शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

'केवळ घोषणांचा पाऊस, शेतकरी, कष्टकरी, बेरोजगारांच्या तोंडाला पुसली पाने'

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2022 21:19 IST

Nagpur News शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा सणसणीत आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह अन्य नेत्यांनी केला.

ठळक मुद्देअधिवेशनाच्या कामकाजावर विरोधक असमाधानी

 

नागपूर : शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनात नुसत्या घोषणांचा पाऊस पाडून महाराष्ट्रातील शेतकरी, कष्टकरी, बेरोजगार यांच्या तोंडाला पाने पुसल्याचा सणसणीत आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेसचे नेते नाना पटोले, सुनील केदार, उद्धव सेनेचे सुनील प्रभू यांनी पत्रकार परिषदेतून केला.

हिवाळी अधिवेशनाचे सूप वाजल्यानंतर पत्रकारांशी बोलताना विरोधी पक्षांनी सत्ताधाऱ्यांना घेरून आपले टीकेचे बाण रोखले. हे सरकार सर्वच आघाड्यांवर अपयशी ठरले असून, विदर्भाच्या तोंडाला अक्षरशः पाने पुसली. आम्ही सभागृहात मंत्र्यांच्या विरोधात घाेटाळ्यांचे पुरावे दिले. त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सभागृहात आणि बाहेरही संघर्ष केला; पण निर्लज्ज सरकारने याची साधी दखलही घेतली नाही. महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांवर कारवाई व्हावी, यासाठी अंतिम आठवडा प्रस्तावातून सरकारचे लक्ष वेधले; परंतु सरकारने चकार शब्दही काढले नाही. सीमावादावर सत्ताधाऱ्यांकडून कडक संदेश देणारा प्रस्ताव आला नाही. पावसाळी व हिवाळी अधिवेशनात ७८ हजार कोटींच्या विक्रमी पुरवणी मागण्या मंजूर केल्या. हा प्रकार म्हणजे सरकारची आर्थिक शिस्त बिघडविण्याचा प्रकार असल्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले.

- विरोधकांनी या मुद्यांवर घेतला आक्षेप

१) अंतिम आठवडा प्रस्ताव हा राज्यातील जनतेसाठी महत्त्वाचा असतो; परंतु मुख्यमंत्र्यांनी त्याला उत्तर देताना पावसाळी अधिवेशनाचेच भाषण हिवाळी अधिवेशनात रिपीट केले.

२) या सरकारकडून आमदार आणि पक्ष बघून सुरक्षा दिली जात असल्याचा आक्षेप विरोधकांनी घेतला. आमदारांच्या सुरक्षेवर वर्षाला २ कोटी ४० लाखांचा खर्च होतो. हा खर्च कशासाठी, गरज असेल त्याला सुरक्षा पुरवायला हवी.

३) मुंबई- गोवा महामार्ग हा कोकणाच्या प्रगतीसाठी मार्ग होता. तो ११ वर्षापासून रखडलेला आहे. त्यावर मुख्यमंत्री साधे बोललेही नाहीत.

४) भाजपचे नेते लोकप्रतिनिधी खोक्याने विकत घेण्याची भाषा बोलतात. ही महाराष्ट्राच्या प्रतिमेला कलंकित करणारी बाब आहे.

५) विधानसभा अध्यक्षांचे कामकाज हे भाजपचे कार्यालय चालविल्यासारखे होते. विरोधकांची त्यांनी मुस्कटदाबी केली होती.

६) सरकारचा पायगुण अतिशय वाईट आहे. सत्तेवर आल्यापासून राज्यात अतिवृष्टी, पूरपरिस्थिती निर्माण झाली. शेतकऱ्यांच्या हाती काही लागले नाही. पीक विम्याचा ५ व १० रुपयांचा धनादेश शेतकऱ्यांना दिला गेला. सरकार शेतकऱ्यांच्या मदतीच्या नावावर केवळ आकड्यांची फेकाफेक करते. अंतिम आठवडा प्रस्तावात शेतकऱ्यांच्या मदतीचे एक वाक्यदेखील मुख्यमंत्री बोलले नाहीत.

७) सूरजागड प्रकल्प हा भिलाई स्टील प्लांटपेक्षा मोठा होऊ शकतो. येथे सरकारने दिल्लीच्या आशीर्वादावर येथे उद्योगपती आणला आहे. तो गडचिरोलीची वनसंपदा लुटून घेऊन चाललाय. त्यावर सरकार चूप आहे.

८) ७५ हजार नोकरी देऊ म्हणाले. पोलिस भरतीची जाहिरात काढली. नंतर स्टे आणला. आता ऑनलाइन अर्ज मागवीत आहेत. या वेळकाढूपणामुळे तरुणांची कोंडी होत आहे. एमपीएससीची परीक्षा जुन्या सिलॅबसने घ्यावी, अशी आमची मागणी होती.

९) सरकार सांगते ४४ हजार कोटींची गुंतवणूक महाराष्ट्रात तर २५ हजार कोटींची विदर्भात आणली; परंतु प्रत्यक्षात जे उद्योग होते ते परराज्यात पाठविले. मिहानमध्ये जागा वाटल्या; पण उद्योग आले नाही. उलट उद्योग परत गेले. त्यावर सरकार बोलत नाही.

१०) मराठवाडा मुक्तिसंग्रामाचा अमृत महोत्सव साजरा करण्यासंदर्भात काहीच सांगितले नाही.

११) राजकीय द्वेषातून अधिकाऱ्यांचे निलंबन केले.

१२) धर्मा-धर्मात तेढ निर्माण करणारी आंतरधर्मीय समिती रद्द करा, या मागणीवरही समाधानकारक उत्तर देऊ शकले नाही.

टॅग्स :Winter Session Maharashtraविधानसभा हिवाळी अधिवेशन