शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात 'व्होट जिहाद' चालणार की 'राम राज्य'? आपल्याला ठरवायचे आहे"; PM मोदींचा काँग्रेसवर हल्लाबोल
2
"आम्ही गांधींचा भारत स्वीकारला होता, मोदींचा भारत नाही", फारुख अब्दुल्लांचा भाजपावर हल्लाबोल
3
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
4
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
5
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
6
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून
7
मनात धाकधूक की राजकीय खेळी? सुप्रियाताई अचानक अजितदादांच्या घरी का गेल्या?; बारामतीत तर्कवितर्क
8
अरविंद केजरीवाल यांना दुहेरी धक्का; सुप्रीम कोर्टाचा दिलासा नाही, कोठडी २० मेपर्यंत वाढवली
9
उमेदवारी न मिळालेले शिंदें गटातील खासदार राजेंद्र गावित भाजपात, देवेंद्र फडणवीस म्हणाले...
10
किरण सामंत नॉट रिचेबल, ठाकरे गटाने केली पोलीस संरक्षण देण्याची मागणी, उदय सामंतांनी दिलं असं स्पष्टीकरण
11
Closing Bell: सेन्सेक्स-निफ्टी पुन्हा घरसला, ३ दिवसांत गुंतवणूकदारांचे ११ लाख कोटी बुडाले
12
'हीरामंडी'मधील शेखर सुमनसोबतच्या इंटीमेट सीनवर मनीषा कोईरालानं सोडलं मौन, म्हणाली...
13
गुजरातमधील नवसारी मतदारसंघात मराठीचाच 'आवाssज', मताधिक्य पाहून व्हाल अवाक्
14
दृष्टीहीन तरुणीने पंतप्रधानांचा हात पकडला; SPG कमांडो आला तेवढ्यात...पाहा मोदींनी काय केले
15
Baramati Lok Sabha : 'मटण, दारु, मताला हजार रुपये वाटले...' सुनिल शेळकेंचे आमदार रोहित पवारांवर गंभीर आरोप
16
₹१४४ वर आलेला IPO; आता शेअरनं पकडल रॉकेट स्पीड, ४ दिवसांपासून लागतंय अपर सर्किट
17
उत्तर प्रदेशमध्ये इंडिया आघाडीसाठी राहुल गांधींनी घेतला मोठा निर्णय; भाजपाच्या अडचणी वाढणार?
18
MS Dhoni च्या फलंदाजी क्रमावरून टीका करणाऱ्यांनो, जरा कारण जाणून घ्या! औषधं खाऊन खेळतोय तो
19
भाजपात सामील झाल्यानंतर शेखर सुमन म्हणाले, "मी सामान्य माणूस, हिरामंडीचा नवाब नाही..."
20
"मी नाही तर कोण?" अमिताभ बच्चन यांच्याशी तुलना केल्यानंतर ट्रोल झालेली कंगना पुन्हा बरळली

जगावे की मरावे हाच एकच प्रश्न! ()

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2020 4:22 AM

नागपूर : कोरोना संक्रमण आणि टाळेबंदीमुळे, पूर्णत: नाटकांवर उदरनिर्वाह चालविणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंतांमध्ये ‘जगावे की मरावे’ हा प्रश्न होता. ...

नागपूर : कोरोना संक्रमण आणि टाळेबंदीमुळे, पूर्णत: नाटकांवर उदरनिर्वाह चालविणाऱ्या झाडीपट्टी रंगभूमीवरील कलावंतांमध्ये ‘जगावे की मरावे’ हा प्रश्न होता. तो प्रश्न सोडवत राज्य सरकारने दिशानिर्देशांसह नाट्यप्रयोग करण्याची परवानगी दिली खरी. मात्र, ती परवानगी जीवघेणी ठरत आहे. झाडीपट्टी रंगभूमीवर काम करणारे चार कलावंत कोरोना संक्रमित निघाल्याने आयोजकांची व कलावंतांची भंबेरी उडाली आहे.

कोरोना संक्रमणामुळे मरण्याआधी नाट्यप्रयोग झाले नाही तर असेच मरण आहे, असली भावविव्हळ वक्तव्ये नाट्यनिर्माता आणि कलावंतांनी यापूर्वी केली होती. त्यांचे हे वक्तव्य अनेकार्थाने सरकारसाठी आत्मक्लेशाचे ठरणार होते. हे पाप सरकारला नको होते म्हणा वा विविध सांस्कृतिक संघटनांचा हेका म्हणा राज्य सरकारने सांस्कृतिक क्षेत्र तब्बल आठ महिन्यानंतर अनलॉक केले आणि भाऊबीजेपासून झाडीपट्टी रंगभूमीवरील नाट्यप्रयोगांना सुरुवात झाली. एका खुर्चीपासून दुसरी खुर्ची सहा फूट अंतरावर ठेवणे, मास्क आग्रहाने घालणे, व्यक्तिश: अंतर पाळणे, थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझरचा वापर नित्यनेमाने करणे आणि महत्त्वाचे म्हणजे २००च्या वर प्रेक्षक नको, अशा मार्गदर्शिका देण्यात आल्या. मात्र, या मार्गदर्शिकांचे उल्लंघन करणे अगदी पहिल्याच प्रयोगापासून सुरू झाल्याचे दिसून येत आहे. तब्बल दोन-तीन हजार प्रेक्षकांची गर्दी नाट्यप्रयोगाला उसळत असल्याचे दिसून येत आहे. त्यातच झाडीपट्टी रंगभूमीवरील तीन निर्माते आणि एक कलावंत कोरोना संक्रमित निघाल्याने खळबळ उडाली आहे. आता या रंगभूमीवरील नाटकांमध्ये काम करणारे ३० ते ४० टक्के कलावंत शहरातून अर्थात नागपूर, अमरावती, यवतमाळ, अकोला, पुणे, मुंबई येथून असतात. आणि या शहरांमध्ये कोरोना संक्रमणाची दुसरी लाट आदळली आहे. येथून येणारे कलावंत थेट रंगभूमीवर उतरत आहेत आणि इतर कलावंतांमध्ये मिसळत आहेत. त्याचे दुष्परिणाम आगामी काळात दिसण्याची शक्यता वाढली आहे.

-------------

बॉक्स....

आरोग्य केंद्राच्या नोटिशी धडकल्या

नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे बघून आणि गर्दी प्रचंड वाढत असल्याचे बघून संबंधित तालुक्याच्या आरोग्य केंद्रांनी आयोजकांना धडाघड नोटिशी पाठविण्यास सुरुवात केली आहे. त्याचा परिणाम अनेक नाट्यसंघांचे ठरलेले प्रयोग रद्द झाले आहेत. शहरातील कलावंतांमध्ये त्यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

----------

बॉक्स...

कुणीच बोलण्यास तयार नाहीत

एरवी आपली मते रोखठोक मांडणारे कलावंत या प्रकरणावर बोलण्यास टाळाटाळ करत आहेत. नाव न सांगण्याच्या अटीवर काही कलावंत आपले मत व्यक्त करत आहेत. सध्या नाटक नकोच करायला. तसेही नाट्यप्रयोग लागत नाहीत. नाट्यप्रयोग झाले नाही तर जगणे अडचणीचे होईल. मात्र, अशा स्थितीत नाट्यप्रयोग झाले तर मरण निश्चित आहे. विशेष म्हणजे, नाट्यप्रयोगामुळे एकापासून अनेकांना संसर्ग होण्याची भीती कलावंत व्यक्त करत आहेत.

.............