शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रचार समितीचा राजीनामा मागे घेतोय; काँग्रेस नेते नसीम खान यांची मोठी घोषणा
2
मोठी दुर्घटना! बॉल समजून बॉम्ब उचलला, ब्लास्टमध्ये लहान मुलाचा मृत्यू, 3 जखमी
3
Narendra Modi : "भाजपा जे बोलते, ते करून दाखवते"; ओडिशामध्ये पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
4
मराठी उमेदवाराचा प्रचार करण्यास गुजराती सोसायटीत विरोध; ठाकरे गटाचा दावा, काय घडलं?
5
उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी कन्हैया कुमारांनी केले हवन, सर्व धर्माच्या गुरूंचे घेतले आशीर्वाद! 
6
T20 World Cup वर दहशतवादी हल्ल्याचे सावट; उत्तर पाकिस्तानमधून आली धमकी
7
रथावर स्वार मुख्यमंत्र्यांनी गदा उंचावली, काँग्रेसमधून भाजपात आलेल्या आमदाराच्या डोक्याला लागली, मग...  
8
संत मंडळींमध्ये ‘वडील’, उत्तर भारतात मोठी ख्याती; ‘अशी’ आहे संत गोरोबा काकांची महती
9
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
10
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
11
Nexon EV Review: टाटा नेक्सॉन ईव्हीच्या रेंजने चकीत केले...; दररोजचे गाव ते पुण्यातील ऑफिसचे अंतर, कशी वाटली...
12
Adani Group Stocks SEBI: अदानी समूहाचे शेअर्स आपटले, SEBI च्या नोटिसनंतर स्टॉक्समध्ये घसरण कायम
13
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
14
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
15
Video: कुटुंबासह अयोध्येत पोहोचला प्रसाद ओक; रामलला चरणी झाला नतमस्तक
16
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
17
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
18
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
19
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
20
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा

संसदेत तेव्हाच आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकायला हवी होती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2021 8:04 PM

Nagpur News जेव्हा आरक्षणाचा विषय संसदेत आला तेव्हाच ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकली असती तर हा विषय सोपा झाला असता, असे सांगत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारकडे बोट दाखविले.

ठळक मुद्देअशोक चव्हाण यांनी केंद्राकडे दाखविले बोट

लोकमत न्यूज नेटवर्क  

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर ओबीसी आरक्षणाविना जिल्हा परिषदेच्या निवडणुका होत आहेत. हा विषय फक्त महाराष्ट्र किंवा मराठा, ओबीसी समाजापुरता मर्यादित नाही तर संपूर्ण देशात हा विषय अडचणींचा बनला आहे. जेव्हा आरक्षणाचा विषय संसदेत आला तेव्हाच ५० टक्क्यांची मर्यादा काढून टाकली असती तर हा विषय सोपा झाला असता, असे सांगत सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी अप्रत्यक्षपणे केंद्र सरकारकडे बोट दाखविले. (Only then in Parliament should the 50 per cent reservation limit have been removed, Ashok Chavan)

यवतमाळ व चंद्रपूर येथील पक्षाच्या कार्यक्रमांना हजेरी लावण्यासाठी चव्हाण यांचे गुरुवारी नागपुरात आगमन झाले. यावेळी ते म्हणाले, ओबीसी आरक्षणाशिवाय राज्यात निवडणुका घेणे योग्य होणार नाही. ओबीसी आरक्षण अध्यादेशाचा विरोध कुणाला आहे, हे काही कळायला मार्ग नाही. जालन्यातील मराठा तरुणाची आत्महत्या ही दुर्दैवी घटना आहे. आपल्याला संयमाने घ्यावे लाोल. सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर आपल्याकडे मर्यादित पर्याय आहे. मराठा आरक्षण मिळावे ही शासनाची प्रामाणिक भूमिका होती. आपले रिव्ह्यू पिटिशन प्रलंबित आहे. तो पर्याय असताना परत मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्याची वेळ नव्याने आली आहे. याला किती कालावधी लागेल हे मी सांगू शकत नाही. मात्र सारथीच्या माध्यमातून समाजाला मदत केली जात आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले. ऊर्जा विभागाच्या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीत मंत्र्यांमध्ये कुठलेही वाद झाले नाहीत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले.

सोमय्यांना भाजपने खुले सोडले

भाजपने किरीट सोमय्या यांना बेछूट आरोप करण्यासाठी खुले सोडले आहे. ऊठसूट आरोप करून केंद्रीय तपास यंत्रणांचा गैरवापर केला जात आहे. राजकीय सूडबुद्धीने होत असलेले काम लोकशाहीसाठी मारक आहे. भाजपने सोमय्या यांना आवरावे, अन्यथा त्याचे परिणाम त्यांना भविष्यात भोगावे लागतील, असा इशाराही चव्हाण यांनी दिला.

टॅग्स :Ashok Chavanअशोक चव्हाण