शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

उपराजधानीत श्रावणसरींची संततधार : दिवसभरात ४१ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:01 IST

सोमवारी उपराजधानीत दिवसभर पावसाची संततधार कायम होती. सातत्याने पाऊस येत असल्यामुळे शहरातील अनेक सखल भाग तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत होते. दिवसभरात शहरात ४१.६ मिमी पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देसखल भागात साचले पाणी, आजदेखील अतिवृष्टीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी उपराजधानीत दिवसभर पावसाची संततधार कायम होती. सातत्याने पाऊस येत असल्यामुळे शहरातील अनेक सखल भाग तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत होते. दिवसभरात शहरात ४१.६ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी शहरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी सकाळपासूनच नागपूर व आजूबाजूच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली. दुपारच्या सुमारास पावसाचा जोर जास्त वाढल्याचे दिसून आले. सकाळी ८.३० पर्यंत शहरात २.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात ४१.६ मिमी पाऊस पडला. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या २४ तासात शहरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. 
दरम्यान, दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे वातावरणातदेखील थंडावा निर्माण झाला होता. शहरात कमाल २५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सरासरीहून हे तापमान पाच अंशानी कमी होते. तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. 
अनेक वस्त्या जलमयशहरातील अनेक वस्त्या संततधार पावसामुळे जलमय झाल्या. यात मनीषनगर, आरटीओ सोसायटी, सूरज सोसायटी, पंचतारा सोसायटी, सोनेगावचा काही भाग, नाल्याकाठच्या वस्त्या यांचा समावेश होता. तर न्यू सोमलवाड्याहून रेल्वे ओव्हरब्रीजकडे जाणारा मार्ग, बेलतरोडी मार्ग, नरेंद्रनगर पुलाखाली, लोखंडी पुलाखाली पाणी साचले होते. मेडिकल चौक ते क्रीडा चौक मार्ग तसेच सतरंजीपुरा झोनच्या बाजूला झाडदेखील पडले.खोदकामाचा फटकाशहरात बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी चौकात व रस्त्यांवरच पाणी तुंबल्याचे चित्र होते. यशोधरानगर येथे रस्त्यावर तुंबलेले पाणी संजीवनी क्वॉर्टर्समध्ये शिरले. मेडिकल चौक, बजाजनगर चौक, हुडकेश्वर, बैद्यनाथ चौक येथेदेखील पाणी तुंबल्याचे दिसून आले.मोठ्या अपघाताचा धोकाप्रतापनगर सिमेंट मार्गावर रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून खोदकाम झाले असून अंतर्गत विद्युतवाहिनी टाकण्यात आलेली नाही. पावसामुळे बाजूला असलेल्या मातीच्या ढिगातील माती रस्त्यावर आली आहे. शिवाय पाण्याचा निचरादेखील होण्यास अडचण येत आहे. यामुळे येथे मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील अनेक मार्गांवर असेच चित्र आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर