शहरं
Join us  
Trending Stories
1
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
2
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
3
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
4
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
5
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
6
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
7
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
8
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
9
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
10
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
11
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
12
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
13
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
14
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
15
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
16
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
17
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
18
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
19
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
20
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स

बैठका, व्हीसीमुळे नागपुरातील अधिकारी वैतागले : पाच वर्ष बैठकीतच गेल्याची भावना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2019 11:33 IST

गेल्या पाच वर्षात सरकारचे मंत्री, सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विविध विभागाचे आयुक्त यांनी मॅराथॉन बैठका झाल्याने पाच वर्ष बैठकीतच गेल्याची भावना नागपुरातील अधिकाऱ्यांनी व्यक्त केली.

ठळक मुद्देअधिकाऱ्यांना आचारसंहितेची प्रतीक्षा

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : प्रधानमंत्र्यांपासून जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत होणाऱ्या बैठका, घेतले जाणारे आढावे, त्याकरिता करावी लागणारी तयारी, मंत्रालयाचे दौरे, वारंवार होणाऱ्या व्हीसी यामुळे शासकीय अधिकारी वैतागले होते. या बैठकांची फलश्रुती काहीच नसल्याने बैठका कराव्या की काम हेच अधिकाऱ्यांना समजेनासे झाले होते. गेल्या पाच वर्षात सरकारचे मंत्री, सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, विविध विभागाचे आयुक्त यांनी मॅराथॉन बैठका झाल्याने पाच वर्ष बैठकीतच गेल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केली. त्यामुळे कधी आचारसंहिता लागते आणि कधी त्यातून आमची सुटका होते अशी भावना अधिकाऱ्यांची झाली आहे.अधिकाऱ्यांच्या मते पाच वर्षाच्या सरकारच्या कार्यकाळात बैठकींचा प्रकार भरपूर वाढला. आकडेवारी गोळा करण्यात अधिकाऱ्यांची चांगलीच दमछाक झाली. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा तर उपद्रव होता. पण तुलनेत मोठ्या संख्येने रिक्त असलेल्या पदांकडे सरकारचे लक्ष गेले नाही. विभाग प्रमुखांच्या मुंबईच्या वाºया, एका महिन्यात २० बैठका कराव्या लागत होत्या.मुख्यमंत्र्यांची बैठक असेल तर संबंधित विभाग प्रमुखाला माहिती गोळा करणे, सीईओ आणि जिल्हाधिकारी यांची पूर्वतयारीची बैठक, त्यानंतर विभागीय आयुक्तांकडून आढावा, त्यानंतर सचिवांकडून घेण्यात येणारा आढावा, मुख्यमंत्र्यांच्या बैठकीनंतर परत बैठक अशा बैठकांचे सत्र होत असतात. यात लहान कर्मचाऱ्यांपासून विभाग प्रमुखांपर्यंत आकडेवारी गोळा करण्यात सर्वच व्यस्त होऊन जातात. त्यामुळे नेहमीचे काम करायला, दौरे करायला विभाग प्रमुखांना वेळच मिळाला नाही.

नागपुरातील अधिकारी तर जास्तच व्यस्तइतर जिल्ह्याच्या तुलनेत नागपुरातील अधिकारी जास्तच व्यस्त असायचे. मुख्यमंत्र्यांचे, पालकमंत्र्यांचे दौरे बैठका सातत्याने होत होत्या. सचिव, मंत्रालयीन अधिकाऱ्यांची ये-जा सातत्याने असायची. ते कधीही बैठका बोलवायचे. रात्री उशिरापर्यंत अधिकारी काम करायचे. मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने नागपूरच्या अधिकाऱ्यांवर चांगलेच प्रेशर होते. सोबतच तणाव व भीतीत त्यांची पाच वर्षे गेली.

मिटिंग म्हटली की आता चीड येतेअधिकारी म्हणतात की रिझल्ट पाहिजे असेल तर आम्हाला मोकळीक द्यायला हवी. आॅनलाईन झाले असताना, एवढ्या बैठका आणि व्हीसीची गरज नव्हती. या बैठकांचा, व्हीसीचा आम्हाला वैताग आला आहे. आता मिटिंग म्हटली की चीड येत असल्याची भावना अधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या.

टॅग्स :Governmentसरकार