शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

सेवाभावी व सामाजिक संस्थांना कांदे १२ ते १५ रुपये किलोने विक्री

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2020 12:04 IST

कळमना कांदे-बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी ना नफा, ना तोटा, या तत्त्वावर सेवाभावी संस्थांना १०० टन कांदे १२ ते १५ रुपये किलो दराने उपलब्ध करून देणार आहे.

ठळक मुद्देजयप्रकाश वसानी यांचे आवाहनना नफा, ना तोटा तत्त्व

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे नागपुरात नागरिकांना घराबाहेर निघणे कठीण झाले आहे. काम न मिळाल्याने मजुरांची उपासमार होत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक सेवाभावी आणि सामाजिक संस्था पुढे आल्या आहेत. त्यांना खाद्यान्नाचे पॅकेट आणि जीवनावश्यक वस्तू पॅक करून देण्यात येत आहेत. अशास्थितीत कांदे मुबलक प्रमाणात उपलब्ध करून देण्यासाठी कळमना कांदे-बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी पुढाकार घेतला आहे. ना नफा, ना तोटा, या तत्त्वावर सेवाभावी संस्थांना १०० टन कांदे १२ ते १५ रुपये किलो दराने उपलब्ध करून देणार आहे.कळमन्यात कांदे आणि बटाट्यांची आवक वाढली असली तरीही त्याच प्रमाणात विक्रीतही वाढ झाली आहे. अनेक संस्थांनी खरेदी वाढविली आहे. मालाचा तुटवडा असल्याचे कारण सांगून अनेक विक्रेते जास्त दरात कांदे-बटाट्यांची विक्री करीत आहेत. सध्या किरकोळ बाजारात कांद्याचे दर ३० ते ३५ रुपये किलो आहे. या किमतीत कांदे खरेदी करून पॅकबंद करून वाटप करणे महागच आहे. पण कळमन्यात वसानी यांनी अर्ध्यापेक्षा कमी किमतीत कांदे उपलब्ध करून दिल्याने सेवाभावी आणि सामाजिक संस्थांची सोय होणार आहे. या संस्थांनी कळमन्यात येऊन खरेदी करावी, असे आवाहन वसानी यांनी केले आहे. याशिवाय बटाटे किमतीत संस्थांना देण्याचे आवाहन वसानी यांनी केले आहे. किरकोळमध्ये ३५ ते ४० रुपये किंमत असताना २० रुपये किलो दराने उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

टॅग्स :onionकांदाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस