शहरं
Join us  
Trending Stories
1
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
2
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
3
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
4
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
5
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
6
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
7
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
8
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
9
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
10
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
11
आयपीएल २०२५ दरम्यान 'या' स्टार फलंदाजावर ४ सामन्यांची बंदी
12
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
13
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
14
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
15
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
16
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
17
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
18
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
19
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
20
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज

उपराजधानीत श्रावणसरींची संततधार : दिवसभरात ४१ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:01 IST

सोमवारी उपराजधानीत दिवसभर पावसाची संततधार कायम होती. सातत्याने पाऊस येत असल्यामुळे शहरातील अनेक सखल भाग तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत होते. दिवसभरात शहरात ४१.६ मिमी पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देसखल भागात साचले पाणी, आजदेखील अतिवृष्टीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी उपराजधानीत दिवसभर पावसाची संततधार कायम होती. सातत्याने पाऊस येत असल्यामुळे शहरातील अनेक सखल भाग तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत होते. दिवसभरात शहरात ४१.६ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी शहरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी सकाळपासूनच नागपूर व आजूबाजूच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली. दुपारच्या सुमारास पावसाचा जोर जास्त वाढल्याचे दिसून आले. सकाळी ८.३० पर्यंत शहरात २.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात ४१.६ मिमी पाऊस पडला. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या २४ तासात शहरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. 
दरम्यान, दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे वातावरणातदेखील थंडावा निर्माण झाला होता. शहरात कमाल २५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सरासरीहून हे तापमान पाच अंशानी कमी होते. तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. 
अनेक वस्त्या जलमयशहरातील अनेक वस्त्या संततधार पावसामुळे जलमय झाल्या. यात मनीषनगर, आरटीओ सोसायटी, सूरज सोसायटी, पंचतारा सोसायटी, सोनेगावचा काही भाग, नाल्याकाठच्या वस्त्या यांचा समावेश होता. तर न्यू सोमलवाड्याहून रेल्वे ओव्हरब्रीजकडे जाणारा मार्ग, बेलतरोडी मार्ग, नरेंद्रनगर पुलाखाली, लोखंडी पुलाखाली पाणी साचले होते. मेडिकल चौक ते क्रीडा चौक मार्ग तसेच सतरंजीपुरा झोनच्या बाजूला झाडदेखील पडले.खोदकामाचा फटकाशहरात बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी चौकात व रस्त्यांवरच पाणी तुंबल्याचे चित्र होते. यशोधरानगर येथे रस्त्यावर तुंबलेले पाणी संजीवनी क्वॉर्टर्समध्ये शिरले. मेडिकल चौक, बजाजनगर चौक, हुडकेश्वर, बैद्यनाथ चौक येथेदेखील पाणी तुंबल्याचे दिसून आले.मोठ्या अपघाताचा धोकाप्रतापनगर सिमेंट मार्गावर रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून खोदकाम झाले असून अंतर्गत विद्युतवाहिनी टाकण्यात आलेली नाही. पावसामुळे बाजूला असलेल्या मातीच्या ढिगातील माती रस्त्यावर आली आहे. शिवाय पाण्याचा निचरादेखील होण्यास अडचण येत आहे. यामुळे येथे मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील अनेक मार्गांवर असेच चित्र आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर