शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

नागपुरात कांद्याची आवक वाढली, दर्जा निकृष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 8, 2019 00:15 IST

परतीच्या पावसामुळे काढणीस आलेला कांदा खराब झाल्याने कळमना ठोक बाजारात येणाऱ्या कांद्याचा दर्जा निकृष्ट आहे. चांगल्या प्रतवारीचा कांदा ४० ते ५० रुपये आणि तोच कांदा किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलो आहे.

ठळक मुद्देकिरकोळमध्ये कांदा ६० ते ७० रुपये : परतीच्या पावसामुळे पीक खराब

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : परतीच्या पावसामुळे काढणीस आलेला कांदा खराब झाल्याने कळमना ठोक बाजारात येणाऱ्या कांद्याचा दर्जा निकृष्ट आहे. चांगल्या प्रतवारीचा कांदा ४० ते ५० रुपये आणि तोच कांदा किरकोळ बाजारात ६० ते ७० रुपये किलो आहे.कळमन्यात निकृष्ट दर्जाच्या कांद्याचे भाव १५ ते ३० रुपये आहेत. किरकोळ विके्रते निकृष्ट दर्जाचा कांदा खरेदी करून त्याची छाटणी केल्यानंतर किरकोळमध्ये ५० ते ६० रुपये विकत आहे. छाटणाीनंतर अर्धाच कांदा शिल्लक राहत असल्याने या भावात कांद्याची विक्री करण्यात येत असल्याचे सोमवारी क्वॉर्टर बाजारपेठेतील विक्रेते रंगनाथ सोमवंशी यांनी सांगितले.परतीच्या पावसाने नवीन कांद्याच्या उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. काढणीस आलेला नवीन कांदा भिजल्याने खराब झाला असून, जुन्या कांद्याचा (उन्हाळी कांदा) साठादेखील संपत आल्याने कांद्याच्या दरात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे.कांदे ९० टक्के खराब, १० टक्के चांगलाकळमन्यातील कांदे-बटाटे अडतिया असोसिएशनचे माजी अध्यक्ष जयप्रकाश वसानी यांनी सांगितले की, कळमन्यात चांगल्या प्रतिच्या कांद्याचे भाव ४० ते ५० रुपये आहेत. चिल्लर बाजारात ७० रुपयांपर्यंत भाव गेले आहेत. या कांद्याची प्रतवारी चांगली आहे. परतीच्या पावसाआधी भाव ६० रुपये होते. कळमन्यात ९० टक्के निकृष्ट दर्जाचा कांदा आणि १० टक्के चांगल्या प्रतिचा कांदा येत आहे. कांद्याला साफ करावे लागत आहे. परतीच्या पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यातील कांद्याचे पीक खराब झाले आहे. दररोज २० ते २५ ट्रकची आवक (प्रति ट्रक १६ ते १८ टन) आहे. सर्वच माल विकला जात आहे. कर्नाटक आणि आंध्र प्रदेशातून कांदे येत आहेत. गुजरातेतील कांदा कळमन्यात आणण्यासाठी भाडे परवडत नसल्यामुळे हा कांदा आसाम, पश्चिम बंगाल, पंजाब आणि दिल्लीला जात आहे. सध्या कळमन्यात औरंगाबाद, अहमदनगर, कोल्हापूर, सोलापूर, बेळगाव, दावणगिरी, हुगळी, कर्नुल येथून कांदे विक्रीस येत आहे. त्यामध्ये ९० टक्के लाल आणि १० टक्के पांढरा कांद्याचा समावेश आहे.कळमन्यात दिवाळीनंतर नियमित येणारा धुळे आणि जळगाव येथील कांदा परतीच्या पावसामुळे खराब झाला आहे. दर्जा कमी आहे. या ठिकाणांहून थोडीफार आवक सुरू झाली आहे. पुढे वाढणार आहे. नवीन कांद्याची आवक सुरू होण्यास डिसेंबर उजाडणार असून, तोपर्यंत सामान्यांना कांदा दरवाढीचे चटके सोसावे लागणार आहे. येत्या काही दिवसांत महाराष्ट्र, कर्नाटक येथील कांद्याचे पीक आल्यावर भाव कमी होण्याची शक्यता असल्याचे वसानी यांनी सांगितले. काढणीस असलेला कांदा खराब झाल्यामुळे जुन्या कांद्याला जास्त भाव मिळत आहे. महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते.गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये ३० ते ३५ रुपये भावगेल्या वर्षी किरकोळ बाजारात कांद्याचे भाव ३० ते ३५ रुपये होते. यावर्षी भाव ६० ते ७० रुपयांवर गेले आहेत. नाफेडने साठवणूक केलेला कांदा मध्यंतरी भाववाढ झाल्यानंतर बाजारात आणला होता. त्यामुळे आता नाफेडकडे फारसा साठा नाही. दरम्यान सरकारने अफगाणिस्तान, इजिप्त, तुर्कस्तान आणि इराण येथून कांदा आयात करण्याचा निर्णय घेतला. आयात केलेल्या कांद्याचे ८० कंटेनर भारतात दाखल झाले असून, १०० कंटेनर लवकरच येणार आहे. पण या कांद्याचा महाराष्ट्राला फारसा उपयोग होणार नाही. आयातीत कांदा पंजाब, दिल्ली आणि उत्तरोत्तर भागातच विकला जाणार आहे.

टॅग्स :onionकांदाMarketबाजारnagpurनागपूर