शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान दहशतवादाचे केंद्र, नेहमी दहशतवाद्यांना संरक्षण दिले; भारताकडून पाकची पोलखोल
2
पाकिस्तानला भारताचा 'डिजिटल' दणका! सोशल मीडिया पाठोपाठ वेब सिरीज, OTT वरही बंदी
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तान जागतिक दहशतवादाचे केंद्र; सर्व धर्मीयांनी केला पाकचा निषेध- परराष्ट्र सचिव
4
Mumbai Metro: उद्यापासून आर ते वरळी मेट्रो धावणार, मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका, वेळही वाचणार!
5
टी-२० सामन्यापूर्वीच भारताचा धमाका, ड्रोन हल्ल्यात रावळपिंडीचं स्टेडियम उद्ध्वस्त  
6
India Pakistan Tension: पाकिस्तान वेडापिसा! भारतातील 'या' ठिकाणांवर मिसाईल सोडली, Indian Army ने झटक्यात पाडली
7
India Pakistan War : भारताने लाहोर ते कराचीपर्यंतच्या ९ शहरांवर इस्रायली ड्रोनने हल्ला केला; घाबरलेल्या पाकिस्तानचा दावा
8
Karachi Bakery: हैदराबादच्या प्रसिद्ध कराची बेकरीविरुद्ध निदर्शने, सर्व दुकानांवर लावला तिरंगा झेंडा...
9
भारताच्या ड्रोन हल्ल्यात हाफिज सईदचा सहकारी ठार, तर मुलगा बेपत्ता
10
भारताचं 'सुदर्शन चक्र' लय भारी! पाकच्या क्षेपणास्त्रांचा 'खेळ खल्लास' करणाऱ्या S-400 ची पॉवरफुल्ल स्टोरी
11
कधी काजल, कधी स्वीटी; २१ वर्षीय गुलशानाचं १२ वेळा लग्न; तरुणांना ‘अशी’ अडकवायची जाळ्यात
12
स्वप्नांसाठी काय पण! रुग्णालयात १२ तास ड्युटी करतानाच UPSC ची तयारी, डॉक्टर झाली IAS
13
बारामतीच्या महिलेचे पाचोऱ्याच्या तरुणावर जडलं प्रेम; पण असं काही घडलं की तिघांनी केली आत्महत्या
14
घराजवळ बाँबचा आवाज ऐकल्याने पाकिस्तानी अभिनेता बिथरला, म्हणाला- "आम्हाला शांतता हवी आहे..."
15
Pakistan Video: "इतके नालायक आहेत, ड्रोन हल्ला, पण सांगताहेत की वीज कोसळली", पाकिस्तानी नागरिकाचा व्हिडीओ व्हायरल
16
Operation Sindoor: भारतीय लष्कराचा पाकमध्ये आणखी एक 'धमाका'; लाहोरमधील HQ-9 डिफेन्स सिस्टम केली उद्ध्वस्त
17
भारत-पाकिस्तान तणावामुळे बाजारात दबाव; मिडकॅप-स्मॉलकॅप शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण
18
ऑपरेशन सिंदूरः भारताने पाकिस्तानला दाखवलेत 'तारे', वाहतील का युद्धाचे वारे?; ग्रहस्थिती काय सांगतेय बघा!
19
'ऑपरेशन सिंदूर' भारतीय शौर्याचे प्रतीक, हा शब्द आता.. ट्रेडमार्कवर रिलायन्सचे स्पष्टीकरण
20
"दहशतवादी हल्ल्यामुळे आम्हाला प्रत्युत्तर द्यावं लागलं!"; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांसमोर एस जयशंकर काय म्हणाले?

अधिकारी कार्यालयात, मग नगरसेवक उत्पन्न कसे वाढवणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:11 IST

- विकासकामेच नाहीत, तर लोकांकडे कसे जाणार लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : नागरिकांचे हित लक्षात घेऊन मालमत्ता कर व ...

- विकासकामेच नाहीत, तर लोकांकडे कसे जाणार

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : नागरिकांचे हित लक्षात घेऊन मालमत्ता कर व पाणी करासाठी अभय योजना आणली आहे, परंतु ज्या हेतूने ही योजना आणली, तो हेतू पूर्ण होताना दिसत नाही. आजवरचे वसुलीचे आकडे समाधानकारक नाहीत. स्थायी समितीच्या बैठकीत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी नगरसेवकांना उत्पन्न वाढीसाठी आवाहन केले, परंतु प्रभागातील विकासकामांसाठी निधी दिला नाही. ७०० कोटींची देणी असल्याचे कारण पुढे केले. यामुळे नगरसेवकांत नाराजी आहे. उत्पन्नवाढीत प्रशासन नापास ठरले आहे. वरिष्ठ अधिकारी आपल्या कक्षातून बाहेर पडत नसल्याचा त्यांचा आक्षेप आहे.

झोन स्तरावरील अधिकारी योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करण्यात अपयशी ठरले आहेत. आयुक्तांकडून प्रतिसाद मिळत नसल्याने स्थायी समितीच्या बैठकीत बुधवारी संतप्त नगरसेवकाने फाईल फेकली. वर्षभरापासून प्रभागातील गटर लाईन, चेंबरवरील झाकणे, नाल्याची भिंत दुरुस्ती, यासाठी निधी मिळत नाही. अत्यावश्यक कामे होत नसल्याने नागरिक कर कसे भरतील, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

कर भरूनही कामे होत नसल्याने नागरिकांत नाराजी आहे. कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या वेतनासाठीच कर भरायचा का, असा प्रश्न सदस्यांनी

उपस्थित केला.

अभय योजनेत पाणी कर थकीत असलेल्या ९९८३ ग्राहकांनी लाभ घेतला. ३.१२ कोटी जमा केले. एकूण थकबाकीच्या ३.०८ टक्के रक्कम जमा झाली. मालमत्ता करातून २७ डिसेंबरपर्यंत ५३४२ थकबाकीदारांनी ६.०३ कोटी मनपाच्या तिजोरीत जमा केले.

...

प्रशासनाची उदासीनता : झलके

अभय योजनेचा लाभ अधिकाधिक लोकांना मिळावा, मनपा तिजोरीत महसूल जमा व्हावा, या हेतूने ही योजना आणली आहे, परंतु मनपातील वरिष्ठ अधिकारी आपल्या कार्यालयात बसून असतात. दुसरीकडे नगरसेवकांना उत्पन्न वाढविण्यास सांगितले जात आहे. वेतन अधिकारी घेणार व काम नगरसेवक करणार, त्यात अत्यावश्यक कामासाठी निधी मिळत नाही. अशा परिस्थितीत नगरसेवक वसुलीसाठी नागरिकांकडे कसे जातील, असा सवाल स्थायी समितीचे अध्यक्ष विजय झलके यांनी केला.

...

फोनवरून संपर्कात : बॅनर्जी

थकबाकीदारांशी झोन स्तरावरून संपर्क केला जात आहे. मोठ्या थकबाकीदारांना पत्र पाठविले जात आहे. अभय योजनेसंदर्भात जनजागृती केली जात आहे. त्यानंतरही थकबाकीदार कर भरत नसतील तर काय करणार, झोन स्तरावरील संबंधित अधिकारी याला जबाबदार असल्याचे जलप्रदाय विभागाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांनी सांगितले.