शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

तर २३ ऑगस्टला वर्षा बंगल्यापुढे शेतकऱ्यांच्या...., शेतकरी नेते रविकांत तूपकर यांचा इशारा

By मंगेश व्यवहारे | Updated: August 20, 2024 15:46 IST

Nagpur News: सोयाबीनला ९०००, कापसाला १२५०० रुपये भाव द्या, संत्रा मोसंबीला १०० टक्के नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांसाठी पांदन रस्त्याची योजना राबवा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि शेतमजूरांनाही विमा कवच द्या. हे निर्णय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्या, रविकांत तुपकर यांची मागणी केली.

- मंगेश व्यवहारेनागपूर - सोयाबीनला ९०००, कापसाला १२५०० रुपये भाव द्या, संत्रा मोसंबीला १०० टक्के नुकसान भरपाई द्या, शेतकऱ्यांसाठी पांदन रस्त्याची योजना राबवा, शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा आणि शेतमजूरांनाही विमा कवच द्या. हे निर्णय विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्यापूर्वी घ्या. त्या संदर्भात येत्या दोन दिवसांत ठोस भूमिका घ्या, अशी मागणी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी पत्रपरिषदेतून सरकारकडे केली. अन्यथा २३ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्र्यांच्या वर्षा बंगल्यापुढे शेतकरी आत्महत्येचे प्रात्याक्षिक मुख्यमंत्र्यांपुढे सादर करू आणि पुढे रस्त्यावर उतरू असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

राज्यातले वातावरण जाती धर्माच्या वादामुळे तापले आहे. यात शेतकरी दूर्लक्षित झाला आहे. सोयाबिनला ४ हजार तर कापसाला ६ हजार रुपये भाव मिळत आहे. हे भाव उत्पादन खर्चापेक्षा कमी आहे. गेल्या वर्षीची पीक विम्याची अर्धी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली नाही. यंदा १०० लाख मेट्रीक टन सोयाबीनचे उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सरकारने सोयाबिनचे आयात शुल्क ३० टक्के करून, ६५ लाख मेट्रीक टन ढेप निर्यात केल्यास सोयाबीनला चांगले भाव मिळू शकतात, असा तुपकरांचा दावा आहे. जंगली जनावरांमुळे शेतकरी त्रस्त आहे. शेतकऱ्यांच्या शेतीला पक्के कुंपन घाऊन द्यावे अशीही मागणी त्यांनी केली. यावेळी पत्रपरिषदेला गजानन कावरके, दयाभाऊ राऊत, किरण ठाकरे, अमित अढाव, श्याम अवथळे, सूर्या अडबाले, सूरज निंबर्ते, बालाजी मोरे, , चंद्रशेखर गवळी, अजय घाडगे आदी उपस्थित होते.

 विधानसभेत २५ जागांवर लढणारविधानसभेच्या निवडणुका लागण्यापूर्वी शेतकऱ्यांच्या पदरी त्यांचे हक्क मिळवून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. निवडणुकीत कुठल्याही पक्षाशी मोट न बांधता कष्टकरी, शेतकरी व श्रमिकांच्या नेत्यांना संघटीत करून महाराष्ट्र क्रांतीकारी आघाडीच्या माध्यमातून राज्यातील २५ जागा लढणार असल्याचे तुपकर म्हणाले.

सरकारचे दुटप्पी धोरणशेतकरी भावाला त्यांनी कष्टातून पिकविलेल्या उत्पादनाला हमीभावापेक्षा कमी किंमत द्यायची, त्यांना पिक विम्याचे पैसे नाकारायचे, त्यांना पिक कर्ज मिळू द्यायचे नाही, त्यांना आत्महत्या करण्यापर्यंत लाचार करायचे, शेतकऱ्यांच्या खिशावर डल्ला मारून लाडक्या बहिणीच्या खात्यात दीड हजार रुपये टाकायचे, हे सरकारचे दुटप्पी धोरण असल्याचा आरोप तुपकर यांनी केला.

टॅग्स :Ravikant Tupkarरविकांत तुपकरFarmerशेतकरीnagpurनागपूर