शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Thane: ट्रेकिंगला गेले असता पाय घसरुन दरीत कोसळला, ठाण्यातील धक्कादायक प्रकार!
4
प्रवाशांना मार्गदर्शक सूचना द्या, रेल्वे नोडल अधिकारी नेमा, यंत्रणांना निर्देश
5
आजचा अग्रलेख: मारेकऱ्यांच्या मुसक्या आवळा!
6
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
7
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
8
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
9
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
10
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
11
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
12
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
13
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
14
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
15
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
16
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
17
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
18
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
19
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद

पैसे दिल्याशिवाय अधिकारी एकही काम करत नाही : विजय वडेट्टीवार यांचा थेट आरोप

By कमलेश वानखेडे | Updated: April 28, 2025 17:58 IST

Nagpur : तर गृहमंत्र्यांच्या शहरात स्फोटक स्थिती तयार होईल

कमलेश वानखेडेलोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात कमिशन खोरी मोठ्या प्रमाणात सुरू आहे. महाराष्ट्रात भ्रष्टाचाराला ऊत आला आहे. खालच्या स्तरापासून लोकांनी पैसे दिल्याशिवाय एकही काम प्रशासनातील अधिकारी करत नाही. ज्या विभागाला काम दिली जाते तिथे सुद्धा कमिशन दिल्याशिवाय कामे, निधी वितरित केल्या जात नाही. हा भ्रष्टाचार संपवायचा असेल तर त्याची सुरुवात मंत्रालयातून करावी लागेल, असा आरोप काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार यांनी केला.

सोमवारी नागपुरात पत्रकारांशी बोलताना वडेट्टीवार म्हणाले, सद्यस्थितीत सरकारची स्थिती गोंधळलेली आहे. एक मंत्री दुसऱ्या मंत्र्याच्या मतदारसंघात जाऊन कायदा सुव्यवस्था आणि हिंदुत्व सांगतो. त्याला स्थानिक मंत्री आम्हाला कायदा व्यवस्था शिकवू नका, शांतता कशी राखायची आम्हाला ठाऊक आहे, असे बोलतात..त्यानंतर हे गृहमंत्री आमचे आहे असेही सांगतात. मंत्रीपदावर असलेले दोन नेत्यांमध्ये असा वाद होत असेल तर हे किती गोंधळलेलं सरकार आहे, हे स्पष्ट होते.

शिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी कराशिक्षक भरती घोटाळ्याची ईडी चौकशी झाली पाहिजे. एसआयटी नेमली पाहिजे. याची उच्चस्तरीय चौकशी होणे आवश्यक आहे. त्यामध्ये जो संस्थाचालक दोषी आहेत, शिक्षक विभागाची यंत्रणा दोषी आहे त्याला कोणालाही सोडू नये. परंतु ज्यांनी घोटाळे केले त्यांना वाचवण्यासाठी निरपराध माणसाचा बळी घेऊ नका, असे वडेट्टीवार म्हणाले.

तर गृहमंत्र्यांच्या शहरात स्फोटक स्थिती तयार होईलपहेलगाममध्ये दोनशे किलोमीटर आत मध्ये अतिरेकी घुसून निरपराधी लोकांचा जीव घेतात. याची काहीच चर्चा होत नाही. दुर्दैवाने हिंदू-मुस्लीम ची चर्चा होते. सीमेवर इतके दुर्लक्ष असेल तर राज्यात आपण कोणाला बोलावे. नागपूर हे गृहमंत्र्यांचे शहर आहे. इथल्या कायदा सुव्यवस्थेबद्दल भयंकर अशी स्थिती आहे. वेळीच बंधन घातले नाही तर नागपुरात स्फोटकासारखी स्थिती निर्माण होईल, असे सांगत वडेट्टीवार यांनी गृह विभागाला लक्ष्य केले.

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारnagpurनागपूरDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्ला