शहरं
Join us  
Trending Stories
1
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
2
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
3
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
4
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
5
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
6
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
7
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
8
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
9
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!
10
Ajinkya Rahane : हीच ती वेळ! सोशल मीडियावरुन पोस्ट शेअर करत अजिंक्य रहाणेनं खांद्यावरील ओझे केले हलके; म्हणाला...
11
इस्रायल-हमास युद्धावरून मायक्रोसॉफ्टच्या मुख्यालयात जोरदार राडा; कंपनीवर गंभीर आरोप
12
आशिया कपसाठी श्रेयस अय्यर संघात का नाही? या चर्चेत BCCI नं पुडी सोडली, की खरंच तो कॅप्टन होणार?
13
"राष्ट्रीय पुरस्कार उचलण्यासाठी माझा एकच हात...", शाहरुख खानचा अफलातून सेन्स ऑफ ह्युमर
14
बेस्ट निवडणूक २०२५: पहिल्यांदाच युती अन् ठाकरे बंधूंचा दारुण पराभव; ‘ही’ आहेत ५ मोठी कारणे
15
शाळेच्या गेटजवळ स्फोटके आढळली; १० वर्षाच्या विद्यार्थ्याने उचलून फेकलं आणि...
16
'हे अमेरिकेच्या इतिहासातील सर्वात मूर्खपणाचं पाऊल..,' ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ म्हणाले, "ट्रम्प टॅरिफनेच ब्रिक्सला विजय मिळवून दिला.."
17
"आम्हाला त्रास झालाय का? आम्हाला माहीत आहे, काय आहे ते?"; फडणवीस-राज ठाकरे भेटीवर संजय राऊत स्पष्टच बोलले
18
पाकिस्तान अनेक हवाई मार्ग करत आहे बंद! नेमकं कारण तरी काय?मोठे नियोजन सुरू असल्याची शक्यता
19
“ठाकरे ब्रँड कोमात, स्वदेशी देवाभाऊ जोमात”; बेस्ट निवडणूक निकालावर शिवसेना भवनासमोर बॅनरबाजी
20
बांगलादेशला पुन्हा पूर्व पाकिस्तान करण्याचा मुनीरचा डाव, ट्रम्प यांना दाखवली अशी लालूच, भारतासाठी धोका वाढला

कोरोनाकाळातील दीड वर्षात ११ लाख नागरिकांनी तोडले वाहतुकीचे नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 00:40 IST

11 lakh citizens broke traffic rules मार्च २०२० पासून कोरोनामुळे विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत तर निवडक वाहनचालकांनाच बाहेर निघण्याची परवानगी होती. असे असतानादेखील कोरोनाकाळातील दीड वर्षात वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे तब्बल ११ लाखांहून अधिक नागरिकांनी वाहतुकीचे नियम मोडले.

ठळक मुद्दे२९१ जणांचा रस्ते अपघातात मृत्यू : निर्बंध असूनदेखील अकराशेहून अधिक अपघात

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : मार्च २०२० पासून कोरोनामुळे विविध निर्बंध लावण्यात आले आहेत. लॉकडाऊनच्या कालावधीत तर निवडक वाहनचालकांनाच बाहेर निघण्याची परवानगी होती. असे असतानादेखील कोरोनाकाळातील दीड वर्षात वाहतुकीचे नियम मोडल्यामुळे तब्बल ११ लाखांहून अधिक नागरिकांनी वाहतुकीचे नियम मोडले. नागपूर शहरातील लोकसंख्या लक्षात घेता एक तृतीयांशहून अधिक लोकांवर कारवाई झाली आहे. मागील काही वर्षांतील कारवाईपेक्षा हा आकडा मोठा आहे. माहितीच्या अधिकारातून ही धक्कादायक बाब समोर आली.

उपराजधानीतील माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी नागपुरातील वाहतुकीसंदर्भात शहर पोलिसांच्या वाहतूक विभागाकडे माहितीच्या अधिकारांतर्गत विचारणा केली होती. नागपुरात १ जानेवारी २०२० ते ३१ मे २०२१ या कालावधीत किती जणांनी वाहतूक नियमांचे उल्लंघन केले, त्यांना किती दंड ठोठावण्यात आला, परवाना नसताना किती लोक वाहन चालवत होते, तसेच किती हेल्मेट न घालता सापडले इत्यादी प्रश्न उपस्थित केले होते. प्राप्त झालेल्या अधिकृत माहितीनुसार जानेवारी २०२० ते ३१ मे २०२१ या कालावधीत वाहतूक नियम मोडल्याप्रकरणी ११ लाख ७ हजार ९९१ नागरिकांवर ई-चलान कारवाई करण्यात आली. त्यातील ४ लाख ८९ हजार ७४० नागरिकांनी दंड भरलेला नसून ही रक्कम २० कोटी ४४ लाख ७६ हजार ३०० रुपये इतकी आहे.

दीड वर्षाच्या कालावधीत नागपूर शहरात रिंग रोड व विविध जंक्शन्सवर १ हजार १२३ अपघात झाले व यात २९१ नागरिकांचा बळी गेला. यातील ३६ बळी रिंग रोडवरील होते.

 

हेल्मेट न घालणे २.४८ लाख लोकांना भोवले

 

हेल्मेट न घालता दुचाकी चालविल्याप्रकरणी २ लाख ४८ हजार ९९९ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांच्याकडून ३ कोटी ५५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. सिग्नल तोडल्याप्रकरणी ४९ हजार ३९८ लोकांवर कारवाई झाली व त्यांच्याकडून ७५ लाख ६२ हजारांचा दंड घेण्यात आला. वाहन चालविताना मोबाइलवर बोलणाऱ्या ६९ हजार २६२ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली व त्यांना १ कोटी २० लाख ७० हजारांचा दंड ठोठाविण्यात आला.

 

गुन्हा - कारवाई - दंड (रुपयांमध्ये)

हेल्मेट न घालणे - २,४८,९९९ - ३,५५,९४,५००

सिग्नल तोडणे - ४९,३९८ - ७५,६२,२००

अतिवेगाने गाडी चालविणे - १३,९३९ - १९,९४,०००

राँगसाइड गाडी चालविणे - ५,०३२ - २०,१९,०००

गाडी चालविताना मोबाइल वापरणे - ६९,२६२ - १,२०,७०,६००

शांतता क्षेत्रात हॉर्न वाजविणे - २९९ - १,१५,०००

परवाना नसताना वाहन चालविणे - ८४,३७९ - १,२०,२०,०००

टॅग्स :traffic policeवाहतूक पोलीसnagpurनागपूर