शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
2
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
3
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
4
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
5
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
8
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
9
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
10
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
11
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
12
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
13
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
14
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
15
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
16
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
17
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
18
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
19
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
20
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
Daily Top 2Weekly Top 5

आजपासून ऑनलाईन शाळा, पण पुस्तकाविना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 09:56 IST

Nagpur News सोमवारी २८ जूनपासून शाळा उघडणार असल्या तरी कोरोना संक्रमणामुळे वर्ग ऑनलाईनच भरणार आहेत.

ठळक मुद्देआठ लाखांवर पुस्तकांची बालभारतीकडे मागणीकोरोना लॉकडाऊनमुळे पुरवठा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सोमवारी २८ जूनपासून शाळा उघडणार असल्या तरी कोरोना संक्रमणामुळे वर्ग ऑनलाईनच भरणार आहेत. पुस्तकाशिवाय अभ्यान नाही, हे खरे असले तरी यंदा बालभारतीकडून पुस्तकांचा पुरवठा वेळवर झाला नाही. त्यामुळे महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळा पुस्तकाविनाच भरणार, असे दिसत आहे.

ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या जवळपास १,५३० तर नागपूर शहरात महापालिकेच्या १५६ वर शाळा आहेत. शहर व ग्रामीण भागात इतर अनुदानित एक हजारावर शाळा आहे. येथील सर्व इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या १ लाख ४९ हजारावर विद्यार्थ्यांकरिता जि.प.च्या शिक्षण विभागाकडून जवळपास ८ लाख २ हजाराहून अधिक पुस्तकांची मागणी बालभारतीकडे अनेक दिवसांपूर्वीच केली आहे. दरवर्षी बालभारतीकडून साधारणत: मे महिन्यात पुस्तकांची छपाई होऊन केंद्र शाळांवर पोहोचविली जाते. परंतु सोमवारपासून शहर व ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या शाळा ऑनलाईन सुरु होत असल्या तरी पुस्तके उपलब्ध नाहीत. गतवर्षी कोरोनाचा प्रकोप असतानाही शाळांना दहा दिवसांपूर्वीच पुस्तके उपलब्ध होऊन सत्र सुरु होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हातात पडली होती.

शिक्षकांना दैनंदिन अहवाल सादर करणे अनिवार्य

विद्यार्थ्यांविना उद्या सोमवारपासून यंदाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असून ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार आहे. पहिली ते नववी शिक्षक ५० टक्के उपस्थिती, तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य आहे. शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचे सांगण्यात येते. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविले की ऑफलाईन याचा अहवाल त्यांना दररोज ग्रामीण भागात केंद्र प्रमुखांकडे सादर करावा लागणार आहे.

पाठ्यपुस्तकाच्या पुनर्वापर योजनेला प्रतिसाद नाही

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ८ डिसेंबर, २०२० रोजी पाठ्यपुस्तकाच्या पुनर्वापराबाबत शासन निर्णय निर्गमित केला होता. त्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला होता. पुस्तकांच्या पुनर्वापरामुळे कागदांची बचत होत असल्याने पालकांनी पुस्तके परत करावी, असे आवाहनवजा विनंती शिक्षण विभागाने केली होती. परंतु नागपूर जिल्ह्यातील पालकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामीण भागात गतवर्षी वितरित केलेल्या एकूण पुस्तकांपैकी केवळ १५ ते १८ टक्के पुस्तके परत आल्याची माहिती आहे.

युडायसप्रमाणे बालभारतीकडे पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली. अद्यापपर्यंत पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. पुस्तके उपलब्ध होताच विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येईल.

- चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :Schoolशाळा