शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

आजपासून ऑनलाईन शाळा, पण पुस्तकाविना !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 09:56 IST

Nagpur News सोमवारी २८ जूनपासून शाळा उघडणार असल्या तरी कोरोना संक्रमणामुळे वर्ग ऑनलाईनच भरणार आहेत.

ठळक मुद्देआठ लाखांवर पुस्तकांची बालभारतीकडे मागणीकोरोना लॉकडाऊनमुळे पुरवठा प्रभावित

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : सोमवारी २८ जूनपासून शाळा उघडणार असल्या तरी कोरोना संक्रमणामुळे वर्ग ऑनलाईनच भरणार आहेत. पुस्तकाशिवाय अभ्यान नाही, हे खरे असले तरी यंदा बालभारतीकडून पुस्तकांचा पुरवठा वेळवर झाला नाही. त्यामुळे महापालिका व जिल्हा परिषदेच्या शाळा पुस्तकाविनाच भरणार, असे दिसत आहे.

ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या जवळपास १,५३० तर नागपूर शहरात महापालिकेच्या १५६ वर शाळा आहेत. शहर व ग्रामीण भागात इतर अनुदानित एक हजारावर शाळा आहे. येथील सर्व इयत्ता १ ली ते ८ वी पर्यंतच्या १ लाख ४९ हजारावर विद्यार्थ्यांकरिता जि.प.च्या शिक्षण विभागाकडून जवळपास ८ लाख २ हजाराहून अधिक पुस्तकांची मागणी बालभारतीकडे अनेक दिवसांपूर्वीच केली आहे. दरवर्षी बालभारतीकडून साधारणत: मे महिन्यात पुस्तकांची छपाई होऊन केंद्र शाळांवर पोहोचविली जाते. परंतु सोमवारपासून शहर व ग्रामीण भागातील सर्व माध्यमांच्या शाळा ऑनलाईन सुरु होत असल्या तरी पुस्तके उपलब्ध नाहीत. गतवर्षी कोरोनाचा प्रकोप असतानाही शाळांना दहा दिवसांपूर्वीच पुस्तके उपलब्ध होऊन सत्र सुरु होण्यापूर्वीच विद्यार्थ्यांच्या हातात पडली होती.

शिक्षकांना दैनंदिन अहवाल सादर करणे अनिवार्य

विद्यार्थ्यांविना उद्या सोमवारपासून यंदाच्या शैक्षणिक सत्राला सुरुवात होत असून ऑनलाईन शिक्षण देण्यात येणार आहे. पहिली ते नववी शिक्षक ५० टक्के उपस्थिती, तसेच इयत्ता दहावी व इयत्ता बारावीचे १०० टक्के शिक्षकांची उपस्थिती अनिवार्य आहे. शिक्षकेतर कर्मचारी तसेच प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळा, मुख्याध्यापक व कनिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य यांची १०० टक्के उपस्थिती अनिवार्य असल्याचे सांगण्यात येते. विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिकविले की ऑफलाईन याचा अहवाल त्यांना दररोज ग्रामीण भागात केंद्र प्रमुखांकडे सादर करावा लागणार आहे.

पाठ्यपुस्तकाच्या पुनर्वापर योजनेला प्रतिसाद नाही

राज्याच्या शालेय शिक्षण विभागाने ८ डिसेंबर, २०२० रोजी पाठ्यपुस्तकाच्या पुनर्वापराबाबत शासन निर्णय निर्गमित केला होता. त्या माध्यमातून पर्यावरण संरक्षणाचा संदेश देण्यात आला होता. पुस्तकांच्या पुनर्वापरामुळे कागदांची बचत होत असल्याने पालकांनी पुस्तके परत करावी, असे आवाहनवजा विनंती शिक्षण विभागाने केली होती. परंतु नागपूर जिल्ह्यातील पालकांकडून त्याला अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. ग्रामीण भागात गतवर्षी वितरित केलेल्या एकूण पुस्तकांपैकी केवळ १५ ते १८ टक्के पुस्तके परत आल्याची माहिती आहे.

युडायसप्रमाणे बालभारतीकडे पुस्तकांची मागणी नोंदविण्यात आली. अद्यापपर्यंत पुस्तकांचा पुरवठा झालेला नाही. पुस्तके उपलब्ध होताच विद्यार्थ्यांना वितरण करण्यात येईल.

- चिंतामण वंजारी, शिक्षणाधिकारी (प्राथमिक)

टॅग्स :Schoolशाळा