शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
2
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
3
बीएसएफ एका आदेशाची वाट पाहतेय, सुर्यास्तापूर्वी आला तर ठीक...; वाघा-अटारी बॉर्डरवर काय घडतेय...
4
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार
5
"हिंदू हिंदू काय करताय?", पहलगाम हल्ल्यावर बोलताना शत्रुघ्न सिन्हांनी थेट पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा
6
दुसऱ्यांचा विनाश करणे हा धर्म नाही अधर्म आहे, शिक्षा झालीच पाहिजे - प्रेमानंद महाराज
7
‘पत्नीचे अनेक तरुणांशी अनैतिक संबंध, नशेच्या धुंदीत घालतात धिंगाणा, करतात अश्लील चाळे ’, पतीचे गंभीर आरोप, पुरावेही दिले   
8
'देवाला घाबरलं पाहिजे, आता तुम्ही शून्याच्याही खाली जाणार'; पाकिस्तानी प्राध्यापकाची स्वतःच्याच देशावर टीका
9
संकटात कंपनी, गुंतवणकदार झाले कंगाल; ₹११२५ वरुन ₹९५ वर आला शेअर, सातत्यानं लोअर सर्किट
10
भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्ध पेटले तर कोणता देश कोणाला पाठिंबा देईल? पाहा...
11
जिद्द असावी तर अशी! अंगणवाडी ते IAS अधिकारी; ३ वेळा अपयश, मानली नाही हार, रचला इतिहास
12
सिंधू पाणी करार रद्द केल्यानंतर भारताचा थेट पाकच्या अर्थव्यवस्थेलाच धक्का! ३००० कोटींचे होणार नुकसान
13
पाकिस्तानचा गळा कापण्याची वेळ, इस्रायलसारखा बदला घ्यावा; अमेरिकेतून दिला गेला सल्ला
14
नवरी जोमात, नवरा कोमात! रसगुल्ला खाल्ला, हात धुण्याच्या बहाण्याने बॉयफ्रेंडसोबत गेली पळून
15
'पीएम मोदी 1 तासही देऊ शकत नाहीत?', सर्वपक्षीय बैठकीत न बोलवल्याने ओवेसी नाराज...
16
Varuthini Ekadashi 2025: भयंकर राग येतो? त्याक्षणी म्हणा 'हा' मंत्र, क्षणात शांत व्हाल आणि वाद मिटेल! 
17
'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा
18
गजकेसरी योगात स्वामी स्मरण दिन: ११ राशींना सर्वोत्तम, सुख-समृद्धी; स्वामींचे पाठबळ, शुभ-लाभ
19
Zim vs Ban test: झिम्बाब्वेचा चार वर्षांनी कसोटी विजय! बांगलादेशला पाजलं पराभवाचं पाणी
20
Pahalgam Terror Attack: "आम्ही जिवंत आहोत..."; पहलगाममधील 'तो' Video विनय नरवालचा नाही, जाणून घ्या 'सत्य'

तर २३ ऑगस्टला वर्षा बंगल्यापुढे शेतकऱ्यांच्या...., शेतकरी नेते रविकांत तूपकर यांचा इशारा

By मंगेश व्यवहारे | Updated: August 20, 2024 15:46 IST

Nagpur News: सोयाबीनला ९०००, कापसाला १२५०० रुपये भाव द्या, संत्रा मोसंबीला १०० टक्के नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांसाठी पांदन रस्त्याची योजना राबवा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि शेतमजूरांनाही विमा कवच द्या. हे निर्णय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्या, रविकांत तुपकर यांची मागणी केली.

- मंगेश व्यवहारेनागपूर - सोयाबीनला ९०००, कापसाला १२५०० रुपये भाव द्या, संत्रा मोसंबीला १०० टक्के नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांसाठी पांदन रस्त्याची योजना राबवा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि शेतमजूरांनाही विमा कवच द्या. हे निर्णय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्या. त्या संदर्भात येत्या दोन दिवसांत ठोस भूमिका घ्या, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पत्रपरिषदेतून सरकारकडे केली. अन्यथा २३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यापुढे शेतकरी आत्महत्येचे प्रात्याक्षिक मुख्यमंत्र्यांपुढे सादर करू आणि पुढे रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राज्यातले वातावरण जाती धर्माच्या वादामुळे तापले आहे. यात शेतकरी दूर्लक्षित झाला आहे. सोयाबिनला ४ हजार तर कापसाला ६ हजार रुपये भाव मिळत आहे. हे भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. गेल्या वर्षीची पीक विम्याची अर्धी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. यंदा १०० लाख मेट्रीक टन सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकारने सोयाबिनचे आयात शुल्क ३० टक्के करून, ६५ लाख मेट्रीक टन ढेप निर्यात केल्यास सोयाबीनला चांगले भाव मिळू शकतात, असा तुपकरांचा दावा आहे. जंगली जनावरांमुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पक्के कुंपन घाऊन द्यावे अशीही मागणी त्यांनी केली. यावेळी पत्रपरिषदेला गजानन कावरके, दयाभाऊ राऊत, किरण ठाकरे, अमित अढाव, श्याम अवथळे, सूर्या अडबाले, सूरज निंबर्ते, बालाजी मोरे, , चंद्रशेखर गवळी, अजय घाडगे आदी उपस्थित होते.

 विधानसभेत २५ जागांवर लढणारविधानसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या पदरी त्यांचे हक्क मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. निवडणुकीत कुठल्याही पक्षाशी मोट न बांधता कष्टकरी, शेतकरी व श्रमिकांच्या नेत्यांना संघटीत करून महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीच्या माध्यमातून राज्यातील २५ जागा लढणार असल्याचे तुपकर म्हणाले.

सरकारचे दुटप्पी धोरणशेतकरी भावाला त्यांनी कष्टातून पिकविलेल्या उत्पादनाला हमीभावापेक्षा कमी किंमत द्यायची, त्यांना पिक विम्याचे पैसे नाकारायचे, त्यांना पिक कर्ज मिळू द्यायचे नाही, त्यांना आत्महत्या करण्यापर्यंत लाचार करायचे, शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारून लाडक्या बहिणीच्या खात्यात दीड हजार रुपये टाकायचे, हे सरकारचे दुटप्पी धोरण असल्याचा आरोप तुपकर यांनी केला.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरFarmerशेतकरीnagpurनागपूर