शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

उपराजधानीत श्रावणसरींची संततधार : दिवसभरात ४१ मिमी पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2019 01:01 IST

सोमवारी उपराजधानीत दिवसभर पावसाची संततधार कायम होती. सातत्याने पाऊस येत असल्यामुळे शहरातील अनेक सखल भाग तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत होते. दिवसभरात शहरात ४१.६ मिमी पावसाची नोंद झाली.

ठळक मुद्देसखल भागात साचले पाणी, आजदेखील अतिवृष्टीचा इशारा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सोमवारी उपराजधानीत दिवसभर पावसाची संततधार कायम होती. सातत्याने पाऊस येत असल्यामुळे शहरातील अनेक सखल भाग तसेच रस्त्यांवर पाणी साचल्याचे दिसून येत होते. दिवसभरात शहरात ४१.६ मिमी पावसाची नोंद झाली. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार शुक्रवारी शहरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. 

गुरुवारी सकाळपासूनच नागपूर व आजूबाजूच्या परिसरात पावसाला सुरुवात झाली. दुपारच्या सुमारास पावसाचा जोर जास्त वाढल्याचे दिसून आले. सकाळी ८.३० पर्यंत शहरात २.६ मिमी पावसाची नोंद झाली होती. त्यानंतर सायंकाळी ५.३० पर्यंत शहरात ४१.६ मिमी पाऊस पडला. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या २४ तासात शहरात अतिवृष्टी होण्याची शक्यता आहे. यादृष्टीने प्रशासनाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. 
दरम्यान, दिवसभर पडणाऱ्या पावसामुळे वातावरणातदेखील थंडावा निर्माण झाला होता. शहरात कमाल २५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सरासरीहून हे तापमान पाच अंशानी कमी होते. तर किमान तापमान २४ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. 
अनेक वस्त्या जलमयशहरातील अनेक वस्त्या संततधार पावसामुळे जलमय झाल्या. यात मनीषनगर, आरटीओ सोसायटी, सूरज सोसायटी, पंचतारा सोसायटी, सोनेगावचा काही भाग, नाल्याकाठच्या वस्त्या यांचा समावेश होता. तर न्यू सोमलवाड्याहून रेल्वे ओव्हरब्रीजकडे जाणारा मार्ग, बेलतरोडी मार्ग, नरेंद्रनगर पुलाखाली, लोखंडी पुलाखाली पाणी साचले होते. मेडिकल चौक ते क्रीडा चौक मार्ग तसेच सतरंजीपुरा झोनच्या बाजूला झाडदेखील पडले.खोदकामाचा फटकाशहरात बऱ्याच ठिकाणी रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा होत नसल्याने अनेक ठिकाणी चौकात व रस्त्यांवरच पाणी तुंबल्याचे चित्र होते. यशोधरानगर येथे रस्त्यावर तुंबलेले पाणी संजीवनी क्वॉर्टर्समध्ये शिरले. मेडिकल चौक, बजाजनगर चौक, हुडकेश्वर, बैद्यनाथ चौक येथेदेखील पाणी तुंबल्याचे दिसून आले.मोठ्या अपघाताचा धोकाप्रतापनगर सिमेंट मार्गावर रस्त्याच्या कडेला खोदकाम करण्यात आले आहे. अनेक दिवसांपासून खोदकाम झाले असून अंतर्गत विद्युतवाहिनी टाकण्यात आलेली नाही. पावसामुळे बाजूला असलेल्या मातीच्या ढिगातील माती रस्त्यावर आली आहे. शिवाय पाण्याचा निचरादेखील होण्यास अडचण येत आहे. यामुळे येथे मोठा अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. शहरातील अनेक मार्गांवर असेच चित्र आहे.

टॅग्स :Rainपाऊसnagpurनागपूर