शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

अरे देवा! कापूर २००० रुपये किलो!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 10:47 IST

कापराच्या दराने यंदा विक्रम केला असून दर आकाशाला भिडले आहेत. दर ऐकूनच भाविकांच्या अंगात कापरे भरत आहे.

ठळक मुद्देसाधा १७०० रुपये किलो, भक्तांना महागाईची झळकच्च्या मालाची आवक कमी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सणासुदीत आणि कोरोनाच्या काळात कापराची मागणी दुप्पट झाली आहे. कापराच्या दराने यंदा विक्रम केला असून दर आकाशाला भिडले आहेत. दर ऐकूनच भाविकांच्या अंगात कापरे भरत आहेत. कोरोना महामारीच्या काळात कच्च्या मालाची आवक कमी असल्याने उत्पादनाची किंमत वाढली आहे. सध्या तरी भाव कमी होण्याची शक्यता नसून दिवाळीनंतर कमी होणार असल्याचे मत उत्पादकांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले.

देशात कापूर उत्पादनासाठी कच्च्या मालाचा पुरवठा करणाऱ्या चार मोठ्या कंपन्या आहेत. सध्या कोरोना महामारीमुळे कच्च्या मालाचा पुरवठा ५० टक्के चआहे. याशिवाय चीनमधून होणारी आयात थांबली आहे. त्यामुळे निर्मिती खर्च वाढला आहे. सध्या उत्पादनाच्या तुलनेत मागणी वाढली आहे. याशिवाय कोरोना काळात सोशल मीडियावर कापराच्या होणाºया प्रचारामुळे प्रत्येक जण खरेदी करीत आहे. याशिवाय गणेशोत्सवामुळे मागणी वाढली आहे. तीन महिन्यांपासून साधा किंवा कापºयाच्या वड्यांची (पॅकिंग टॅबलेट) किंमत ठोकमध्ये प्रति किलो ८०० ते ९०० रुपये होती. आता भाव १२०० ते १३०० रुपयांवर पोहोचला आहे. त्यात ४०० रुपयांची वाढ झाली आहे. किरकोळमध्ये १७०० ते १८०० हजार रुपयांपर्यंत किंमत आहे. साध्या किंवा वड्याच्या कापराची पॅकिंगमध्ये विक्री होते.भीमसेनी किंवा दगड्या कापराच्या किमतीत प्रचंड वाढविदर्भात दगड्या (देशी) आणि पश्चिम महाराष्ट्रात भीमसेनी नावाने प्रचलित कापराची किंमत चार महिन्यात ४०० रुपयांनी वाढली असून ठोक बाजारात प्रति किलो १३५० ते १४०० रुपये दर आहेत. किरकोळमध्ये २ हजार रुपयांत विक्री सुरू आहे. कोरोनाच्या काळात आरोग्यासाठी उत्तम आणि सर्दी व खोकल्यावर घरगुती उपाय म्हणून या कापराला मागणी आहे. याशिवाय घरातील वातावरण स्वच्छ ठेवण्यासाठी हा कापूर जाळला जात आहे. या कापराची विक्री वाढल्याने दर वाढल्याचे उत्पादकांनी सांगितले.

व्यापारी म्हणाले, नागपुरात १३ ते १४ कापूर उत्पादक आहेत. येथून छत्तीसगड, मध्य प्रदेश, गुजरात, खान्देश, मराठवाडा या भागात विक्रीसाठी पाठविला जातो. छत्तीसगड व मध्य प्रदेशात देवी-देवतांची आरती कापूर जाळून केली जाते. त्यामुळे या राज्यांमध्ये सर्वाधिक विक्री होते. गणेशोत्सव आणि नवरात्रात कापराची मागणी राहणार आहे.

का वाढताहेत दर :- मागणीच्या तुलनेत कच्च्या मालाचा कमी पुरवठा- उत्पादन कमी, मागणी जास्त- कोरोना काळात आयुर्वेदिक उपाय म्हणून मागणीत वाढ

कच्च्या मालाची किंमत वाढल्याने गेल्या तीन वर्षांपासून कापराचे दर वाढतच आहेत. मागणी वाढल्याने सध्या भाव कमी होण्याची शक्यता नाही. त्यामुळे ग्राहकांना जास्त भाव चुकते करूनच खरेदी करावी लागत आहे. नवरात्रोत्सवात मागणी वाढणार आहे. दिवाळीनंतर भाव कमी होतील.-नीलेश सूचक, कापूर उत्पादक़

 

टॅग्स :Healthआरोग्यmedicineऔषधं