शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

उड्डाणपूल आणि आरयूबीमुळे एक लाख लोकांना सुविधा : बृजेश दीक्षित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 00:56 IST

मनीषनगर आणि लगतच्या वस्त्यांमधून वर्धा रोडवर येण्यासाठी लोकांना रेल्वे रुळ ओलांडावा लागत होता. फाटक बंद झाल्यानंतर लोकांना थांबावे लागायचे. या ठिकाणी उड्डाणपूल असावा, अशी या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. आता मनीषनगर येथून थेट वर्धा रोड उड्डाणपुलावर आणि आरयूबी (रुळाखालून मार्ग) येथून वर्धा रोडवर जाता येणार आहे. त्यामुळे लोकांना रेल्वेचे फाटक बंद-सुरू होण्याची वाट पाहावी लागणार नाही.

ठळक मुद्देमनीषनगर उड्डाणपूल सहा महिन्यात सुरू होणार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मनीषनगर आणि लगतच्या वस्त्यांमधून वर्धा रोडवर येण्यासाठी लोकांना रेल्वे रुळ ओलांडावा लागत होता. फाटक बंद झाल्यानंतर लोकांना थांबावे लागायचे. या ठिकाणी उड्डाणपूल असावा, अशी या परिसरातील नागरिकांची अनेक वर्षांपासूनची मागणी आता पूर्ण होणार आहे. आता मनीषनगर येथून थेट वर्धा रोड उड्डाणपुलावर आणि आरयूबी (रुळाखालून मार्ग) येथून वर्धा रोडवर जाता येणार आहे. त्यामुळे लोकांना रेल्वेचे फाटक बंद-सुरू होण्याची वाट पाहावी लागणार नाही.दोन्ही पुलाच्या पाहणी दौऱ्यानंतर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. बृजेश दीक्षित यांनी पत्रकारांना सांगितले की, या मार्गावर दररोज एक लाख वाहनांची ये-जा असते. दाट वस्त्यांच्या भागात उड्डाणपूल आणि आरयूबीचे बांधकाम अत्यंत कठीण काम होते. त्याकरिता अनेकदा डिझाईनमध्ये बदल करण्यात आला. त्यामुळे पूल बांधताना तोडण्यात येणारी १४ घरे वाचली. पुलाचे बांधकाम करण्याचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे आहे. पण बांधकामाचे काम महामेट्रोकडे सोपविले. हे काम वेळेत पूर्ण होणार आहे. चार महिन्यात आरयूबी आणि सहा महिन्यात उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे. वाहन उड्डाणपुलावरून आणताना वर्धा मार्गावरील उड्डाणपुलावर डावीकडे वळवावे लागेल तर आरयूबी येथून आणताना वर्धा मार्गावर थेट नेता येणार आहे. त्यामुळे लोकांची वेळेची बचत होणार आहे.उड्डाणपूल रिलायन्स फ्रेशपासून वर्धा मार्गापर्यंत ९०० मीटर लांब तर दोन पदरी आरयूबी ५०० मीटर लांब आहे. पूर्वीच्या डिझाईननुसार जमिनीचे अधिग्रहण आणि घरांचा मोबदला देण्यासाठी २२० कोटींचा खर्च होता. १४ घरांचे मालक येथून जाण्यास तयार नव्हते. त्यामुळे डिझाईनमुळे बदल करण्यात आला. त्यामुळे जमिनीच्या अधिग्रहणावर होणारा खर्च वाचला. आरयूबीमध्ये पाणी जमा होणार नाही, यावर लक्ष देण्यात आले आहे. पाण्याच्या निकासीसाठी तीन चेंबर तयार करण्यात आले आहेत. तसेच वर्धा मार्गावरून डावीकडे आरयूबीमधून जाताना प्रारंभी खुला भाग पॉलिकॉर्बोनेट शीटने कव्हर करण्यात येणार आहे; शिवाय आरयूबीमध्ये नैसर्गिक सूर्यप्रकाशासाठी सन पाईप टाकण्यात येणार आहे. याकरिता सहा पिण्याच्या पाण्याच्या लाईन, मलवाहिन्या आणि संबंधित विभागाची परवानगी घेऊन विजेच्या लाईनही बदलविल्या आहेत. आता १५ मीटर काम राहिले आहे. याशिवाय ८.५ मीटर रुंदीच्या उड्डाणपुलावर २५ मीटरचे २५ स्पॅन टाकण्यात आल्याचे दीक्षित यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Metroमेट्रोnagpurनागपूर