शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

नागपूर मनपातही ‘ऑपरेशन कमळ’; काँग्रेसचे ११ नगरसेवक भाजपच्या संपर्कात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2022 07:30 IST

Nagpur News संघ मुख्यालय असलेल्या नागपुरातील भाजपचा बालेकिल्ला आणखी भक्कम करण्यासाठी महापालिकेतही ‘ऑपरेशन कमळ’ करण्याचे प्लॅनिंग भाजपने आखले आहे.

ठळक मुद्देभाजप नेत्यांशी प्राथमिक चर्चा आटोपलीनिवडणूक लागताच हेराफेरी

कमलेश वानखेडे

नागपूर : ऑपरेशन कमळ घडवून आणत राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार उलथून फेकण्यात भाजपला यश आले. आता संघ मुख्यालय असलेल्या नागपुरातील भाजपचा बालेकिल्ला आणखी भक्कम करण्यासाठी महापालिकेतही ‘ऑपरेशन कमळ’ करण्याचे प्लॅनिंग भाजपने आखले आहे. संपलेल्या टर्ममधील काँग्रेसच्या तब्बल ११ नगरसेवकांना भाजपकडे खेचून उमेदवारी देण्याची तयारी सुरू आहे. प्राप्त माहितीनुसार या नगरसेवकांशी प्राथमिक चर्चाही आटोपली आहे.

गेल्या निवडणुकीत भाजपचे १०८ तर काँग्रेसचे २९ नगरसेवक निवडून आले होते. यापैकी काँग्रेसच्या नगरसेविका गार्गी चोपडा यांनी निवडणुकीनंतर काही दिवसातच फारकत घेतली. महिनाभरापूर्वी भाजपने पश्चिम नागपुरातील काँग्रेसचे नगसेवक नितीश ग्वालबंसी यांनी आपल्या तंबूत खेचले होते. त्याचवेळी पश्चिम नागपुरातील आणखी दोन नगरसेवक भाजपवासी होत असल्याची चर्चा रंगली होती. त्याच काळात काँग्रेसमधील सुमारे ११ नगरसेवक भाजपच्या संपर्कात आले. भाजपच्या शहरातील महत्त्वाच्या नेत्यांशी त्यांची प्राथमिक चर्चाही झाली. याशिवाय काँग्रेसच्या तिकिटावर लढलेले; पण दुसऱ्या क्रमांकावर राहिलेल्या सुमारे आठ ते दहा जणांनीही भाजप नेत्यांशी संपर्क साधत तिकीट मिळण्याची हमी मिळत असेल तर प्रवेश घेण्याची तयारी दर्शविली. मात्र, ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावर महापालिकेची निवडणूक लांबत गेली. त्यामुळे भाजपनेही ‘ऑपरेशन कमळ’साठी घाई न करण्याचा निर्णय घेतला. आता राज्यातील सत्ता बदलानंतर मात्र नागपुरातही सूत्रे गतीने हलविण्याची तयारी सुरू झाली आहे.

काँग्रेस नगरसेवकांना धास्ती

- नागपुरात नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस या भाजप नेत्यांचे प्रस्थ आहे. त्यामुळे ते महापालिका राखण्यासाठी शक्ती पणाला लावतील. भाजपमध्ये अर्धी निवडणूक पक्षच लढतो. उमेदवाराला ५० टक्केच परिश्रम घ्यावे लागतात.

- भाजपप्रणीत शिंदे सरकार आल्यामुळे नागपुरात भाजपचा जोर आणखी वाढेल. भाजपच्या वाट्याला मंत्रिपदे येतील. यामुळे भाजप उमेदवारांना आर्थिक पाठबळही भेटेल. त्यामुळे त्यांच्या समोर आपला किती टिकाव लागेल, याची धास्ती काँग्रेस उमेदवारांनी घेतली आहे.

-सरकार कोसळल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांचे मनोबल खचले आहे. त्यामुळे प्रचारात कार्यकर्त्यांमध्ये किती जोश राहील, याबाबत इच्छुक उमेदवारांना शंका आहे.

मंत्र्यांचा आधार गेला

- नागपूरच्या वाट्याला नितीन राऊत व सुनील केदार यांच्या रूपात दोन मंत्रिपदे मिळाली होती. मात्र, राज्यातील सत्ता गेल्यामुळे निवडणुकीच्या काळात हवे तसे आर्थिक पाठबळ काँग्रेस पक्ष व नेत्यांकडून मिळेल की नाही, याबाबत इच्छुक उमेदवारांना शंका आहे.

- निवडणूक काळात प्रशासनाची भूमिकाही महत्त्वाची असते. सत्ता गेल्यामुळे प्रशासन काँग्रेस नेत्यांच्या म्हणण्याला किती महत्त्व देईल, त्यांच्या सूचनांचे किती पालन करेल, हादेखील प्रश्न आहे.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका