शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
2
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
3
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
4
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
5
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
6
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
7
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
8
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
9
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!
10
निवडणुका जवळ आल्यावर आमच्यावर आरोप होतात; आता आमची बदनामी झाली, अजित पवारांची खंत
11
Digital Gold SEBI: डिजिटल गोल्ड खरेदी असाल, तर थांबा! ऑनलाईन सोने खरेदी करणाऱ्यांना सेबीचा सावधगिरीचा इशारा
12
शशी थरूर यांनी अडवाणींचे कौतुक केले, नेहरू आणि इंदिरा गांधींबद्दल धक्कादायक विधान केले
13
FD सुरक्षित, पण श्रीमंत होण्यासाठी पुरेश नाही! जास्त परतावा हवा असल्यास 'हे' ५ पर्याय बेस्ट
14
...अन् ड्रग माफियाच्या घरात पैसे मोजायला बसले पोलिसवाले; सगळ्या १०, २०, ५० च्याच नोटा, २२ तास लागले
15
Video: 6,6,6,6,6,6,6...भारतीय क्रिकेटरनं रचला नवा इतिहास; अवघ्या ११ चेंडूत सर्वात जलद अर्धशतक
16
चीनमधून MBBS अन् तयार केले खतरनाक विष; गुजरातमध्ये पकडलेल्या ३ दहशतवाद्यांचा प्लॅन काय होता?
17
सामान्यांसाठी मोठा दिलासा! ऑक्टोबरमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी थाळी स्वस्त; क्रिसीलचा अहवाल आला...
18
मुलीच्या जन्मापासून ते १० वीपर्यंत सरकार देतं आर्थिक मदत! 'या' वर्गातील कुटुंबांसाठी चालवली जाते योजना
19
गेल्या २४ तासांत जपानमध्ये भूकंपाचे धक्के, सर्वात मोठा भूकंप ६.८ रिश्टर स्केलचा; त्सुनामीचा इशारा जारी
20
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?

'केवळ घोषणांचा पाऊस, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांच्या तोंडाला पुसली पाने'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2022 21:19 IST

Nagpur News शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा सणसणीत आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी केला.

ठळक मुद्देअधिवेशनाच्या कामकाजावर विरोधक असमाधानी

 

नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा सणसणीत आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते नाना पटोले, सुनील केदार, उद्धव सेनेचे सुनील प्रभू यांनी पत्रकार परिषदेतून केला.

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरून आपले टीकेचे बाण रोखले. हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, विदर्भाच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली. आम्ही सभागृहात मंत्र्यांच्या विरोधात घाेटाळ्यांचे पुरावे दिले. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सभागृहात आणि बाहेरही संघर्ष केला; पण निर्लज्ज सरकारने याची साधी दखलही घेतली नाही. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी अंतिम आठवडा प्रस्तावातून सरकारचे लक्ष वेधले; परंतु सरकारने चकार शब्दही काढले नाही. सीमावादावर सत्ताधाऱ्यांकडून कडक संदेश देणारा प्रस्ताव आला नाही. पावसाळी व हिवाळी अधिवेशनात ७८ हजार कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या मंजूर केल्या. हा प्रकार म्हणजे सरकारची आर्थिक शिस्त बिघडविण्याचा प्रकार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

- विरोधकांनी या मुद्यांवर घेतला आक्षेप

१) अंतिम आठवडा प्रस्ताव हा राज्यातील जनतेसाठी महत्त्वाचा असतो; परंतु मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर देताना पावसाळी अधिवेशनाचेच भाषण हिवाळी अधिवेशनात रिपीट केले.

२) या सरकारकडून आमदार आणि पक्ष बघून सुरक्षा दिली जात असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला २ कोटी ४० लाखांचा खर्च होतो. हा खर्च कशासाठी, गरज असेल त्याला सुरक्षा पुरवायला हवी.

३) मुंबई- गोवा महामार्ग हा कोकणाच्या प्रगतीसाठी मार्ग होता. तो ११ वर्षापासून रखडलेला आहे. त्यावर मुख्यमंत्री साधे बोललेही नाहीत.

४) भाजपचे नेते लोकप्रतिनिधी खोक्याने विकत घेण्याची भाषा बोलतात. ही महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारी बाब आहे.

५) विधानसभा अध्यक्षांचे कामकाज हे भाजपचे कार्यालय चालविल्यासारखे होते. विरोधकांची त्यांनी मुस्कटदाबी केली होती.

६) सरकारचा पायगुण अतिशय वाईट आहे. सत्तेवर आल्यापासून राज्यात अतिवृष्टी, पूरपरिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. पीक विम्याचा ५ व १० रुपयांचा धनादेश शेतकऱ्यांना दिला गेला. सरकार शेतकऱ्यांच्या मदतीच्या नावावर केवळ आकड्यांची फेकाफेक करते. अंतिम आठवडा प्रस्तावात शेतकऱ्यांच्या मदतीचे एक वाक्यदेखील मुख्यमंत्री बोलले नाहीत.

७) सूरजागड प्रकल्प हा भिलाई स्टील प्लांटपेक्षा मोठा होऊ शकतो. येथे सरकारने दिल्लीच्या आशीर्वादावर येथे उद्योगपती आणला आहे. तो गडचिरोलीची वनसंपदा लुटून घेऊन चाललाय. त्यावर सरकार चूप आहे.

८) ७५ हजार नोकरी देऊ म्हणाले. पोलिस भरतीची जाहिरात काढली. नंतर स्टे आणला. आता ऑनलाइन अर्ज मागवीत आहेत. या वेळकाढूपणामुळे तरुणांची कोंडी होत आहे. एमपीएससीची परीक्षा जुन्या सिलॅबसने घ्यावी, अशी आमची मागणी होती.

९) सरकार सांगते ४४ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात तर २५ हजार कोटींची विदर्भात आणली; परंतु प्रत्यक्षात जे उद्योग होते ते परराज्यात पाठविले. मिहानमध्ये जागा वाटल्या; पण उद्योग आले नाही. उलट उद्योग परत गेले. त्यावर सरकार बोलत नाही.

१०) मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासंदर्भात काहीच सांगितले नाही.

११) राजकीय द्वेषातून अधिकाऱ्यांचे निलंबन केले.

१२) धर्मा-धर्मात तेढ निर्माण करणारी आंतरधर्मीय समिती रद्द करा, या मागणीवरही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन