शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

‘एक गाव, एक वाण’ याेजना;  ५० गावांची निवड; शेतकऱ्यांना हेक्टरीसात हजार ५०० रुपयांचे अनुदान!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2022 20:20 IST

Nagpur News ‘एक गाव, एक वाण’ या याेजनेंतर्गत नागपूर जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एकूण ६६ गावांची निवड करण्यात आली असून, संपूर्ण तालुके चार क्लस्टरमध्ये विभागण्यात आले आहे.

ठळक मुद्देकापूस मूल्य साखळी विकास प्रकल्प

नागपूर : राज्याच्या कृषी विभागाच्यावतीने नागपूर जिल्ह्यात दाेन वर्षांपासून ‘एक गाव, एक वाण’ या याेजनेंतर्गत कापूस मूल्य साखळी विकास प्रकल्प (स्मार्ट काॅटन) राबविला जात आहे. या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील १३ तालुक्यांमधील एकूण ६६ गावांची निवड करण्यात आली असून, संपूर्ण तालुके चार क्लस्टरमध्ये विभागण्यात आले आहे. हा प्रकल्प जिल्ह्यातील १३ पैकी ११ तालुक्यांंमधील एकूण २,८५७ हेक्टरमध्ये राबविला जात आहे.

नागपूर जिल्ह्यात लांब धाग्याच्या दर्जेदार कापसाचे उत्पादन व्हावे, कापड उद्याेगाला चांगल्या दर्जाची रुई व पर्यायाने धागा मिळावा तसेच कापूस मूल्य साखळी मजबुत व्हावी, यासाठी हा प्रकल्प राबविला जात असल्याची माहिती कृषी उपसंचालक अरविंद उपरीकर यांनी दिली. या प्रकल्पासाठी नागपूर जिल्ह्यातील १३ पैकी ११ तालुक्यांचे एकूण चार क्लस्टर तयार केले आहेत. हा प्रकल्प जिल्ह्यातील एकूण २,८५७ हेक्टरमध्ये राबविण्यात येत असून, एका क्लस्टरमध्ये कपाशीच्या एकाच वाणाचे उत्पादन घेतले जात असल्याचे अरविंद उपरीकर यांनी सांगितले.

या प्रकल्पासाठी जिल्ह्यातील एकूण ६६ गावांची निवड केली आहे. शेतकऱ्यांना एक एकर अथवा एक हेक्टरपर्यंतची मार्यादा निर्धारित केली आहे. या प्रकल्पात सहभागी हाेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रशिक्षणासाेबतच प्रति हेक्टरी ७,५०० रुपयांचे अनुदानही दिले जाते.

२,८५७ हेक्टरवर प्रकल्प

कापूस मूल्य साखळी विकास प्रकल्प (स्मार्ट काॅटन) हा प्रकल्प नागपूर जिल्ह्यात २,८५७ हेक्टरवर राबविला जात आहे.

या प्रकल्पासाठी जिल्ह्यात फारसा प्रतिसाद मिळाला नाही.

लांब धाग्याच्या कापसाला प्राधान्य

या प्रकल्पांतर्गत दर्जेदार व लांब धाग्याच्या कापसाचे उत्पादन घेण्यास प्राधान्य व प्राेत्साहन दिले जात आहे. एका गावात एकच वाण पेरणीसाठी वापरल्याने कापसाचा दर्जा सांभाळणे व त्यांला चांगला दर मिळविणे शक्य हाेईल.

साडे सात हजार रुपयांचे अनुदान

या प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी ७,५०० रुपयांचे अनुदान दिले जाते. बियाणे, पिकाला लागणारे सूक्ष्म अन्नद्रव्ये, विद्राव्य खते, कीड व राेगांच्या व्यवस्थापनावर हे अनुदान खर्च करणे अनिवार्य असते.

गावांची निवड कशी केली जाते?

या प्रकल्पात सहभागी हाेण्यासाठी महाडीबीटी या सरकारी पाेर्टलवर अर्ज मागविण्यात येतात.

ज्या गावांमधील सर्वाधिक अर्ज प्राप्त झाले, त्या गावाची व शेतकऱ्यांची निवड केली जाते.

शेतकऱ्यांची निवड कशी केली जाते?

निवड झालेल्या गावांमधील शेतकऱ्यांचीच महाडीबीटी पाेर्टलवरील अर्जाच्या आधारे या प्रकल्पासाठी निवड केली जाते.

निवड झालेल्या शेतकऱ्यांना कीट दिली जाते.

निवड झालेल्या शेतकऱ्यांची मूल्य साखळी विकास कार्यशाळा घेऊन त्यांना प्रशिक्षण दिले जाते.

दर्जेदार कापसाचे उत्पादन

नागपूर जिल्ह्यात साेयाबीनचे अपेक्षित उत्पादन हाेत नसल्याने केवळ कपाशीसाठी हा प्रकल्प राबविला जात आहे. या प्रकल्पांतर्गत कापसाची उत्पादकता व उत्पादन वाढत असून, कापसाचा दर्जा उंचावताे. त्यातून शेतकऱ्यांना अधिक पैसा मिळण्यास मदत हाेते.

- मिलिंंद शेंडे,

अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर.

टॅग्स :agricultureशेतीcottonकापूस