शहरं
Join us  
Trending Stories
1
एका चुकीने होत्याचं नव्हतं झालं! शॅम्पेनची ती पेटती बाटली छताला लागली अन्... प्रत्यक्षदर्शीने सांगितला तो थरार!
2
ज्याची भीती होती ती खरी ठरली, इंदूरमधील मृत्यूचे कारण आले समोर
3
विशेष लेखः भाजप - यश कळसाला, शिस्त तळाला! पक्षाची संस्कृती ढासळली तर...
4
फेब्रुवारीची ही संध्याकाळ आत्ताच बुक करून ठेवा...; आठपैकी सहा ग्रह उघड्या डोळ्यांनी पाहता येणार, सातवी पृथ्वी, ज्यावर तुम्ही असणार...
5
निष्ठेला शिक्षा, सत्तेचा दर्प! इतर पक्षातील इच्छुकांना उमेदवारी द्या, हे कोणत्या सर्वेक्षणातून समोर आले?
6
Numerology: 'या' जन्मतारखांसाठी २०२६ ठरणार 'गोल्डन वर्ष'; पैसा, प्रसिद्धी आणि लक्झरीने भरणार झोळी
7
“मराठी महापौरच हवा असेल तर भाजपा शिवाय पर्याय नाही, ममदानी मुंबईत...”; कुणी केला दावा?
8
ट्रम्प यांचे हात निळे का पडले? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या प्रकृतीचं गूढ वाढलं; खुद्द ट्रम्प यांनीच सांगितलं कारण!
9
ऑनलाईन खरेदी महागात पडली! शूज ऑर्डर केला, होल्डवर पडल्याचा फोन आला अन् ५५ हजार रुपये झटक्यात उडाले
10
तुमची पत्नी गृहिणी आहे आणि SIP चालवतेय, मग टॅक्स नक्की कोण भरणार? जाणून घ्या इन्कम टॅक्सचा महत्त्वाचा नियम
11
Stock Market Today: कमकुवत सुरुवातीनंतर शेअर बाजारात वाढ, निफ्टीत ३० अंकांची तेजी; FMCG इंडेक्स आजही घसरला
12
पहिल्यांदाच जगासमोर आली किम जोंग उन यांची मुलगी; किम जु आए उत्तर कोरियाची पुढची हुकूमशहा बनणार?
13
Astro Tips: २०२६ मध्ये प्रगतीचे शिखर गाठायचे आहे? शेंदरी हनुमानाची 'ही' उपासना सुरु करा!
14
निसर्गाचा कोप! अफगाणिस्तानात ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार; १७ जणांचा मृत्यू, एकाच कुटुंबातील ५ जण गाडले गेले
15
२०२६चा पहिला गजकेसरी राजयोग: ८ राशींना सुबत्ता, पद-पैसा वाढ; लक्षणीय यश, ३ दिवस वरदान काळ!
16
१ फेब्रुवारीपासून सिगारेट महागणार; ब्रँड अन् लांबीवरून ठरणार किंमत
17
कर्नाटकात बॅनर वादातून रक्तरंजित खेळ! दोन आमदारांच्या समर्थकांमध्ये हाणामारी; गोळीबारात एकाचा मृत्यू
18
अखेरच्या क्षणी महिंद्राची टाटाला ओव्हरटेक! तिसऱ्या नंबरवर फेकली गेली; किया, एमजीची चांगली कामगिरी...
19
माओवादी कमांडर बारसे देवा पोलिसांना शरण! ‎​हिडमाच्या खात्म्यानंतर नक्षली बॅकफूटवर: तेलंगणात केले आत्मसमर्पण
20
२०२६ची पहिली अंगारक संकष्ट चतुर्थी: ३ गोष्टी करा, बाप्पा संकट दूर करेल; सगळे मनासारखे होईल!
Daily Top 2Weekly Top 5

कळमना बाजारात फक्त घाऊक विक्री

By admin | Updated: August 7, 2015 02:53 IST

कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (एपीएमसी) कायद्यानुसार चिल्लर (रिटेल) विक्री करता येणार नाही, असा उच्च न्यायालयाने दिलेला आदेश संपूर्ण राज्यासाठी लागू आहे.

चिल्लर विक्रीवर प्रतिबंध : बाजार समिती व चिल्लर विक्रेत्यांमध्ये घमासाननागपूर : कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये (एपीएमसी) कायद्यानुसार चिल्लर (रिटेल) विक्री करता येणार नाही, असा उच्च न्यायालयाने दिलेला आदेश संपूर्ण राज्यासाठी लागू आहे. या आदेशानुसार कळमना बाजारात व्यापार करणाऱ्या चिल्लर व्यापाऱ्यांना हुसकावून लावण्यात येत आहे. या कारणावरून कळमना बाजार समितीचे पदाधिकारी आणि किरकोळ विक्रेत्यांमध्ये घमासान सुरू आहे. कळमना बाजारात चिल्लर व्यवसाय करण्याच्या मागणीसाठी १५ दिवसांपासून भाजीपाला चिल्लर विक्रेता असोसिएशनचे आंदोलन सुरू आहे. चिल्लर व्यापाऱ्यांचे आंदोलन अवैध असल्याची माहिती बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांनी लोकमतशी बोलताना दिली. व्यवसाय करू देण्याची मागणीहायकोर्टाच्या आदेशाचा हवाला देत बाजार समिती प्रशासनाने कारवाई करून चिल्लर व्यवसाय करणाऱ्यांना बाजाराबाहेर हुसकावून लावल्यानंतरही व्यवसाय करू देण्याची त्यांची आग्रही मागणी आहे. हे चिल्लर व्यापारी दोन वर्षांपूर्वी कॉटन मार्केट येथून कळमन्यात आले आहे. दोन वर्षांनंतर बाजार समिती कारवाई का करीत आहे, असा त्यांचा सवाल आहे. या बाजाराची सुरक्षा बाजार समिती आणि सुरक्षा मंडळाचे सुरक्षा गार्ड करीत आहेत. हे गार्ड समितीच्या आदेशानुसार चिल्लर व्यापाऱ्यांना व्यवसाय करू देण्यास प्रतिबंध करीत असल्याचा आरोप चिल्लर विक्रेता असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी केला. (प्रतिनिधी)कळमना बाजार घाऊक विक्रीसाठीन्यायालयाच्या आदेशानुसार कारवाई करण्यात येत असल्याची माहिती कळमना बाजार समितीचे सभापती शेख यांनी लोकमतला दिली. कायद्यानुसार बाजार समित्या केवळ शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्यासाठी, तसेच त्या मालाची घाऊक (होलसेल) विक्री करण्यासाठीच आहेत. त्या मालाची किरकोळ विक्री करता येणार नाही, असे न्यायालयाने म्हटले आहे. त्यामुळे आता एपीएमसीमधील व्यापाऱ्यांना शेतकऱ्यांचा माल खरेदी करण्याबरोबर केवळ घाऊक विक्री करता येईल. उपविधीतील तरतूद चुकीचीबाजार समितीमध्ये व्यापाऱ्यांना दिलेले गाळे केवळ घाऊक व्यवहारांसाठी आहेत, असे सरकारचे म्हणणे होते. परंतु बाजार समितीच्या उपविधीमध्ये (बाय लॉ) किरकोळ विक्री करण्यास परवानगी असल्याचे अर्जदारांनी हायकोर्टात सांगितले होते. मात्र कृषी उत्पन्न बाजार समिती कायद्यातच किरकोळ विक्रीला संमती नाही. त्यामुळे कायद्याविरुद्ध असलेली उपविधीमधील तरतूद चुकीची असल्याचा सरकारचा दावा खंडपीठाने वैध ठरविला होता.