शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंना भाजपाचा मोठा धक्का; २ मोठ्या नेत्यांचा लवकरच पक्षप्रवेश होणार
2
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
3
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
4
महाराष्ट्राच्या १५ हजार एकर महसूल जमिनीसह सीमेवरील १४ गावांवर तेलंगण राज्याचा ताबा !
5
भारताकडे 'रेअर अर्थ'चा ५वा सर्वात मोठा खजिना; तरीही आयातीसाठी चीनवर का अवलंबून? 'ही' आहे खरी अडचण
6
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
7
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
8
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
9
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
10
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
11
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
12
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
13
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
14
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
15
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
16
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
17
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
18
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
19
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
20
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!

बैठका, व्हीसीमुळे नागपुरातील अधिकारी वैतागले : पाच वर्ष बैठकीतच गेल्याची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:33 IST

गेल्या पाच वर्षात सरकारचे मंत्री, सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विविध विभागाचे आयुक्त यांनी मॅराथॉन बैठका झाल्याने पाच वर्ष बैठकीतच गेल्याची भावना नागपुरातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना आचारसंहितेची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रधानमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत होणाऱ्या बैठका, घेतले जाणारे आढावे, त्याकरिता करावी लागणारी तयारी, मंत्रालयाचे दौरे, वारंवार होणाऱ्या व्हीसी यामुळे शासकीय अधिकारी वैतागले होते. या बैठकांची फलश्रुती काहीच नसल्याने बैठका कराव्या की काम हेच अधिकाऱ्यांना समजेनासे झाले होते. गेल्या पाच वर्षात सरकारचे मंत्री, सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विविध विभागाचे आयुक्त यांनी मॅराथॉन बैठका झाल्याने पाच वर्ष बैठकीतच गेल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कधी आचारसंहिता लागते आणि कधी त्यातून आमची सुटका होते अशी भावना अधिकाऱ्यांची झाली आहे.अधिकाऱ्यांच्या मते पाच वर्षाच्या सरकारच्या कार्यकाळात बैठकींचा प्रकार भरपूर वाढला. आकडेवारी गोळा करण्यात अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा तर उपद्रव होता. पण तुलनेत मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या पदांकडे सरकारचे लक्ष गेले नाही. विभाग प्रमुखांच्या मुंबईच्या वाºया, एका महिन्यात २० बैठका कराव्या लागत होत्या.मुख्यमंत्र्यांची बैठक असेल तर संबंधित विभाग प्रमुखाला माहिती गोळा करणे, सीईओ आणि जिल्हाधिकारी यांची पूर्वतयारीची बैठक, त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून आढावा, त्यानंतर सचिवांकडून घेण्यात येणारा आढावा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर परत बैठक अशा बैठकांचे सत्र होत असतात. यात लहान कर्मचाऱ्यांपासून विभाग प्रमुखांपर्यंत आकडेवारी गोळा करण्यात सर्वच व्यस्त होऊन जातात. त्यामुळे नेहमीचे काम करायला, दौरे करायला विभाग प्रमुखांना वेळच मिळाला नाही.

नागपुरातील अधिकारी तर जास्तच व्यस्तइतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपुरातील अधिकारी जास्तच व्यस्त असायचे. मुख्यमंत्र्यांचे, पालकमंत्र्यांचे दौरे बैठका सातत्याने होत होत्या. सचिव, मंत्रालयीन अधिकाऱ्यांची ये-जा सातत्याने असायची. ते कधीही बैठका बोलवायचे. रात्री उशिरापर्यंत अधिकारी काम करायचे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने नागपूरच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच प्रेशर होते. सोबतच तणाव व भीतीत त्यांची पाच वर्षे गेली.

मिटिंग म्हटली की आता चीड येतेअधिकारी म्हणतात की रिझल्ट पाहिजे असेल तर आम्हाला मोकळीक द्यायला हवी. आॅनलाईन झाले असताना, एवढ्या बैठका आणि व्हीसीची गरज नव्हती. या बैठकांचा, व्हीसीचा आम्हाला वैताग आला आहे. आता मिटिंग म्हटली की चीड येत असल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Governmentसरकार