकार आणि प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पूर्णपणे पालन केले पाहिजे. तसेच नागरी कर्तव्य पार पाडताना सर्वांनी सावध राहिले पाहिजे. देशविरोधी तत्वांकडून सामाजिक एकता आणि सौहार्द बिघडवण्याचे प्रयत्न होऊ शकतात. मात्र कुठलेही राष्ट्रविरोधी षड्यंत्र यशस्वी होऊ देऊ नये. नागरिकांनी आवश्यकतेनुसार सैन्य आणि नागरी प्रशासनाला सहकार्य करण्यास तयार राहावे. तसेच राष्ट्रीय एकता आणि सुरक्षा राखण्यासाठी सर्व प्रयत्नांना बळकटी द्यावी, असे आवाहन सरसंघचालक व सरकार्यवाहांनी केले आहे.

टॅग्स :Operation Sindoorऑपरेशन सिंदूरRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघnagpurनागपूर