शहरं
Join us  
Trending Stories
1
"मदतीच्या बदल्यात मदत"; फडणवीसांची भेट, BJPचा प्रचार अन् अभिजीत पाटलांच्या कारखान्याचं सील निघालं!
2
ऑस्ट्रेलियाचा टीम इंडियाला धक्का; कसोटी क्रमवारीत अव्वल! भारताची दुसऱ्या स्थानी घसरण
3
'आम्ही तेथे राहुल गांधींविरोधात जिंकू शकणार नाही...'; भाजपाच्या मुख्यमंत्र्यांचा टोमणा
4
सायकल बिल्डिंगखाली लावली म्हणून पित्रा-पुत्राने केली एकाची हत्या; गिरगावात धक्कादायक प्रकार
5
“उद्धव ठाकरे वीर सावरकरांचे नाव भाषणात घेण्याची हिंमत करु शकतात का?”; अमित शाहांचे आव्हान
6
'भारतावर संकट आले की, राहुल गांधी इटलीला पळून जातात', योगी आदित्यनाथांचा घणाघात
7
“मोदी को हराना मुश्कीलही नही, नामुमकीन है”; CM एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला विश्वास
8
अमृता खानविलकर या कारणामुळे सोशल मीडियावर शेअर करत नाही नवऱ्यासोबतचे फोटो, म्हणाली - एकमेकांना...
9
“३५ वर्षे राजकारणात, लढायचे अन् जिंकायचे एवढेच उद्दिष्ट”; रवींद्र वायकर स्पष्ट केली भूमिका
10
Mouni Roy : "दिवसाला खाल्ल्या 30 गोळ्या, वजन वाढलं, आयुष्य संपलं..."; मौनी रॉयला आला भयंकर अनुभव
11
Mumbai Indians Probable Playing XI, IPL 2024 MI vs KKR: मुंबई इंडियन्ससाठी आज 'करो या मरो'; हार्दिक करणार संघात २ महत्त्वाचे बदल, 'या' खेळाडूंना डच्चू?
12
“राजकारणात माझा जन्म ४ दिवसांचा, पण...”; उज्ज्वल निकम मैदानात, विरोधकांना थेट आव्हान
13
राहुल गांधींनी रायबरेलीतून भरला उमेदवारी अर्ज, रस्त्यावर काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी
14
Share Market: सेन्सेक्स-निफ्टी कोसळले, गुंतवणूकदारांनी 4 लाख कोटी गमावले...
15
ठरलं! पुढच्या महिन्यात लॉन्च होणार Bajaj ची जगातील पहिली CNG बाईक, किंमत किती..?
16
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
17
Varuthini Ekadashi 2024: एकादशीच्या व्रताला फराळी पदार्थांचे सेवन करणे योग्य की अयोग्य? वाचा शास्त्र!
18
'बोस यांनी मला स्पर्श केला अन्...'; महिलेच्या आरोपांवर राज्यपाल म्हणाले,'गोळी चालवा पण...'
19
Smriti Irani : "काँग्रेसने आपला पराभव स्वीकारला..."; स्मृती इराणींचा राहुल गांधींवर जोरदार निशाणा
20
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता

एक सदस्यीय प्रभागावर शिक्कामोर्तब : विधिमंडळात विधेयक मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 21, 2019 11:04 PM

महानगरपालिकेत बहुसदस्यीय प्रभागाऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासंबधीचे विधेयक शनिवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले.

ठळक मुद्देपृथ्वीराज चव्हाणांना हवा होता दोन सदस्यीय प्रभाग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महानगरपालिकेत बहुसदस्यीय प्रभागाऐवजी एक सदस्यीय प्रभाग पद्धती लागू करण्यासंबधीचे विधेयक शनिवारी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात मंजूर झाले. परंतु या विधेयकावरील चर्चेदरम्यान सत्तापक्षातील सदस्यांमध्येच एकमत नसल्याची बाब प्रकर्षाने आढळून आली. कॉँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी चार सदस्यीय प्रभागाला विरोध केला असला तरी त्यांनी किमान दोन सदस्यीय प्रभागांतर्गत महापालिकेत निवडणुका व्हाव्यात, असे मत व्यक्त केले. तसेच विधेयक आजच्या आज मंजूर करण्याऐवजी संयुक्त समितीकडे पाठविण्याच्या विरोधी पक्षाच्या मागणीचे समर्थनही केले. परंतु राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनी मात्र हा मुद्दा खोडून काढत विधेयक आजच्या आज मंजूर करण्याचे समर्थन केले. दरम्यान विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हे बिल संयुक्त समितीकडे पाठवण्याचा प्रस्ताव परत घेतला आणि विधेयक मंजूर करण्यात आले.विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी विधेयकावर यांनी चर्चा सुरु करताना सांगितले की, महापालिकेत महिलांसह विविध आरक्षण कोटेशन निश्चित केले जाते. एक सदस्यीय प्रभाग पद्धतीमुळे चांगले काम करणाऱ्या नगरसेवकाला पुन्हा: त्याच प्रभागातून निवडून येईल की नाही, अशी शंका असते. महाराष्ट्रातील कुठल्याही मनपाने बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध केलेला नाही. त्यामुळे ही पद्धत अपयशी ठरलेली नाही. सरकार राजकीय फायद्यासाठी बहुमताच्या जोरावर विधेयक मंजूर करीत आहे. भाजपचे सुधीर मुनगंटीवार म्हणाले, ६ डिसेंबर २००१ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीचे समर्थन केले होते. यावर माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, विलासराव देशमुख यांनी बहुसदस्यीय पद्धत लागू निश्चित केली होती. परंतु त्यांनी आपला निर्णय मागे घेत पुन्हा एक सदस्यीय पद्धती लागू केली होती. परंतु १४ मे २०१६ रोजी भाजप सरकारने पुन्हा बहुसदस्यीय पद्धत आणल्याची बाब सभागृहाच्या निदर्शनास आणून दिली खरी, परंतु चव्हाण यांनी एक सदस्यीय पद्धतीला विरोध केला. ते म्हणाले, एक सदस्यीय ऐवजी दोन सदस्यीय प्रभागाची व्यवस्था असायला हवी. आता सध्या औरंगाबादच्या निवडणुका आहेत.तेव्हा सरकारने राज्यातील सर्व २७ महापलिकेच्या पदाधिकारी व अधिकाऱ्यांशी चर्चा करून निर्णय घ्यायला हवा. घाईगर्दीने विधेयक मंजूर करण्यात येऊ नये, असे सांगितले. परंतु अजित पवार यांनी लगेच ही बाब खोडून काढली. ते म्हणाले बहुसदस्यीय प्रभागामुळे सदस्यांमध्ये भांडणे होत आहेत. विकास कामांवर परिणाम पडला आहे. त्यामुळे हे विधेयक तातडीने मंजूर करण्यात यावे, असे सांगितले. काँग्रेसचे विकास ठाकरे यांनी सुद्धा बहुसदस्यीय प्रभाग पद्धतीला विरोध करीत विधेयकाचे समर्थन केले. चर्चेत भाजपतर्फे आशिष शेलार, देवयानी फरांदे, योगेश सागर, शिवसेनेचे प्रताप सरनाईक आदींनी भाग घेतला. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या विनंतीवरून फडणवीस यांनी विधेयक समितीला पाठवण्याचा प्रस्ताव परत घेतला. परंतु त्यांनी सांगितले की, हा निर्णय राजकीय उद्देशातून घेण्यात आला आहे. भविष्यात सरकार चर्चा करून निर्णय घेईल, अशी अपेक्षाही व्यक्त केली.

टॅग्स :Vidhan Bhavanविधान भवनMuncipal Corporationनगर पालिकाElectionनिवडणूकbillबिल